शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

नुकसानभरपाईपासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 9:46 PM

मेशी : देवळा पूर्व भागातील मेशीसह डोंगरगाव परिसरात पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. सततच्या पावसाने आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध रोगांचे आगमन झाले होते. या भागाचे तिन्ही हंगामातील प्रमुख पीक कांदा आहे. परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे कांदा रोपांची आणि पिकाचीही मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. या पार्श्वभूमीवर शेतकरी यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करून महसूल विभागाने भरपाई मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली होती.

ठळक मुद्देअनुदानापासून वंचित राहिले असल्याची शेतकऱ्यांची तक्रार

मेशी : देवळा पूर्व भागातील मेशीसह डोंगरगाव परिसरात पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. सततच्या पावसाने आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध रोगांचे आगमन झाले होते. या भागाचे तिन्ही हंगामातील प्रमुख पीक कांदा आहे. परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे कांदा रोपांची आणि पिकाचीही मोठ्या प्रमाणात नासाडी झाली.

या पार्श्वभूमीवर शेतकरी यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करून महसूल विभागाने भरपाई मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने पाहणी न करता माहिती शासनाला पाठविल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे बरेच लाभार्थी या अनुदानापासून वंचित राहिले असल्याची शेतकऱ्यांची तक्रार केली आहे.

डोंगरगाव येथील ७५०पैकी केवळ १५८ शेतकरी लाभार्थी ठरले आहेत. सलग पंचनामे करून प्रस्ताव पाठविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असताना सदर विभागाच्या अधिकारी यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. या भागातील शेतकरी पहिल्या अनुदानापासून अजूनही वंचित आहेत. शेजारच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वाटप होत असून, असा भेदभाव केला जात असल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.

डोंगरगाव सरपंच दयाराम सावंत, मेशीचे लोकप्रतिनिधी यांनी वारंवार मागणी करूनही संबंधित अधिकारी यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी