शेतकरी आत्महत्त्या प्रकरणी संशयितांना कोठडी
By Admin | Updated: June 6, 2016 00:08 IST2016-06-05T22:39:13+5:302016-06-06T00:08:12+5:30
कळवण : १३ जणांवर गुन्हा दाखल

शेतकरी आत्महत्त्या प्रकरणी संशयितांना कोठडी
कळवण : शेतजमिनीच्या वादावरून होणाऱ्या शिवीगाळ, दमदाटीमुळे वैफल्यग्रस्त झालेल्या वासुळ येथील संजय रामचंद्र आहिरे या शेतकऱ्याने सप्तशृंगगडावरील नारळे जंगल परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्त्या केल्या प्रकरणी गजाआड असलेल्या सात संशयितांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मयत संजय आहिरे यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी घटनास्थळी पोलिसांना सापडल्याने चिठ्ठीचा आधार आणि फिर्यादीच्या तक्र ारीवरून आत्महत्त्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कळवण पोलिसांनी रामचंद्र आंबू आहिीरे, चंद्रकांत रामचंद्र आहिरे, निर्मला एकनाथ निकम, कल्पना अरु ण पगार, अरु ण राजाराम पगार, माधव तुळशीराम निकम, आबा महादू निकम या सात जणांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता ८ जूनपर्यंत कोठडी देण्यात आली आहे, तर राजेंद्र अरु ण पगार, सुमन बाबाजी सोनवणे, विलास बाबाजी सोनवणे, संगीता चंद्रकांत आहेर, एकनाथ देवबा निकम, गणेश एकनाथ निकम यांचा कळवण पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद जोधारे, पोलीस नाईक एस. जे. शेलार, एस. ए. शिंदे, बबनराव पाटोळे करीत आहेत. (वार्ताहर)