शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी मार्गाबाबत सेनेच्या दुटप्पी भूमिकेने शेतकरी अचंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:09 IST

संजय पाठक। नाशिक : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन समृद्धी महामार्गाला विरोध करणाºया शिवसेनेने आता ...

ठळक मुद्देआधी केला होता विरोध; आता शिवसेनेच्या प्रमुखांच्या नामकरणासाठी आग्रह

संजय पाठक।नाशिक : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन समृद्धी महामार्गाला विरोध करणाºया शिवसेनेने आता अचानक भूमिका बदलली असून, या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी आग्रह धरला जात आहे. शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेमुळे समृद्धीबाधीत शेतकºयांना धक्का बसला असून, त्याची प्रतिक्रिया निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यानंतर मुळातच शिवसेनेने त्यास विरोध करून हा वेगळ्या विदर्भाचा डाव असल्याची टीका केली होती. तर प्रत्यक्ष महामार्गासाठी बाधीत गावे जाहीर होऊन जमिनी घेण्याची कार्यवाही सुरू झाली तेव्हा शिवसेनेने स्थानिक स्तरावर त्याला कडाडून विरोध केला. खुुद्द उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये उत्तर महाराष्टÑाचा मेळावा घेतला. त्यावेळी समृद्धी बाधितांच्या बाजूने म्हणजेच शेतकºयांच्या बाजूनेच उभे राहू आणि हा रस्ता होऊच देणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. नाशिक जिल्ह्णातील इगतपुरी आणि सिन्नर या दोन तालुक्यातून ९७ किलोमीटर क्षेत्रातून हा रस्ता जात असून, दोन्ही तालुक्यांतील ४९ गावे बाधीत होत आहेत. या गावांमधील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली तसेच मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाºयांना डांबण्यापर्यंत आंदोलने करण्यात आली होती. शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या बाजूने भूमिका घेतली होती. परंतु आता मात्र या रस्त्याला नाव देण्याच्या स्पर्धेत शिवसेनाच उतरली असून, मार्गाला शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी आग्रह धरला जात आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.शिंदे यांची संदिग्ध भूमिकाबांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची देखील समृद्धीबाधीत शेतकºयांनी भेट घेतली होती. त्यांनी सक्तीने भूसंपादन होऊ देणार नाही असा शब्द दिला, परंतु तो पाळला नाही. त्यातच उद्धव ठाकरे यांच्याकडे शेतकºयांनी कृतीशिल विरोधाची भूमिका घेतली होती तीदेखील पूर्ण झालेली नाही. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या उत्तर महाराष्टÑाच्या मेळाव्याप्रसंगी समृद्धीसंदर्भात शेतकºयांच्या पाठीशी राहू, असे सांगितले होते; परंतु तसे घडले नाही. शिवसेनेने शब्द पाळला नाही.- राजू देसले, भाकपा.