शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी मार्गाबाबत सेनेच्या दुटप्पी भूमिकेने शेतकरी अचंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:09 IST

संजय पाठक। नाशिक : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन समृद्धी महामार्गाला विरोध करणाºया शिवसेनेने आता ...

ठळक मुद्देआधी केला होता विरोध; आता शिवसेनेच्या प्रमुखांच्या नामकरणासाठी आग्रह

संजय पाठक।नाशिक : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन समृद्धी महामार्गाला विरोध करणाºया शिवसेनेने आता अचानक भूमिका बदलली असून, या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी आग्रह धरला जात आहे. शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेमुळे समृद्धीबाधीत शेतकºयांना धक्का बसला असून, त्याची प्रतिक्रिया निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यानंतर मुळातच शिवसेनेने त्यास विरोध करून हा वेगळ्या विदर्भाचा डाव असल्याची टीका केली होती. तर प्रत्यक्ष महामार्गासाठी बाधीत गावे जाहीर होऊन जमिनी घेण्याची कार्यवाही सुरू झाली तेव्हा शिवसेनेने स्थानिक स्तरावर त्याला कडाडून विरोध केला. खुुद्द उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये उत्तर महाराष्टÑाचा मेळावा घेतला. त्यावेळी समृद्धी बाधितांच्या बाजूने म्हणजेच शेतकºयांच्या बाजूनेच उभे राहू आणि हा रस्ता होऊच देणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. नाशिक जिल्ह्णातील इगतपुरी आणि सिन्नर या दोन तालुक्यातून ९७ किलोमीटर क्षेत्रातून हा रस्ता जात असून, दोन्ही तालुक्यांतील ४९ गावे बाधीत होत आहेत. या गावांमधील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली तसेच मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाºयांना डांबण्यापर्यंत आंदोलने करण्यात आली होती. शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या बाजूने भूमिका घेतली होती. परंतु आता मात्र या रस्त्याला नाव देण्याच्या स्पर्धेत शिवसेनाच उतरली असून, मार्गाला शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी आग्रह धरला जात आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.शिंदे यांची संदिग्ध भूमिकाबांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची देखील समृद्धीबाधीत शेतकºयांनी भेट घेतली होती. त्यांनी सक्तीने भूसंपादन होऊ देणार नाही असा शब्द दिला, परंतु तो पाळला नाही. त्यातच उद्धव ठाकरे यांच्याकडे शेतकºयांनी कृतीशिल विरोधाची भूमिका घेतली होती तीदेखील पूर्ण झालेली नाही. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या उत्तर महाराष्टÑाच्या मेळाव्याप्रसंगी समृद्धीसंदर्भात शेतकºयांच्या पाठीशी राहू, असे सांगितले होते; परंतु तसे घडले नाही. शिवसेनेने शब्द पाळला नाही.- राजू देसले, भाकपा.