शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

समृद्धी मार्गाबाबत सेनेच्या दुटप्पी भूमिकेने शेतकरी अचंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:09 IST

संजय पाठक। नाशिक : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन समृद्धी महामार्गाला विरोध करणाºया शिवसेनेने आता ...

ठळक मुद्देआधी केला होता विरोध; आता शिवसेनेच्या प्रमुखांच्या नामकरणासाठी आग्रह

संजय पाठक।नाशिक : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन समृद्धी महामार्गाला विरोध करणाºया शिवसेनेने आता अचानक भूमिका बदलली असून, या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी आग्रह धरला जात आहे. शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेमुळे समृद्धीबाधीत शेतकºयांना धक्का बसला असून, त्याची प्रतिक्रिया निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यानंतर मुळातच शिवसेनेने त्यास विरोध करून हा वेगळ्या विदर्भाचा डाव असल्याची टीका केली होती. तर प्रत्यक्ष महामार्गासाठी बाधीत गावे जाहीर होऊन जमिनी घेण्याची कार्यवाही सुरू झाली तेव्हा शिवसेनेने स्थानिक स्तरावर त्याला कडाडून विरोध केला. खुुद्द उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये उत्तर महाराष्टÑाचा मेळावा घेतला. त्यावेळी समृद्धी बाधितांच्या बाजूने म्हणजेच शेतकºयांच्या बाजूनेच उभे राहू आणि हा रस्ता होऊच देणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. नाशिक जिल्ह्णातील इगतपुरी आणि सिन्नर या दोन तालुक्यातून ९७ किलोमीटर क्षेत्रातून हा रस्ता जात असून, दोन्ही तालुक्यांतील ४९ गावे बाधीत होत आहेत. या गावांमधील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली तसेच मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाºयांना डांबण्यापर्यंत आंदोलने करण्यात आली होती. शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या बाजूने भूमिका घेतली होती. परंतु आता मात्र या रस्त्याला नाव देण्याच्या स्पर्धेत शिवसेनाच उतरली असून, मार्गाला शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी आग्रह धरला जात आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.शिंदे यांची संदिग्ध भूमिकाबांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची देखील समृद्धीबाधीत शेतकºयांनी भेट घेतली होती. त्यांनी सक्तीने भूसंपादन होऊ देणार नाही असा शब्द दिला, परंतु तो पाळला नाही. त्यातच उद्धव ठाकरे यांच्याकडे शेतकºयांनी कृतीशिल विरोधाची भूमिका घेतली होती तीदेखील पूर्ण झालेली नाही. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या उत्तर महाराष्टÑाच्या मेळाव्याप्रसंगी समृद्धीसंदर्भात शेतकºयांच्या पाठीशी राहू, असे सांगितले होते; परंतु तसे घडले नाही. शिवसेनेने शब्द पाळला नाही.- राजू देसले, भाकपा.