शेतमाल विक्रीबाबत शेतकरीच साशंक

By Admin | Updated: February 17, 2016 23:04 IST2016-02-17T22:52:15+5:302016-02-17T23:04:17+5:30

शेतमाल विक्रीबाबत शेतकरीच साशंक

Farmers are skeptical about the sale of commodities | शेतमाल विक्रीबाबत शेतकरीच साशंक

शेतमाल विक्रीबाबत शेतकरीच साशंक

 लासलगाव : बळीराजा आता भाजीपाला, धान्य, कांदे व इतर शेतमाल थेट ग्राहकांना विकू शकेल, असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असला तरी तो प्रत्यक्ष कितपत फायदेशीर ठरेल याबाबत खुद्द शेतकरीच साशंकता व्यक्त करत आहेत.
शासनाचा हा धाडसी निर्णय बाजार समितीत माल विकण्याची सक्ती रद्द करणारा आहे. परंतु किरकोळ शेतमाल विक्र ी करणाऱ्या शेतकऱ्याला त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विकण्याची संधी मिळणार असली तरी, बाहेर दलाल यात हस्तक्षेप करून फसवणूक करतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांत असलेली व्यापारी, आडते आणि दलालांची साखळी मोडीत निघत फायदा थेट शेतकरी वर्गाला होईल या विचाराने हा निर्णय घेतला गेला असावा. परंतु शासनाच्या या निर्णयामागे राजकीय खेळी दिसत आहे. बाजार समितीचे मोठे उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक व कामगार यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयाबाबत मात्र शेतकरी संमिश्र प्रतिक्रि या व्यक्त करताना दिसत आहेत. काही शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले तर काहींनी मात्र या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतील, असे मत व्यक्त केले. (वार्ताहर)

Web Title: Farmers are skeptical about the sale of commodities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.