शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

लासलगावी कांदा लिलाव बंद पाडत शेतकऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:47 PM

लासलगाव : केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने रद्द करावी यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी येथील बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अर्धा तास लिलाव बंद पाडत प्रवेशद्वारावर आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.

लासलगाव : केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने रद्द करावी यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी येथील बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अर्धा तास लिलाव बंद पाडत प्रवेशद्वारावर आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.राज्यातील कांदा उत्पादक शेतकºयांकडे अत्यल्प कांदा शिल्लक असून, बाजारात आवक मंदावल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दरात सुधारणा झाल्याने शेतकºयांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र कांद्याचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप सुरू केला आहे.त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यातील सर्वच ठिकाणच्या कांदा उत्पादकांमध्ये अस्वस्थता पसरली असून शेतकरी संतप्त झाले आहेत. केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यात बंदी तातडीने रद्द करावी तसेच परदेशातून कुठलाही प्रकारचा कांदा आयात करू नये, कांदा व्यापाºयांवरील कांदा साठवणूकीचे निर्बंध उठवावे व किमान निर्यातमूल्य कायमस्वरूपी रद्द करून निर्यात सुरू करून शेतकºयांना आर्थिक न्याय द्यावा अशी मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी लासलगाव येथे झालेल्या आंदोलनात केली.मागील काही दिवसांपासून राज्यातील व देशातील विविध राजकीय पक्षांनी व संघटनांनी कांदा भाव वाढीविरोधात आंदोलने करून कांदा बाजारभाव पाडण्याचे काम सुरू केले आहे. दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर शुक्र वारी सकाळी नऊ वाजता सुमारे अर्धा तास कांदा लिलाव बंद पाडून कांदा भाव वाढीला विरोध करणाºया सर्वच राजकीय पक्ष व संघटना यांच्या विरोधात, कांद्याच्या निर्यात बंदी विरोधात तसेच सरकार घेत असलेल्या विविध शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.या प्रसंगी कांदा उत्पादक शेतकरी शैलेंद्र पाटील यांनी सांगितले की, सरकारने कांदा दर कमी करण्याचा हट्ट चालवला आहे.एकहाती सत्तेमुळे केंद्र सरकार अती करण्याचा प्रयत्न करत आहे.कांदा बाजारभाव पाडण्याचा हस्तक्षेप सरकारने वेळीच थांबवावा.सध्या शेतकºयांमध्ये प्रचंड असंतोष आहे.जर असे शेतकरी विरोधी निर्णय केंद्र सरकारने मागे घेतले नाही तर कांदा उत्पादक राज्यस्तरीय आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे शेतकºयांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक