नाशिक जिल्ह्यातून दीडशे गावांतील शेतकरी १ जूनपासून संपावर

By Admin | Updated: May 5, 2017 17:06 IST2017-05-05T17:06:04+5:302017-05-05T17:06:04+5:30

नाशिक जिल्ह्यातून दीडशे गावांतील शेतकरी १ जूनपासून संपावर

Farmers from 150 villages in Nashik district will get strike from 1st June | नाशिक जिल्ह्यातून दीडशे गावांतील शेतकरी १ जूनपासून संपावर

नाशिक जिल्ह्यातून दीडशे गावांतील शेतकरी १ जूनपासून संपावर

नाशिक : शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. शेतमालाचे बाजारात होणारे नेहमीचे अवमूल्यन, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि सरकारचे शेतीविरोधी धोरण या व्यवसायाला खड्ड्यात लोटणारे असल्याने शेतकऱ्यांवर उपासमारी आणि आत्महत्येची वेळ आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत असून, शेती व्यवसायात प्रगत मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यालाही शेतकरी आत्महत्येचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे कर्ज काढून शेती करण्यापेक्षा येत्या १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Web Title: Farmers from 150 villages in Nashik district will get strike from 1st June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.