शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जिल्ह्यातील दीडशे गावांतील शेतकरी १ जूनपासून संपावर

By admin | Updated: May 6, 2017 01:17 IST

नाशिक : शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने नाशिक जिल्ह्णासह उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने नाशिक जिल्ह्णासह उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. शेतमालाचे बाजारात होणारे नेहमीचे अवमूल्यन, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि सरकारचे शेतीविरोधी धोरण या व्यवसायाला खड्ड्यात लोटणारे असल्याने शेतकऱ्यांवर उपासमारी आणि आत्महत्येची वेळ आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत असून, शेती व्यवसायात प्रगत मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यालाही शेतकरी आत्महत्येचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे कर्ज काढून शेती करण्यापेक्षा येत्या १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे दीडशे गावे १ जूनपासून संपावर जाणार असून, या संपात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कर्ज काढून पिकविलेल्या शेतीत नुकसानच सहन करावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अल्प भांडवलात कुटुंबाच्या गरजेपुरतेच धान्य पिकविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी गावोगावी बैठका घेण्यासही सुरुवात केली आहे. शेतमालाला योग्य भाव द्या अन्यथा शेतमाल विकणार नाही आणि पिकवणारही नाही, अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे. चांदवड, दिंडोरी, नाशिक, निफाड, इगतपुरी, सिन्नर, कळवण, सटाणा, येवला आदी तालुक्यांमधून शेतकऱ्यांनी विशेष ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांनी संपाचा ठराव केला असून, शेतीमध्ये घाम गाळूनही त्याचा मोबदला मिळत नसल्याने १ जूनपासून शेतकऱ्यांनी संप पुकारून लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.