शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 23:54 IST

देवगाव : गेल्या सप्ताहापासून देवगाव परिसरात थंडीचा जोर वाढ असून वाढ थंडीमुळे पोषण अवस्थेत असेलेल्या द्राक्ष बागावर परिणाम होत आहे. कांदा, गहू पालेभाजा या रब्बीच्या पिकांना थंडीचा फायदा होत असला तरी सलग दोन-तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे कांदा, गहू पालेभाजा आदी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने शेतकरीही धास्तावले आहे.

ठळक मुद्देथंडीच्या या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

देवगाव : गेल्या सप्ताहापासून देवगाव परिसरात थंडीचा जोर वाढ असून वाढ थंडीमुळे पोषण अवस्थेत असेलेल्या द्राक्ष बागावर परिणाम होत आहे. कांदा, गहू पालेभाजा या रब्बीच्या पिकांना थंडीचा फायदा होत असला तरी सलग दोन-तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे कांदा, गहू पालेभाजा आदी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने शेतकरीही धास्तावले आहे.थंडीमुळे तयार झालेल्या द्राक्षबागेतील मण्याना तडे जात आहेत. तयार नसलेल्या द्राक्षेबागेवर भुरीचे प्रमाण वाढत आहे, रात्री थंडी तर दिवसा ऊन या ऊन-सावलीच्या खेळात सनबर्निंगचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे थंडीच्या या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे.गत दोन वर्षांपासून शेतमालाचे भाव कमी-जास्त होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल होता. मात्र शेतमालाचे बाजार भाव आणि कांद्याने रडवल्याने शेतकरी अडचणीत सापडला असताना केवळ द्राक्ष उत्पादनावर आशा आहे.द्राक्ष पिकाला यंदा सुरुवातीला अनुकूल वातावरण मिळाले. पीक बहरून आल्याने बाजारभाव चांगला मिळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र काही दिवसापासून वाढत्या थंडीमुळे द्राक्ष पिकांवरील समस्या वाढल्याने शेतकरी धास्तावला आहे. त्यात सलग दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे इतर रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतीत आहे.शेतीसह मुकी जनावरे यांनाही आजार होण्याची शक्यता आहे, तर रस्त्यावर पाल करून राहत असलेली स्थलांतरीत कुटुंबे थंडीने कुडकुडत आहेत. सकाळी उठून शेतीकामाला सुरुवात करणारे मजूर, शेतकरी थंडीमुळे उशिरा कामाला सुरुवात करतात. एकदरीतच वाढत्या थंडीमुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात थंडीमुळे द्राक्ष बागांवर परिणाम होत आहे. तयार झालेल्या मण्यांना तडे जात आहे. तर ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने इतर पिकांचे नुकसान होणार असून पोषण अवस्थेत असलेल्या द्राक्षावर भुरीचा प्रादूर्भाव वाढत आहे. शिवाय द्राक्ष मण्यांची फुगवणदेखील थांबली आहे.- नानासाहेब सोनवणे, शेतकरी.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस