शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
2
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
5
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
6
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
8
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
9
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
10
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
11
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
12
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
13
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
14
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
15
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
16
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
17
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
18
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
19
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
20
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 23:54 IST

देवगाव : गेल्या सप्ताहापासून देवगाव परिसरात थंडीचा जोर वाढ असून वाढ थंडीमुळे पोषण अवस्थेत असेलेल्या द्राक्ष बागावर परिणाम होत आहे. कांदा, गहू पालेभाजा या रब्बीच्या पिकांना थंडीचा फायदा होत असला तरी सलग दोन-तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे कांदा, गहू पालेभाजा आदी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने शेतकरीही धास्तावले आहे.

ठळक मुद्देथंडीच्या या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

देवगाव : गेल्या सप्ताहापासून देवगाव परिसरात थंडीचा जोर वाढ असून वाढ थंडीमुळे पोषण अवस्थेत असेलेल्या द्राक्ष बागावर परिणाम होत आहे. कांदा, गहू पालेभाजा या रब्बीच्या पिकांना थंडीचा फायदा होत असला तरी सलग दोन-तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे कांदा, गहू पालेभाजा आदी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने शेतकरीही धास्तावले आहे.थंडीमुळे तयार झालेल्या द्राक्षबागेतील मण्याना तडे जात आहेत. तयार नसलेल्या द्राक्षेबागेवर भुरीचे प्रमाण वाढत आहे, रात्री थंडी तर दिवसा ऊन या ऊन-सावलीच्या खेळात सनबर्निंगचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे थंडीच्या या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे.गत दोन वर्षांपासून शेतमालाचे भाव कमी-जास्त होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल होता. मात्र शेतमालाचे बाजार भाव आणि कांद्याने रडवल्याने शेतकरी अडचणीत सापडला असताना केवळ द्राक्ष उत्पादनावर आशा आहे.द्राक्ष पिकाला यंदा सुरुवातीला अनुकूल वातावरण मिळाले. पीक बहरून आल्याने बाजारभाव चांगला मिळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र काही दिवसापासून वाढत्या थंडीमुळे द्राक्ष पिकांवरील समस्या वाढल्याने शेतकरी धास्तावला आहे. त्यात सलग दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे इतर रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतीत आहे.शेतीसह मुकी जनावरे यांनाही आजार होण्याची शक्यता आहे, तर रस्त्यावर पाल करून राहत असलेली स्थलांतरीत कुटुंबे थंडीने कुडकुडत आहेत. सकाळी उठून शेतीकामाला सुरुवात करणारे मजूर, शेतकरी थंडीमुळे उशिरा कामाला सुरुवात करतात. एकदरीतच वाढत्या थंडीमुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात थंडीमुळे द्राक्ष बागांवर परिणाम होत आहे. तयार झालेल्या मण्यांना तडे जात आहे. तर ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने इतर पिकांचे नुकसान होणार असून पोषण अवस्थेत असलेल्या द्राक्षावर भुरीचा प्रादूर्भाव वाढत आहे. शिवाय द्राक्ष मण्यांची फुगवणदेखील थांबली आहे.- नानासाहेब सोनवणे, शेतकरी.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस