शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जऊळके वणी येथील कंपनीच्या प्रदूषणाने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:47 IST

तालुक्यातील जऊळके वणी येथील सहकारी तत्त्वावर उभा केलेला शॅम्पियन वाइन प्रकल्प सभासद शेतकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर खासगी कंपनीला विकत अगोदरच वाºयावर सोडलेल्या शेतकºयांना सुला विनीयार्ड कंपनीच्या प्रदूषणाने हैराण केले आहे.

दिंडोरी : तालुक्यातील जऊळके वणी येथील सहकारी तत्त्वावर उभा केलेला शॅम्पियन वाइन प्रकल्प सभासद शेतकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर खासगी कंपनीला विकत अगोदरच वाºयावर सोडलेल्या शेतकºयांना सुला विनीयार्ड कंपनीच्या प्रदूषणाने हैराण केले आहे. तक्र ार करूनही कारवाई होत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. या विरोधात शेतकºयांनी आंदोलन केल्यास त्यास सदर कंपनी मालक व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील यांनी दिला आहे.  शॅम्पियन प्रकल्पात दिंडोरी, निफाड, नाशिक व चांदवड तालुक्यातील सुमारे ४५०० द्राक्ष उत्पादक शेतकरी सभासद झाले १ कोटी ४ लाख रु पयांचे शेअर्स जमा करण्यात आले व एमएससी बँकेकडून शासनाची काही रक्कम असा पाच कोटींचा शॅम्पियन प्रकल्प उभा करण्यात आला. परंतु काही तांत्रिक बाबी व विक्र ीअभावी प्रकल्प बंद पडल्याने एमएससी बँकेने प्रकल्पाला दिलेले कर्ज थकले. त्यामुळे प्रकल्प विकण्यात आला.  सध्याच्या जमीनमालकाने खरेदीस अनेक अडचणी येत असतानाही अधिकाºयांना हाताशी धरून प्रकल्प केवळ पाच कोटी ११ लाखांनी विकत घेतला. त्यामध्ये स्थानिक शेतकºयांनी मोफत दिलेली करोडो रु पयांची जमीन, ४५०० सभासदांच्या शेअर्सची रक्कम याचा कुठलाही विचार केला नाही. केवळ वरिष्ठ अधिकाºयांना हाताशी धरून शेतकºयांवर अन्याय केला. या प्रकल्पात सध्या द्राक्षापासून वाइननिर्मितीचे काम गेल्या सात ते आठ वर्षांपासून चालू आहे. प्रकल्पामुळे आपले द्राक्षांची विक्र ी होईल व आपल्या द्राक्षाला योग्य मोबदला मिळेल अशीही शेतकºयांना अपेक्षा होती.  परंतु आपल्या मनमानीपणाने बेभावात द्राक्षमाल खरेदी करायचा व संबंधित शेतकºयांवर अन्याय करायचे काम मालकाने सुरू केले आहे. प्रकल्पातून निघणाºया खराब पाण्यामुळे परिसरातील जमीनमालकांंना प्रदूषणाचा त्रास होत आहे.  परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी कंपनीकडे आणि पोलीस ठाण्यातही अर्ज दिलेले आहे. परंतु कंपनी फक्त दोन चार दिवत तात्पुरता बंदोबस्त करीत वेळ ढकलत आहे. जऊळके वणी येथे असलेला दुर्गंधीयुक्त वायनरी  प्रकल्प तेथून हलवला नाही, तर परिसरातील शेतकरी कुठलाही टोकाचा मार्ग अवलंबतील व होणाºया परिणामांची जबाबदारी कंपनी मालक, पोलीस ठाणे,अधिकारी यांच्यावर राहील, लवकरच लोकप्रतिनिधींमार्फत मुख्यमंत्री, प्रदूषण विभाग यांच्याकडे तक्र ार केली जाणार असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील यांनी सांगितले.२४ तास या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली असते. डासांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेजारील वस्तीवरील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांना डेंग्यूसारखे रोग होत आहेत. जनावरांच्या व नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ग्रामपंचायतीकडे तक्र ार करु नही सदर मालक थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहे. परिसरातील नागरिक वेळोवेळी कंपनीकडे तक्र ार करत आहेत. परंतु कंपनी दोन-चार दिवसांत बंदोबस्त करू असे सांगत वेळ मारून नेत आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणFarmerशेतकरीagricultureशेती