शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

जऊळके वणी येथील कंपनीच्या प्रदूषणाने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:47 IST

तालुक्यातील जऊळके वणी येथील सहकारी तत्त्वावर उभा केलेला शॅम्पियन वाइन प्रकल्प सभासद शेतकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर खासगी कंपनीला विकत अगोदरच वाºयावर सोडलेल्या शेतकºयांना सुला विनीयार्ड कंपनीच्या प्रदूषणाने हैराण केले आहे.

दिंडोरी : तालुक्यातील जऊळके वणी येथील सहकारी तत्त्वावर उभा केलेला शॅम्पियन वाइन प्रकल्प सभासद शेतकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर खासगी कंपनीला विकत अगोदरच वाºयावर सोडलेल्या शेतकºयांना सुला विनीयार्ड कंपनीच्या प्रदूषणाने हैराण केले आहे. तक्र ार करूनही कारवाई होत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. या विरोधात शेतकºयांनी आंदोलन केल्यास त्यास सदर कंपनी मालक व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील यांनी दिला आहे.  शॅम्पियन प्रकल्पात दिंडोरी, निफाड, नाशिक व चांदवड तालुक्यातील सुमारे ४५०० द्राक्ष उत्पादक शेतकरी सभासद झाले १ कोटी ४ लाख रु पयांचे शेअर्स जमा करण्यात आले व एमएससी बँकेकडून शासनाची काही रक्कम असा पाच कोटींचा शॅम्पियन प्रकल्प उभा करण्यात आला. परंतु काही तांत्रिक बाबी व विक्र ीअभावी प्रकल्प बंद पडल्याने एमएससी बँकेने प्रकल्पाला दिलेले कर्ज थकले. त्यामुळे प्रकल्प विकण्यात आला.  सध्याच्या जमीनमालकाने खरेदीस अनेक अडचणी येत असतानाही अधिकाºयांना हाताशी धरून प्रकल्प केवळ पाच कोटी ११ लाखांनी विकत घेतला. त्यामध्ये स्थानिक शेतकºयांनी मोफत दिलेली करोडो रु पयांची जमीन, ४५०० सभासदांच्या शेअर्सची रक्कम याचा कुठलाही विचार केला नाही. केवळ वरिष्ठ अधिकाºयांना हाताशी धरून शेतकºयांवर अन्याय केला. या प्रकल्पात सध्या द्राक्षापासून वाइननिर्मितीचे काम गेल्या सात ते आठ वर्षांपासून चालू आहे. प्रकल्पामुळे आपले द्राक्षांची विक्र ी होईल व आपल्या द्राक्षाला योग्य मोबदला मिळेल अशीही शेतकºयांना अपेक्षा होती.  परंतु आपल्या मनमानीपणाने बेभावात द्राक्षमाल खरेदी करायचा व संबंधित शेतकºयांवर अन्याय करायचे काम मालकाने सुरू केले आहे. प्रकल्पातून निघणाºया खराब पाण्यामुळे परिसरातील जमीनमालकांंना प्रदूषणाचा त्रास होत आहे.  परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी कंपनीकडे आणि पोलीस ठाण्यातही अर्ज दिलेले आहे. परंतु कंपनी फक्त दोन चार दिवत तात्पुरता बंदोबस्त करीत वेळ ढकलत आहे. जऊळके वणी येथे असलेला दुर्गंधीयुक्त वायनरी  प्रकल्प तेथून हलवला नाही, तर परिसरातील शेतकरी कुठलाही टोकाचा मार्ग अवलंबतील व होणाºया परिणामांची जबाबदारी कंपनी मालक, पोलीस ठाणे,अधिकारी यांच्यावर राहील, लवकरच लोकप्रतिनिधींमार्फत मुख्यमंत्री, प्रदूषण विभाग यांच्याकडे तक्र ार केली जाणार असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील यांनी सांगितले.२४ तास या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली असते. डासांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेजारील वस्तीवरील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांना डेंग्यूसारखे रोग होत आहेत. जनावरांच्या व नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ग्रामपंचायतीकडे तक्र ार करु नही सदर मालक थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहे. परिसरातील नागरिक वेळोवेळी कंपनीकडे तक्र ार करत आहेत. परंतु कंपनी दोन-चार दिवसांत बंदोबस्त करू असे सांगत वेळ मारून नेत आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणFarmerशेतकरीagricultureशेती