शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

शेतक-याने पित्याच्या स्मरणार्थ सुरू केली जलसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 16:53 IST

सटवाईवाडीला पाणीटंचाई : टॅँकरचा प्रस्ताव शासनाच्या लालफितीत

ठळक मुद्देसटवाईवाडी येथे नऊ गाव पाणीपुरवठा योजनेतून गावाला पाणीपुरवठा केला जातो.

देवळा : देवळा तालुक्यातील सटवाईवाडी येथे पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाल्यानंतर पंकज अहेर ह्या शेतक-याने आपल्या पित्याच्या स्मरणार्थ स्वखर्चाने टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा सुरू करून जनतेला दिलासा दिला आहे. दरम्यान, सटवाईवाडी ग्रामपंचायतीने शासनाकडे टॅँकर मागणीचा पाठविलेला प्रस्ताव लालफीतीतच अडकलेला आहे.सटवाईवाडी येथे नऊ गाव पाणीपुरवठा योजनेतून गावाला पाणीपुरवठा केला जातो. लोहोणर येथे गिरणा नदीपात्रातील उद्भव विहीर, व विंधन विहीरीतून सटवाईवाडी येथील जलकुंभात पाणी टाकण्यात येते. त्यानंतर ते वितरीत केले जाते. गिरणा नदीच्या पाण्यावर हि योजना अवलंबून आहे. गिरणानदी कोरडी पडल्यामुळे पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. सटवाईवाडी गावात त्वरीत टँकर सुरू करून पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु अद्याप टँकर मिळाला नाही. ग्रामस्थांचे होणारे हाल बघून येथील शेतकरी पंकज अहेर यांनी स्वखर्चाने गावात टँकर सुरू करून गावातील तृषार्त जनतेला दिलासा दिला आहे. यावेळी उपसरपंच अश्विनी अहेर, संभाजी अहेर, प्रा. गोरख निकम, प्रविण मेधने,विलास भामरे, चंद्रकांत अहेर, पुंडलिक अहेर, विजय अहेर, भावडू अहेर, श्रीराम अहेर, रामदास अहेर,रविंद्र अहेर,हेमंत अहेर, गणेश अहेर आदी उपस्थित होते.टँकर सुरू होत नाही तोपर्यंत  पाणीपुरवठाशासनाकडे टँकरची मागणी करूनही अद्याप टँकर मिळाला नाही. गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ भाडयाचा टँकर घेऊन दिवसभर गावात तसेच वाडी, वस्त्यावर घरोघरी जाऊन पाणी वाटप सुरू केले आहे. दिवसभरात टँकरच्या चार ते पाच खेपा होतात. शासकीय टँकर सुरू होत नाही तोपर्यंत स्वखर्चाने गावाला टँकरने पाणीपुरवठा करणार आहे.- पंकज अहेर , शेतकरी, सटवाईवाडी

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ