शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

विरोधी धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी  : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:21 IST

केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळेच खºया अर्थाने शेतकºयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली असून, जोपर्यंत शेतकºयांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना आपले जनआंदोलन चालूच ठेवणार असून, राज्यातील सर्व शेतकºयांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला साथ द्यावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केले.

मेशी : केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळेच खºया अर्थाने शेतकºयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली असून, जोपर्यंत शेतकºयांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना आपले जनआंदोलन चालूच ठेवणार असून, राज्यातील सर्व शेतकºयांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला साथ द्यावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. २२) देवळा तालुक्यातील मेशी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.  मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती केदा शिरसाठ होते. देशातील सर्व शेतकरी संघटना व २५ राज्यांतील शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय किसान मुक्ती संसदेची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकºयांना पूर्णपणे कर्जमुक्त करण्याचा अधिकार व उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव मिळवून देण्याचा अधिकार अशी दोन विधेयके आपण संसदेत मांडणार असून, ही दोन्ही विधेयके मंजूर करण्यासाठी वेळप्रसंगी संपूर्ण देशभर शेतकºयांना जनआंदोलन छेडावे लागेल, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.  यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफळे, सरला जाधव, मेशीच्या सरपंच ललिता शिरसाठ, माजी सरपंच बापू जाधव, विश्वास जाधव, प्रवीण शिरसाठ, दादाजी शिरसाठ, राजेंद्र ब्राह्मणकार, कुबेर जाधव, महादू मोरे, साहेबराव मोरे, कळवण तालुकाध्यक्ष रामकृष्ण जाधव, देवळा तालुकाध्यक्ष रवींद्र शेवाळे, बागलाण तालुकाध्यक्ष सुभाष अहिरे, गोपीनाथ झाल्टे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.  मेळावा यशस्वीतेसाठी युवा नेते राजू शिरसाठ, प्रवीण पवार, समाधान गरुड, मोठाभाऊ मोरे, महेंद्र बोरसे, तुकाराम चव्हाण, तुषार शिरसाठ, पवन गरुड, पंकज बोरसे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक मेळाव्याचे आयोजक राजेंद्र शिरसाठ यांनी, तर सूत्रसंचालन भिला अहेर यांनी केले. कांद्याचे भाव कायम राहावेत शेतकºयांना सध्या कांद्याचे दोन पैसे जास्त मिळत असून, आगामी काळात कांद्याचे भाव असेच स्थिर राहण्यासाठी व कांद्याचे निर्यातमूल्य शून्य करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी दिली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार, जिल्हाप्रमुख गोविंद पगार, पंढरपूर येथील युवा शेतकरी रणजित बागल यांनी मनोगत व्यक्त केले.

 

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा