शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

रोहित्रासाठी शेतकऱ्यांचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 15:14 IST

सटाणा: तालुक्यात ऐन रब्बी हंगामात विजेचा खेळखंडोबा झाला असून रोहित्र जळाल्याचे प्रकार दररोज घडत आहे. पंधरा पंधरा दिवस रोहित्र मिळत नसल्याने रब्बीचे पिके धोक्यात आली असुन रोहित्र तत्काळ मिळावे या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी (दि.१९) अकरा वाजता करंजाडजवळ चक्काजाम करून शिर्डी-साक्र ी महामार्ग एक तास रोखून धरला .

सटाणा: तालुक्यात ऐन रब्बी हंगामात विजेचा खेळखंडोबा झाला असून रोहित्र जळाल्याचे प्रकार दररोज घडत आहे. पंधरा पंधरा दिवस रोहित्र मिळत नसल्याने रब्बीचे पिके धोक्यात आली असुन रोहित्र तत्काळ मिळावे या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी (दि.१९) अकरा वाजता करंजाडजवळ चक्काजाम करून शिर्डी-साक्र ी महामार्ग एक तास रोखून धरला . वीज महावितरण कंपनीच्या अधिकार्यांनी चोवीस तासात रोहित्र बदलून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. बागलाण तालुक्यातील वीज महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराला शेतकरीत्रस्त झाले आहेत .ऐन कांदा लागवडीत सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यामुळे अनेक शेतकºयांचे कांदा रोपे पाण्या अभावी करपून गेले आहे .गहू ,हरभर्याची देखील हीच अवस्था आहे .ज्या भागात सुरळीत वीज आहे त्या ठिकाणी मात्र रोहित्र मोठ्याप्रमाणात जळत आहेत .पंधरा पंधरा दिवस रोहित्र जळूनही वीज कंपनीकडून रोहित्र बदलून दिले जात नाही .त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे .करंजाड येथील कृषीचे रोहित्र जळून पंधरा दिवस उलटले तरी अद्याप रोहित्र बदलून मिळत नसल्यामुळे संतप्त करंजाड येथील शेतकºयांनी बिंदू शर्मा .सुधाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता करंजाड बसस्थानका समोर चक्काजाम करून शिर्डी-साक्र ी महामार्ग एक तास रोखून धरला .आंदोलनाची माहिती मिळताच वीज महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सुनील बोंडे यांनी तत्काळ आंदोलन करणार्या शेतकर्यांशी संपर्क साधून चोवीस तासात रोहित्र बदलण्याचे आश्वासन दिले .तसेच ज्या ठिकाणी अतिरिक्त विजेचा भार आहे .अशा ठिकाणच्या रोहीत्रांची क्षमता वाढविण्यात येईल असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले .त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले .आंदोलनात पंडित देवरे ,मालती देवरे राकेश देवरे ,मधुकर शेवाळे ,दिलीप शेवाळे ,अनिल शेवाळे .घनशाम शेवाळे ,जगन अहिरे ,दादा शेवाळे ,शरद शेवाळे ,साधू शेवाळे ,सयाजी अहिरे पोपट शेवाळे आदी शेतकरी सहभागी झाले होते .

टॅग्स :Nashikनाशिक