शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

रोहित्रासाठी शेतकऱ्यांचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 15:14 IST

सटाणा: तालुक्यात ऐन रब्बी हंगामात विजेचा खेळखंडोबा झाला असून रोहित्र जळाल्याचे प्रकार दररोज घडत आहे. पंधरा पंधरा दिवस रोहित्र मिळत नसल्याने रब्बीचे पिके धोक्यात आली असुन रोहित्र तत्काळ मिळावे या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी (दि.१९) अकरा वाजता करंजाडजवळ चक्काजाम करून शिर्डी-साक्र ी महामार्ग एक तास रोखून धरला .

सटाणा: तालुक्यात ऐन रब्बी हंगामात विजेचा खेळखंडोबा झाला असून रोहित्र जळाल्याचे प्रकार दररोज घडत आहे. पंधरा पंधरा दिवस रोहित्र मिळत नसल्याने रब्बीचे पिके धोक्यात आली असुन रोहित्र तत्काळ मिळावे या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी (दि.१९) अकरा वाजता करंजाडजवळ चक्काजाम करून शिर्डी-साक्र ी महामार्ग एक तास रोखून धरला . वीज महावितरण कंपनीच्या अधिकार्यांनी चोवीस तासात रोहित्र बदलून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. बागलाण तालुक्यातील वीज महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराला शेतकरीत्रस्त झाले आहेत .ऐन कांदा लागवडीत सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यामुळे अनेक शेतकºयांचे कांदा रोपे पाण्या अभावी करपून गेले आहे .गहू ,हरभर्याची देखील हीच अवस्था आहे .ज्या भागात सुरळीत वीज आहे त्या ठिकाणी मात्र रोहित्र मोठ्याप्रमाणात जळत आहेत .पंधरा पंधरा दिवस रोहित्र जळूनही वीज कंपनीकडून रोहित्र बदलून दिले जात नाही .त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे .करंजाड येथील कृषीचे रोहित्र जळून पंधरा दिवस उलटले तरी अद्याप रोहित्र बदलून मिळत नसल्यामुळे संतप्त करंजाड येथील शेतकºयांनी बिंदू शर्मा .सुधाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता करंजाड बसस्थानका समोर चक्काजाम करून शिर्डी-साक्र ी महामार्ग एक तास रोखून धरला .आंदोलनाची माहिती मिळताच वीज महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सुनील बोंडे यांनी तत्काळ आंदोलन करणार्या शेतकर्यांशी संपर्क साधून चोवीस तासात रोहित्र बदलण्याचे आश्वासन दिले .तसेच ज्या ठिकाणी अतिरिक्त विजेचा भार आहे .अशा ठिकाणच्या रोहीत्रांची क्षमता वाढविण्यात येईल असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले .त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले .आंदोलनात पंडित देवरे ,मालती देवरे राकेश देवरे ,मधुकर शेवाळे ,दिलीप शेवाळे ,अनिल शेवाळे .घनशाम शेवाळे ,जगन अहिरे ,दादा शेवाळे ,शरद शेवाळे ,साधू शेवाळे ,सयाजी अहिरे पोपट शेवाळे आदी शेतकरी सहभागी झाले होते .

टॅग्स :Nashikनाशिक