फॅन्सी क्रमांकाची के्रझ

By Admin | Updated: April 5, 2016 00:23 IST2016-04-05T00:01:54+5:302016-04-05T00:23:47+5:30

कायद्याचे उल्लंघन : वाहतूक शाखेचे दुर्लक्ष

Fancy number crashes | फॅन्सी क्रमांकाची के्रझ

फॅन्सी क्रमांकाची के्रझ

 नाशिक : राज, दादा, भाऊ, आई, साई, नाना असे विविध शब्द संगणकीकृत आकडेवारीवरून तयार करत वाहनांच्या नंबर प्लेटसाठी शहरात वापरले जात असून, याबरोबरच अन्य फॅन्सी स्टाइलच्या नंबर प्लेट लावलेल्या रस्त्यांवरून सर्रासपणे दुचाकी-चारचाकी धावत आहेत; मात्र याकडे शहर वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असल्याने फॅन्सी नंबर प्लेटच्या वाहनांची सध्या ‘चलती’ असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत असून, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून वाहतुकीचा कायदा धाब्यावर बसविला जात असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वाहतूक कायद्यांतर्गत वाहनांवर ठळकपणे इंग्रजी अंकामध्ये वाहनाचा नोंदणी क्रमांक लिहिणे अनिवार्य आहे. तरीदेखील रेडियम आर्टवाल्यांकडून चोरीछुप्या फॅन्सी पद्धतीच्या नंबर प्लेट तयार करून दिल्या जात असून, नागरिकांकडूनदेखील अशा नंबर प्लेट आपल्या वाहनांवर बसविण्यास पसंती दिली जात आहे. यामुळे अशा वाहनांचा अपघात घडल्यास वाहन क्रमांकदेखील स्पष्ट होत नाही. त्यामुळे अनेकदा अपघाताला कारणीभूत ठरणारे घटनास्थळावरून फरार होण्यास यशस्वी होतात व त्यानंतरही त्यांचा पोलिसांना थांगपत्ता लागत नाही. अशा प्रकारच्या दुचाकी-चारचाकी वाहनांवर पोलिसांनी मेहरनजर दाखविली जाऊ नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वाहतूक करत असताना अपघाताची घटना घडल्यास वाहनाचा क्रमांक स्पष्टपणे वाचता यावा व त्यावरून वाहनाची ओळख पटावी म्हणून वाहन क्रमांक एका ठरावीक आकारात व पाच ते दहा फुटाच्या अंतरावरूनही नजरेस पडेल अशा पद्धतीने लिहिणे आवश्यक आहे; मात्र याकडे बहुसंख्य हौशी वाहनचालकांकडून काणाडोळा केला जात असून, सर्रासपणे फॅन्सी क्रमांक लिहून वाहने रस्त्यांवरून मिरविली जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर पुन्हा फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक शाखेसह प्रादेशिक परिवहन विभागाने तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Fancy number crashes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.