शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

नाशिक जिल्ह्यात मृगाने वटारले डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 17:16 IST

पावसाची प्रतीक्षा : खरीपाच्या पेरण्या लांबल्या, पाणीटंचाई तीव्र

ठळक मुद्देमृग नक्षत्रात आतापर्यंत अवघ्या २ टक्के पावसाची नोंद

नाशिक : मृग नक्षत्र संपायला अवघे दोन दिवस उरले असून अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. शेतकऱ्यांनी मशागतीची तयारी करुन ठेवली असली तरी मृग नक्षत्रात आतापर्यंत अवघ्या २ टक्के पावसाची नोंद झालेली आहे. मान्सूनचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील अनेक गावे व वस्ती-पाड्यांमध्ये पाणीटंचाई अधिक तिव्र बनली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठाही संपुष्टात येत असून अवघा ५ टक्के पाणीसाठा उरल्याने पाणी नियोजनाबाबत प्रशासनाचीही कसरत सुरू आहे.मृग नक्षत्र आता अंतिम चरणात आहे. ८ जूनला मृग नक्षत्राला प्रारंभ झाला परंतु, अद्याप हवामान खात्याच्या निरीक्षणानुसार, मान्सूनचे महाराष्टत आगमन झालेले नाही. वायू चक्रीवादळामुळे मान्सूनही भरकटल्याचे सांगितले जात आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या असल्या तरी त्या खरीपाच्या पेरणीसाठी पुरेशा नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पावसासाठी प्रतीक्षा वाढली आहे. जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी १५४ मि.मी. पाऊस पडत असतो. मात्र, यंदा मृग नक्षत्र संपायला आले तरी जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही. आतापर्यंत जिल्ह्यात १ ते १९ जून या कालावधीत सरासरी २४ मि.मी. पाऊस पडला आहे. मागील वर्षी याच कालावधीत सरासरी ३६.७५ मि.मी. पावसाची नोंद झालेली होती. यंदा २.३७ टक्के इतका पाऊस पडला आहे. पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने त्याचा परिणाम खरीपाच्या पेरणीवर दिसून येत आहे. शेतक-यांनी शेतीची मशागत पूर्ण करून पावसाची प्रतीक्षा चालविली असताना मृग नक्षत्राने डोळे वटारल्याने बळीराजा हतबल झालेला आहे. यंदा जिल्ह्यात दुष्काळाची धग तीव्र बनली आहे. अनेक गावांसह वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाईने जनता हैराण झालेली आहे. टॅँकरने होणारा पाणीपुरवठाही अपुरा ठरत आहे. अशा स्थितीत पावसाने ओढ दिल्याने पुन्हा एकदा भयावह संकट उभे राहण्याच्या भीतीने शेतक-यांसह नागरिकांच्या झोपा उडाल्या आहेत.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस