शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

नाशिक जिल्ह्यात मृगाने वटारले डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 17:16 IST

पावसाची प्रतीक्षा : खरीपाच्या पेरण्या लांबल्या, पाणीटंचाई तीव्र

ठळक मुद्देमृग नक्षत्रात आतापर्यंत अवघ्या २ टक्के पावसाची नोंद

नाशिक : मृग नक्षत्र संपायला अवघे दोन दिवस उरले असून अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. शेतकऱ्यांनी मशागतीची तयारी करुन ठेवली असली तरी मृग नक्षत्रात आतापर्यंत अवघ्या २ टक्के पावसाची नोंद झालेली आहे. मान्सूनचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील अनेक गावे व वस्ती-पाड्यांमध्ये पाणीटंचाई अधिक तिव्र बनली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठाही संपुष्टात येत असून अवघा ५ टक्के पाणीसाठा उरल्याने पाणी नियोजनाबाबत प्रशासनाचीही कसरत सुरू आहे.मृग नक्षत्र आता अंतिम चरणात आहे. ८ जूनला मृग नक्षत्राला प्रारंभ झाला परंतु, अद्याप हवामान खात्याच्या निरीक्षणानुसार, मान्सूनचे महाराष्टत आगमन झालेले नाही. वायू चक्रीवादळामुळे मान्सूनही भरकटल्याचे सांगितले जात आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या असल्या तरी त्या खरीपाच्या पेरणीसाठी पुरेशा नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पावसासाठी प्रतीक्षा वाढली आहे. जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी १५४ मि.मी. पाऊस पडत असतो. मात्र, यंदा मृग नक्षत्र संपायला आले तरी जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही. आतापर्यंत जिल्ह्यात १ ते १९ जून या कालावधीत सरासरी २४ मि.मी. पाऊस पडला आहे. मागील वर्षी याच कालावधीत सरासरी ३६.७५ मि.मी. पावसाची नोंद झालेली होती. यंदा २.३७ टक्के इतका पाऊस पडला आहे. पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने त्याचा परिणाम खरीपाच्या पेरणीवर दिसून येत आहे. शेतक-यांनी शेतीची मशागत पूर्ण करून पावसाची प्रतीक्षा चालविली असताना मृग नक्षत्राने डोळे वटारल्याने बळीराजा हतबल झालेला आहे. यंदा जिल्ह्यात दुष्काळाची धग तीव्र बनली आहे. अनेक गावांसह वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाईने जनता हैराण झालेली आहे. टॅँकरने होणारा पाणीपुरवठाही अपुरा ठरत आहे. अशा स्थितीत पावसाने ओढ दिल्याने पुन्हा एकदा भयावह संकट उभे राहण्याच्या भीतीने शेतक-यांसह नागरिकांच्या झोपा उडाल्या आहेत.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस