शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

राष्ट्रपतींकडून दुष्काळावर चिंता व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 1:44 AM

राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करून योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येथील विश्वशांती अहिंसा संमेलनात बोलताना केली. दरम्यान, राज्यातील १७९ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असून, त्यासंदर्भातील अध्यादेश लवकरच काढण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ऋषभदेवपुरम (मांगीतुंगी) : राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करून योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येथील विश्वशांती अहिंसा संमेलनात बोलताना केली. दरम्यान, राज्यातील १७९ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असून, त्यासंदर्भातील अध्यादेश लवकरच काढण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  भगवान ऋषभदेव यांच्या विश्वविक्र मी १०८ फूट उंच मूर्तीच्या निर्माण समितीतर्फे आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन सोमवारी (दि. २२) राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. आपण कझाकीस्तानमध्ये दौऱ्यावर गेलो असता तेथेही दुष्काळी परिस्थिती होती असे तेथील राष्ट्रपतींनी आपल्याला सांगितले होते. आपल्या आगमनावेळी तेथे पाऊस झाला होता, असे सांगून राष्ट्रपती कोविंद यांनी राज्यातील दुष्काळाबाबत आपण चिंतित असल्याचे यावेळी सांगितले.  अध्यक्षस्थानावरून बोलताना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी परिसरातील दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. या मुद्द्याला अनुसरून बोलताना मुख्यमंत्री फडणवीस  वीज बील माफी सारख्या ९ प्रकारच्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले. निसर्गातील वाढत्या असमतोलाकडे लक्ष वेधताना त्यांनी निसर्गाशी छेडछाड करणे बंद न केल्यास मानव जातीचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त करून निसर्गासोबत सहजीवन व सहिष्णूतेने व्यवहार ठेवावा लागण्याची गरजही व्यक्त केली.याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रपतींच्या पत्नी सौ. सविता कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागरराव, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, गणीनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी, आर्यिकारत्न चंदनामती माताजी, पीठाधिश स्वामी रविंद्र कीर्ती, वाशीम येथील आमदार राजेन पाटनी आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षRamnath Kovindरामनाथ कोविंद