शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अक्षय पसायदानासाठी एक तरी वारी अनुभवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 1:32 AM

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल... विठ्ठलाला पहाणं म्हणजे वारी. विठ्ठल बोलणं म्हणजेही वारी. विठ्ठलाशी बोलणं म्हणजे वारी. विठ्ठलाबाबत बोलणंही वारीच. आयुष्यात एखादी गोष्ट वारंवार करीत रहाणे म्हणजे वारी करणे. वारी वारी जन्म मरणाने वारी. ती ही वारी. एकदा दर्शन देऊन जी संपत नाही ती वारी. एकदा आषाढी देवशयनी एकादशीला विठ्ठल झोपला की कार्तिकीलाच उठतो. मग वारकरी पंढरपुरात जातो म्हणजे देवदर्शन घेऊन नांगरणी, पेरणी करून तृप्त होतो.

किशोर पाठकबोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल... विठ्ठलाला पहाणं म्हणजे वारी. विठ्ठल बोलणं म्हणजेही वारी. विठ्ठलाशी बोलणं म्हणजे वारी. विठ्ठलाबाबत बोलणंही वारीच. आयुष्यात एखादी गोष्ट वारंवार करीत रहाणे म्हणजे वारी करणे. वारी वारी जन्म मरणाने वारी. ती ही वारी. एकदा दर्शन देऊन जी संपत नाही ती वारी. एकदा आषाढी देवशयनी एकादशीला विठ्ठल झोपला की कार्तिकीलाच उठतो. मग वारकरी पंढरपुरात जातो म्हणजे देवदर्शन घेऊन नांगरणी, पेरणी करून तृप्त होतो. बाबांनो देव नाही झोपत तो तडक पंढरीतून निघून सरळ आपल्या घरात, शेतात राबायला येतो. तो दळण दळतो, शेतातल्या बियांना अंकुर फोडतो. तो पाऊस होऊन पावसातून बरसतो. आपलं धान्य पिकवतो. फळा-फुलांनी संसार पिकवतो. म्हणून आपण निश्चिंत वारी करायला.स्वत:चं घर, संसार न सोडणाऱ्या सावता माळ्याच्या शेतात तो भेटायला येतो. कांदा मुळा भाजी म्हणत तीच अवघी विठाई माझी म्हणणारा भक्त परमेश्वराला साकडं घालतो. म्हणून पुढची एकादशीची यात्रा सावत्याकडे. ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्या एकत्र येतात. तो क्षण अवर्णनीय. दोघांची गळाभेट सोबत निवृत्ती, सोपान, मुक्ताई आहेच नाथ आहेत. ज्ञानोबा मामाच्या घरी विसाव्याला थांबून पुढे येतात. दोघांचे मार्ग भिन्न. दिवेघाट चढताना एरवीचा धापा टाकणारा म्हातारा सहज जमिनीचं पाणी आढ्याला लागलं म्हणत दिवेघाट चढतो. एकदा घाट चढला की विसावा. मग माउली पावली शरीर टाळ-मृदंग होतो. अंतरात घुमत राहतो. दिंडीत प्रत्येक व्यक्ती माउलीच. एखादा पुढे जातो मधे अडखळतो ‘माउली’ हाक दिली की रस्ता तयार. काय ही शिस्त. प्रत्येकाला एकच ध्यास विठ्ठलाचा. येथे जात धर्म पंथ नाहीत. सगळेच भागवत संप्रदायी. वारीला गेलो तेव्हाची गोष्ट. चालण्याची फार सवय नसल्याने पायाला फोड आले. वरती टळटळीत ऊन, पावसाची वाट पहाणे, बाजूला झाडाखाली विसावलो. सोबतचे मित्र एकमेकांचे पायाचे फोड चाचपत होते. तोच एक म्हातारा, अनवाणी शेजारी येऊन बसला. म्हटलं माउली कुठून आलात. परतूर म्हणाला. म्हटलं पायात काही नाही. फोड येतील. म्हाताºयाने पाय दाखवला. एकही फोड नाही. आम्ही आश्चर्यचकित. म्हटलं, माउली वय किती? पंचाहत्तर. माउली बोलावते, ती घेऊन जाते. आमचे पायाचे फोड आपोआप बरे झाले. माउली खाऊ-पिऊ घालते. वेलापूरपर्यंत सारेच वारकरी थकलेले पण तो धाव्याचा क्षण येताच सगळे वारकरी जीव घेऊन उतारावर पळत सुटतात. जणू तुकोबासारखे झाले आपल्यालाही विठ्ठलदर्शन. माता, माउली डोक्यावर कळशा, हंडे, तुळशीवृंदावन घेऊन पळत सुटतात. विठ्ठलमय होतात. असा विठ्ठल बोलावा, बोलवावा. आयुष्यात एक तरी वारी (ओवी) अनुभवावी. मानवता, सात्त्विकता, अथांग भक्ती काय आहे हे कळतं. निदान ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीसोबत आळंदी-पुणे, देहू-पुणे, पुणे-सासवड मोठ्ठा टप्पा पार करावा. मग माउली पाठीवरून प्रेमाचा हात फिरवते. आपल्याला अक्षय पसायदान देते.(लेखक साहित्याचे अभ्यासकव कवी आहेत.)

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम