शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

वेडिंग इंडस्ट्रीला आर्थिक सवलतींची अपेक्षा : फेडरेशनचे अध्यक्ष संदीप काकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 18:53 IST

कोरोना आटोक्यात येईपर्यंत लग्नसोहोळे नकोच अशी भूमिका मंगल कार्यालय आणि लॉन्सचालकांनी घेतली आहे. मात्र विवाह सोहळ्याशी संबंधित उद्योगांचे होणारे नुकसान लक्षात घेता राज्य शासनाने किमान या व्यावसायिकांना आर्थिक सवलती द्याव्यात, अशी मागणी फेडरेशन ऑफ वेडिंग इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संदीप काकड यांनी केली आहे.

ठळक मुद्दे घरपट्टी, वीजबिलात हवी सवलत; कर्जावरील व्याज माफ करावेफेडरेशन ऑफ वेडिंग इंडस्ट्रीजची मागणी

नाशिक : कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पूर्ण पालन वेडिंग इंडस्ट्रिजशी संबंधित सर्वजण करीत आहेत. उलट कोरोना आटोक्यात येईपर्यंत लग्नसोहोळे नकोच अशीही भूमिका मंगल कार्यालय आणि लॉन्सचालकांनी घेतली आहे. मात्र विवाह सोहळ्याशी संबंधित उद्योगांचे होणारे नुकसान लक्षात घेता राज्य शासनाने किमान या व्यावसायिकांना आर्थिक सवलती द्याव्यात, अशी मागणी फेडरेशन ऑफ वेडिंग इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संदीप काकड यांनी केली आहे. नाशिकमध्ये दोन महिन्यांपूर्वी ही सं‌स्था स्थापन करण्यात आली आहे. यात मंगल कार्यालय व लॉन्स, केटरर्स, मंडप डेकोरेटर्स तसेच फोटो ग्राफर्स अशा विविध संघटनाचे चार प्रमुख पदाधिकारी फेडरेशनवर घेण्यात आले आहेत. कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधावर अध्यक्ष संदीप काकड यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न-राज्य शासनाच्या निर्बंधामुळे आता विवाह सोहोळे बऱ्यापैकी थांबलेले आहेत...काकड- कोरोना नियंत्रणासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पूर्णत: पालन मॅरेज इंडस्ट्रीज करीत आहे. राज्य शासनाने अलीकडेच दोन तासांत २५ जणांच्या उपस्थितीत लग्नसोहळ्यांना परवानगी दिली असली तरी जिल्हा प्रशासनाने १५ मार्चपासूनच लग्नसोहळे बंद केले आहेत. शहरात कोराेनाचा संसर्ग वाढत आहे. देशपातळीवर झपाट्याने कोरोनाबाधित आढळणाऱ्यांमध्ये नाशिकचे नाव आघाडीवर आले आहे, अशावेळी कोरोना नियंत्रणासाठी आणि आपले शहर वाचविण्यासाठी आम्हीच कोरोनाच संकट टळेपर्यंत लग्न सोहोळे न करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रश्न- पण राज्य सरकारने तर २५ जणांमध्ये परवानगी दिली आहे ना..काकड- राज्य सरकारने परवानगी दिली असली तरी आम्ही सामाजिक दायित्वाचा विचार केला आहे. मुळात २५ जणांच्या उपस्थित लग्न सोहोळ्यासाठीदेखील खूप अटी आहेत. वधू-वर वऱ्हाडी यांचे निगेटिव्ह अहवाल हवेत, मंगल कार्यालय आणि संबंधित अन्य सेवा देणाऱ्यांच्यादेखील कोरोना चाचण्या हव्यात हे नियम पाळल्यानंतरही कोरोना संसर्ग झाल्यास निर्बंधाचा काय उपयोग त्यामुळे फेडरेशननेच आता विवाह सोहळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रश्न-आर्थिक नुकसान कसे भरून काढणार?काकड-फेडरेशनशी संबंधित कोणत्याही व्यावसायिक घटकाला राज्य सरकारने पॅकेजमध्ये मदत दिलेली नाही, खरे तर नाशिक शहरातच या इंडस्ट्रीवर किमान दहा हजार लोकांना रोजगार मिळतो म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात लोक अवलंबून आहेत. त्यातच मंगल कार्यालय किंवा लॉन्स चालकला शासन काय पॅकेज देणार? परंतु किमान राज्य शासनाने संबंधित व्यावसायिकांना घरपट्टी, पाणीपट्टी, वीज बिल यात सवलत द्यायला हवी. मंगल कार्यालय किंवा लॉन्स बंद असले तरी त्यांना दोन-तीन लाख रुपयांची घरपट्टी येते. वीजबिल, पाणीपट्टी यांचा स्थिर आकार द्यावाच लागतो. मंडप चालक आणि केटरिंग व्यावसायिकांच्यादेखील मो्ठ्या जागा-गोदामे आहेत. त्यांनाही मोठ्या प्रमाणात खर्च येतो. त्यातच अनेकांनी कर्ज घेतलेले असल्याने व्यवसाय ठप्प असले तरी त्यांना हफ्ते भरावेच लागात. राज्य शासनाने पॅकेज नाही तरी किमान घरपट्टी, पाणीपट्टीत सवलत द्यावी, बँकांकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज ठराविक कालावधीकरिता माफ करावे.

मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :businessव्यवसायNashikनाशिकmarriageलग्न