शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

डोक्यावर पाणी आणून भात रोपे जगविण्यासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 12:51 IST

पेठ - पावसाचे माहेरघर असलेल्या पेठ तालुक्यात या वर्षी पावसाने दडी मारल्याने भातासह नागलीची लावणी रखडली असून रोपे तयार असली तरी पाऊस नसल्याने लावणी करता येत नाही. शिवाय शेतकऱ्यांना डोक्यावर पाणी आणून रोपे जगवण्याची वेळ आली आहे.

पेठ - पावसाचे माहेरघर असलेल्या पेठ तालुक्यात या वर्षी पावसाने दडी मारल्याने भातासह नागलीची लावणी रखडली असून रोपे तयार असली तरी पाऊस नसल्याने लावणी करता येत नाही. शिवाय शेतकऱ्यांना डोक्यावर पाणी आणून रोपे जगवण्याची वेळ आली आहे.साधारण जूलै महिन्याच्या मध्यावर दरवर्षी भाताची लावणी पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यानुसार याही वर्षी नियोजन केले मात्र पाऊस लांबल्याने रोपे तयार असली तरी लावणीसाठी शेतात पाणी साचले नसल्याने शेतकर्यांना इकडून तिकडून पाणी आणून लावणी करावी लागत आहे. डोंगर उतारावर असलेले नागलीची रोपे करपू लागली आहेत. रोपे वाचवण्यासाठी डोक्यावर हंडयाव्दारे पाणी आणून शेतकरी धडपड करत आहेत. अजून काही दिवस पावसाने दडी दिल्यास पेठ तालुक्यातील शेतकºयांचा खरीप हंगाम वाया जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.--------------------कृषी विभागाच्या या वर्षी पेठ तालुक्यातील शेतकर्यांना आधूनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून अद्ययावत भात रोपवाटिका विकिसत करण्यात आल्या आहेत. मात्र पावसाने ओढ दिल्याने भाताची आवणी लांबणीवर पडल्यास त्याचा उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून कृषी विभागाच्या वतीने शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. ज्यांना जलसिंचनाची सुविधा आहे. त्या शेतकºयांनी भाताची लावणी सुरू करावी.-अरविंद पगारे, तालुका कृषी अधिकारी पेठ----------------------------------दरवर्षी आषाढी एकादशीला भाताची लावणी करून शेतकरी वारीला जात होते. या वर्षी वारी बंद असूनही पावसामुळे भाताची लावणी करता येत नाही. शेतात भात, नागाली सह फळझाडांची रोपे तयार झाली आहेत. रोपांची अधिक वाढ झाल्यास उत्पन्नात घट होते. त्यामूळे शेतकरी अडचणीत सापडण्याची चिन्हे दिसत आहेत.-रतन महाले,शेतकरी, पेठ

टॅग्स :Nashikनाशिक