शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

चिमणी वाचविण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज : कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 19:42 IST

दिवसेंदिवस शहरांमध्ये वाढत असलेली सिमेंटची जंगले आणि वृक्षांच्या घटत्या संख्येमुळे जवळपास ७० टक्के चिमण्या शहरातून हद्दपार झाल्या आहेत. तसेच नदीच्या प्रदुषणाचा मुद्दा ऐरणीवर येत असून यासाठी आज अनेक सामाजिक संस्था काम करत आहे. त्यातलीच एक ‘निसर्गसेवक’ संस्था ही गेल्या चार वर्षांपासून नासर्डी नदी म्हणजेच नुकतेच नावारुपाला येत असलेली ‘नंदीनी’ नदीच्या संर्वधनासाठी अहोरात्र काम करत आहे. याच पार्श्चभुमिवर संख्येचे संस्थापक अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी चिमणी संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देजवळपास ७० टक्के चिमण्या शहरातून हद्दपार झाल्या आहेत.नदीच्या संर्वधनासाठी अहोरात्र काम करत आहे यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे

नाशिक : दिवसेंदिवस शहरांमध्ये वाढत असलेली सिमेंटची जंगले आणि वृक्षांच्या घटत्या संख्येमुळे जवळपास ७० टक्के चिमण्या शहरातून हद्दपार झाल्या आहेत. तसेच नदीच्या प्रदुषणाचा मुद्दा ऐरणीवर येत असून यासाठी आज अनेक सामाजिक संस्था काम करत आहे. त्यातलीच एक ‘निसर्गसेवक’ संस्था ही गेल्या चार वर्षांपासून नासर्डी नदी म्हणजेच नुकतेच नावारुपाला येत असलेली ‘नंदीनी’ नदीच्या संर्वधनासाठी अहोरात्र काम करत आहे. याच पार्श्चभुमिवर संख्येचे संस्थापक अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी चिमणी संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले.प्रश्न : नासर्डी बचाव उपक्रमाची सुरुवात कशी झाली?कुलकर्णी : माझ्या परिसरात पिण्याच्या पाण्याची होत असलेली नासाडी बघून मी त्यासाठी जनजागृती पत्रके वाटत फिरायचो. मात्र याला प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने यासाठी उपाययोजना कराव्यात यासाठी मी प्रयत्न सुरु केले. तसेच नासर्डीच्या जवळच राहत असल्याने लहानपणापासून नदीचे होत असलेले प्रदुषण बघत होतो. त्यामुळे तीला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यासाठी महापालिकेसोबत अनेक विषयावर चर्चाही केली मात्र त्यांच्याकडून न मिळणारा सकारात्मक प्रतिसाद बघून यासाठी काही जणांना घेवुन ‘निसर्गसेवक’ संस्थेची स्थापना केली व मित्रांच्या वाढदिवसाच्या दिवशी नदीच्या किनारी वृक्षरोपण करत गेलो. त्यांनतर नासर्डीचे नाव नंदिनी करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर जसा गोदात्सव साजरा केला जातो तसा नंदिनीउत्सव सुरुकेला. यासाठी दिवाळीत नदीच्या किनारी दिपोत्सव व शिवार फेरी सुरु केली. तसेच नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी येथे गणपती मुर्तींचे विर्सजन न होऊन देता संकलन केले. तसेच प्रदुषणमक्त नासर्डीसाठी पाठपुरावा केल्यामुळे नुकतेच महापालिकेने नदी साफ करण्यासाठी नदीत राबोट उतरविण्याचा निर्णय घेतला. तसेच पुढेही असेच कार्य करत राहणार आहे.प्रश्न : चिमणी बचाव उपक्रमाचा उद्देश काय आहे?कुलकर्णी : सर्वात जास्त संख्या असणारा पक्षी म्हणून चिमणी परिचयाची आहे. मात्र दिवसेंदिवस शहरांमध्ये वाढत चालेली सिमेंटचे जंगले आणि वृक्षांच्या घटत्या चिमण्यांच्या संख्येत घट होत आहे. कधी काळी अंगणात, घरात आणि अनेक वेळा जेवणाच्या ताटाजवळ येऊन बसणारी चिमणी आता दिसेनासी झाली आहे. मात्र या चिमण्यांना परत आणण्यासाठी आणि त्यांना वाचविण्यासाठीच मी उपाययोजना सुरु केली. यासाठी आजवर अनेक वनउद्यानात चिमण्यासाठी घरटे, पिण्याच्या पाण्याचे भांडे बसविण्याचे काम सुरु आहे. संस्थेतर्फे पांडवलेनी उद्यानात ‘चिमन्यांची वस्ती’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यात संस्थेतर्फे उद्यानात चिमण्यांना राहण्यासाठी लाकडी घरटे तयार करुन अनेक झाडांवर ही घरटे लावण्यात आली. तसेच उन्हाळ्यात अनेक ठिकाणी चिमण्यांना पिण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडे बसविणार आहे. तसेच यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असून आपल्या घराच्या छतावर किंवा परिसरातील झाडांवर घरटे व पिण्याच्या पाण्याची भांडी लावावी. जेणेक रुन चिमण्याच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल

टॅग्स :Nashikनाशिकinterviewमुलाखतpollutionप्रदूषणbirds sanctuaryपक्षी अभयारण्य