शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

जुलै संपत आला तरीही शेती कोरडीच; अवघी ७५ टक्के पेरणी

By संदीप भालेराव | Updated: July 27, 2023 13:08 IST

दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी चिंतेत

नाशिक : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर सुरू असल्याने शेती पिकांचे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झालेली असताना नाशिक जिल्हा मात्र अजूनही कोरडाच आहे. जुलै महिना संपत आला असताना ही जिल्ह्यातील पेरणी अवघी ७५ टक्के इतकीच झाली असल्याने अनेक तालुक्यांमध्ये दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. सध्या जिल्ह्यात केवळ रिमझिम पावसाचा वर्षाव होत असल्याने त्यावरच पेरणी टिकून असल्याचे एकूणच चित्र आहे.

राज्यात वरुणराजाची कृपादृष्टी बरसणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केल्यानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमधील धरणे भरली आहेत तर काही धरणांमधून विसर्ग करावा लागला आहे. संपूर्ण राज्यात पाऊस बरसला असताना नाशिकवर मात्र पावसाची अजूनही कृपादृष्टी झालेली नाही. त्याचा फटका शेती कामांना बसला असून जिल्ह्यात केवळ ७२ टक्के इतकीच पेरणी क्षेत्र झाले आहे. अजूनही पुरेसा पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे.

जून महिन्याच्या सुरुवातील जिल्ह्यात चांगल्या पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर मात्र पावसाने दिलेली ओढ कायम असून अधून मधून बरसणाऱ्या पाऊसधारा व्यतिरिक्त दमदार पावसाला म्हणावी तशी सुरुवात झालेली आहे. पावसाचे तालुके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पाऊस झाला असला तरी तेथेही जेमतेम पेरणी झाल्याचे दिसून येते. त्र्यंबकेश्वरला ४०.३५ तर इगतपुरीत ७१.३१ टक्के इतकी पेरणी झाली आहे. येवल्यामध्ये कापसाचे क्षेत्र असल्यामुळे याठिकाणी १०५ टक्के इतकी कापूस लागवड झाल्याचे दिसून येते.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक