शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जुलै संपत आला तरीही शेती कोरडीच; अवघी ७५ टक्के पेरणी

By संदीप भालेराव | Updated: July 27, 2023 13:08 IST

दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी चिंतेत

नाशिक : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर सुरू असल्याने शेती पिकांचे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झालेली असताना नाशिक जिल्हा मात्र अजूनही कोरडाच आहे. जुलै महिना संपत आला असताना ही जिल्ह्यातील पेरणी अवघी ७५ टक्के इतकीच झाली असल्याने अनेक तालुक्यांमध्ये दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. सध्या जिल्ह्यात केवळ रिमझिम पावसाचा वर्षाव होत असल्याने त्यावरच पेरणी टिकून असल्याचे एकूणच चित्र आहे.

राज्यात वरुणराजाची कृपादृष्टी बरसणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केल्यानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमधील धरणे भरली आहेत तर काही धरणांमधून विसर्ग करावा लागला आहे. संपूर्ण राज्यात पाऊस बरसला असताना नाशिकवर मात्र पावसाची अजूनही कृपादृष्टी झालेली नाही. त्याचा फटका शेती कामांना बसला असून जिल्ह्यात केवळ ७२ टक्के इतकीच पेरणी क्षेत्र झाले आहे. अजूनही पुरेसा पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे.

जून महिन्याच्या सुरुवातील जिल्ह्यात चांगल्या पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर मात्र पावसाने दिलेली ओढ कायम असून अधून मधून बरसणाऱ्या पाऊसधारा व्यतिरिक्त दमदार पावसाला म्हणावी तशी सुरुवात झालेली आहे. पावसाचे तालुके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पाऊस झाला असला तरी तेथेही जेमतेम पेरणी झाल्याचे दिसून येते. त्र्यंबकेश्वरला ४०.३५ तर इगतपुरीत ७१.३१ टक्के इतकी पेरणी झाली आहे. येवल्यामध्ये कापसाचे क्षेत्र असल्यामुळे याठिकाणी १०५ टक्के इतकी कापूस लागवड झाल्याचे दिसून येते.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक