शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

जुलै संपत आला तरीही शेती कोरडीच; अवघी ७५ टक्के पेरणी

By संदीप भालेराव | Updated: July 27, 2023 13:08 IST

दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी चिंतेत

नाशिक : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर सुरू असल्याने शेती पिकांचे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झालेली असताना नाशिक जिल्हा मात्र अजूनही कोरडाच आहे. जुलै महिना संपत आला असताना ही जिल्ह्यातील पेरणी अवघी ७५ टक्के इतकीच झाली असल्याने अनेक तालुक्यांमध्ये दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. सध्या जिल्ह्यात केवळ रिमझिम पावसाचा वर्षाव होत असल्याने त्यावरच पेरणी टिकून असल्याचे एकूणच चित्र आहे.

राज्यात वरुणराजाची कृपादृष्टी बरसणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केल्यानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमधील धरणे भरली आहेत तर काही धरणांमधून विसर्ग करावा लागला आहे. संपूर्ण राज्यात पाऊस बरसला असताना नाशिकवर मात्र पावसाची अजूनही कृपादृष्टी झालेली नाही. त्याचा फटका शेती कामांना बसला असून जिल्ह्यात केवळ ७२ टक्के इतकीच पेरणी क्षेत्र झाले आहे. अजूनही पुरेसा पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे.

जून महिन्याच्या सुरुवातील जिल्ह्यात चांगल्या पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर मात्र पावसाने दिलेली ओढ कायम असून अधून मधून बरसणाऱ्या पाऊसधारा व्यतिरिक्त दमदार पावसाला म्हणावी तशी सुरुवात झालेली आहे. पावसाचे तालुके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पाऊस झाला असला तरी तेथेही जेमतेम पेरणी झाल्याचे दिसून येते. त्र्यंबकेश्वरला ४०.३५ तर इगतपुरीत ७१.३१ टक्के इतकी पेरणी झाली आहे. येवल्यामध्ये कापसाचे क्षेत्र असल्यामुळे याठिकाणी १०५ टक्के इतकी कापूस लागवड झाल्याचे दिसून येते.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक