शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
3
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
4
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
5
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
6
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
7
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
8
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
9
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
11
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
12
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
13
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
14
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
15
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
16
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
17
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
18
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
19
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
20
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवस धावूनही मिळाले केवळ दीड लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:19 IST

नाशिक : कोरेानाच्या दुसऱ्या लाटेत अडीच महिने बंद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस १०० टक्के क्षमतेने सुरू झाल्या असल्या ...

नाशिक : कोरेानाच्या दुसऱ्या लाटेत अडीच महिने बंद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस १०० टक्के क्षमतेने सुरू झाल्या असल्या तरी प्रवाशांचा पुरेसा प्रतिसाद नसल्याने गेल्या आठ दिवसात नाशिक विभागाला केवळ १ लाख ६२ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. जिल्हांतर्गत तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्या विविध मार्गावर सुरू असतानाही महामंडळाला सरासरी दररोज २० हजार इतकेच उत्पन्न मिळत आहे.

मागील वर्षापासून केारोनामुळे एस. टी. महामंडळाचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. पहिल्या लाटेनंतर महामंडळाने गती घेतली असतांनाच दुसऱ्या लाटेच्या कोंडीत महामंडळ सापडले आणि तब्बल दोन महिने बसेस निर्बंधात अडकून पडल्या. जिल्ह्यात २४ मेपासून केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे उत्पन्नदेखील जमेतेमच राहिले. त्यानंतर कोरेाना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने नाशिकचा समावेश तिसऱ्या टप्प्यात झाला आणि प्रवासी वाहतुकीला हिरवा झेंडा मिळाला.

जिल्ह्यातील बसेसला स्टँडिंग प्रवासी वगळून शंभर टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी मिळाल्याने पहिल्या दिवसांपासून विविध मार्गांवर सुमारे २१६ बसेस सोडण्यात आल्या. जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या मार्गांवर तसेच धुळे, पुणे, मुंबई,औरंगाबाद येथे बसेस सोडण्यात आल्या असल्या तरी प्रवासी नसल्यामुळे पहिल्या दिवशी महामंडळाला अवघे १२ ते १५ हजार इतकेच उत्पन्न मिळाले होते. काही दिवसांनी प्रवासी एस.टी.कडे वळतील अशी अपेक्षा असल्याने नाशिक विभागाने बससेची संख्या वाढवूनही अपेक्षित प्रवासी मिळू शकलेले नाही.

सद्यस्थितीत महामंडळाच्या २५० बसेस विविध मार्गांवर सुरू असून, दररोज किमान ५२० ते ५५० इतक्या फेऱ्या करीत आहेत. असे असतानाही दररोज किमान २० हजारांच्या जवळपास उत्पन्न मिळत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये केवळ १ लाख ६२ इतकेच उत्पन्न मिळालेले आहे. यामध्ये मुंबई, पुणे तसेच धुळे मार्गावर धावणाऱ्या बसेसला बऱ्यापैकी उत्पन्न मिळत आहे. गेल्या आठ दिवसांच्या कालावधीत प्रवाशांचा असलेला प्रतिसाददेखील थंड असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महामंडळालादेखील उत्पन्नाची चिंता लागली आहे.

--इन्फो--

बसेसचे फेरनियोजन शक्य

सध्या जिल्हा ते तालुका तसेच तालुका ते तालुका अशा मार्गांवर बसेस सुरू करून उत्पन्न वाढीचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र या बसेसलादेखील अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने या बसेसचे फेरनियोजन केले जाण्याची शक्यता आहे. आठ दिवसांतील जेमतेम उत्पन्न पाहता शहरातील काही बसेस सुरू केली जाण्याचीदेखील शक्यता आहे.