शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

चार दिवस उपचारानंतरही ५५ टक्के रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:15 IST

नाशिक: नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल होण्यासाठी खाटा उपलब्ध होत नसल्याची ...

नाशिक: नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल होण्यासाठी खाटा उपलब्ध होत नसल्याची वस्तुस्थिती असताना प्रत्यक्षात मात्र खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये चार दिवसांपेक्षा अधिक दिवस उपचार घेऊन बाधित रुग्ण दगावण्याचे प्रमाण ५५ टक्के असल्याची धक्कादायक वास्तव समाेर आले आहे. विशेष म्हणजे बाधित रुग्ण घरात असतांना होणाऱ्या मृत्यूपेक्षा रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जवळपास ९७ टक्के इतके आहे.

नाशिक जिल्ह्यात सुमारे ३३ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनाने बाधित असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णांच्या संख्येत दररोज सुमारे तीन ते चार हजारांची भर पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच रुग्णालये हाऊसफुल्ल झाले आहेत. अनेकांना रुग्णालयात खाटा उपलब्ध नाहीत म्हणून परत पाठविले जात आहे तर काही ठिकाणी खाटा असल्या तर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर नसल्याचे कारण देत रुग्णांना नाकारण्यात येत आहे. जे रुग्ण दाखल आहेत, त्यांना वाचविण्यासाठी डॉक्टर, रुग्णांचे नातेवाईक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. प्रसंगी रेमडेसिविर, टोसी सारख्या इंजेक्शनसाठी धावपळ करून काळाबाजारात जादा दराने खरेदी करीत आहेत. साधारणत: दहा ते बारा दिवसात रुग्ण बरे होऊन घरी सोडले जात असले तरी, आजवर झालेेल्या ३६९२ मृत्यूंची आरोग्य विभागाने कारणमीमांसा केली असता, त्यात चार दिवसांपेक्षा अधिक दिवस रुग्णालयात उपचार घेऊनदेखील २०३० रुग्णांचा मृत्यू झाल्याचा म्हणजेच एकूण ५४.९८ टक्के मृत्यूचा धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात शहरी भागाइतक्याच प्रमाणात काेरोना बाधित रुग्ण दगावले असून, संशयित रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. परंतु काही रुग्णांना लक्षणे असूनही त्यांनी दुर्लक्ष करून घरच्या घरीच उपचार करण्यावर भर दिला. अशा घरातच राहून उपचार करणाऱ्या सुमारे ११५ रुग्णांचा घरीच मृत्यू झाला आहे. त्याचे प्रमाण ३ टक्के इतके आहे. एक ते सलग तीन दिवस रुग्णालयात उपचार घेऊन मृत्यू होण्याचे प्रमाणही अधिक आहे. रुग्णालयात उपचार होतांना मृत्यू होण्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकले नसले तरी, रुग्णांची प्रकृती गंभीर असणे व उपचाराला प्रतिसाद न देणे ही त्यामागची कारणे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

--------

उपचाराचे दिवस व मृत्यूचे प्रमाण

१) घरी मृत्यू पावलेले- ११५ (३.११)

२) एक दिवस उपचार - ७४८ (२०.२६)

३) दोन दिवस उपचार- ४३४ (११.७६)

४) तीन दिवस उपचार - ३६५ (९.८९)

५) चार दिवसानंतर उपचार - २०३० (५४.९८)