अ‍ॅट्रॉसिटी प्रतिबंध समित्या स्थापणार

By Admin | Updated: September 23, 2016 00:39 IST2016-09-23T00:38:41+5:302016-09-23T00:39:39+5:30

भाऊसाहेब अहिरे : चिराई येथे विचारमंथन बैठक संपन्न

Establishment of the Atrocity Prevention Committee | अ‍ॅट्रॉसिटी प्रतिबंध समित्या स्थापणार

अ‍ॅट्रॉसिटी प्रतिबंध समित्या स्थापणार

नामपूर : येत्या २४ तारखेला मराठा
क्रांती मोर्चा होणार असून, यानंतर शासनाने काहीच निर्णय न घेतल्यास प्रत्येक गावात व तालुक्यात बोगस अ‍ॅट्रॉसिटी रोखण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी प्रतिबंध समित्या स्थापणार असल्याचे प्रतिपादन खालचे टेंभेचे सरपंच भाऊसाहेब अहिरे यांनी चिराई येथे आयोजित विचारमंथन बैठकीत केले.
बागलाण तालुक्यात आता मराठा क्रांती मूक मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, मोर्चा झाल्यावर पुढे काय याबाबत तालुक्यातील नेत्यांची एक विचारमंथन बैठक संपन झाली. याप्रसंगी ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील, अरविंद सोनवणे, पांडुरंग सोनवणे, खेमराज कोर, अशोक सावंत, काकाजी रौंदळ, किशोर कदम, यतिन पगार, दीपक पगार, शैलेश सूर्यवंशी, प्रकाश निकम, प्रशांत सोनवणे, सुनील ठाकरे, भास्कर भामरे, मधुकर देवरे, डॉ. शेषराव पाटील, नानाजी दळवी, शकुंतला पाटील, गंगाधर अहिरे यांसह समाजातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. आता मराठ्यांना शांत बसून चालणार नाही. काळ वैऱ्याचा आहे. उद्या मराठा समाजाचे मोर्चे संपल्यावर खोट्या अ‍ॅट्रॉसिटी दाखल होतील. यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन तालुका स्तरावर एक समिती स्थापन करावी लागणार असल्याचे रामचंद्रबापू पाटील यांनी नमूद केले. या समितीत समाजातील वकील, डॉक्टर, पत्रकार, सेवानिवृत्त पोलीस, अभियंता, शिक्षक, प्राध्यापक, शेतकरी, शेतमजूर, महिला, पुरुष, सरपंच, सेवानिवृत्त पोलीसपाटील तसेच प्रत्येक गावातील एका नागरिकास या समितीत सदस्य म्हणून घेतले जाणार आहे. पुढील आठवड्यात ही समिती निर्माण केली जाणार असल्याची घोषणा पाटील यांनी केली. ज. ल. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Establishment of the Atrocity Prevention Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.