शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

कांदा लागवडीत शेतकरी व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:02 IST

दत्ता महाले । येवला : कांद्याचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा कांद्याचे दर मागील एक ते दोन ...

ठळक मुद्देलगबग : बाजारभाव मिळतो की नाही याची शाश्वती नसल्याने चिंता

दत्ता महाले ।येवला : कांद्याचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा कांद्याचे दर मागील एक ते दोन महिन्यांपासून टिकून असल्याने तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड करत असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी महिना संपेपर्यंत कांदा लागवड सुरू राहणार आहे.दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात कांदा रोपे खराब झाली. अवकाळी पावसाने तब्बल तीनदा रोपे वाया गेल्याने सध्या रोपाला सोन्याचा भाव मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कांदा लागवड न करता महागड्या दराने रोपे विकून आर्थिक प्राप्ती करून घेत आहे. तर तालुक्याच्या काही भागात यंदा समाधानकारक पावसामुळे कांदा लागवडीवर भर आहे. एकीकडे घरची रोपे सडून गेली तर दुसरीकडे बाजार समित्यात कांद्याचे भाव गगनाला भिडत असल्याने महागड्या किमतीने का होईना मिळेल तेथून रोपे घेऊन कांदा लागवडीसाठी शेतकरी वर्गाची लगीनघाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महिनाभरापासून येवला तालुक्यातील सर्वच भागात वातावरणात सातत्याने बदल होत आहे.पहाटे पडणाºया दाट धुक्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. वातावरण बदलामुळे कांद्यावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरु वात झाली आहे. दाट धुक्याने नवीन कांदा लागवड धोक्यात आली असून, लागवड केलेल्या कांद्याचे शेंडे पिवळसर पडत असल्याने सातत्याने औषध फवारणी कांद्यावर करावी लागत असल्याने कीटकनाशकांचा खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कांद उत्पादन झाल्यानंतर बाजारात शाश्वत दर मिळेल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.मजुरांची वानवा; मजुरीही वाढलीयेवला तालुक्यातील राजापूर, पाटोदा, मानोरी बुद्रुक, चिचोंडी,नेऊरगाव, देशमाने, जळगाव नेऊर, कोटमगाव, अंदरसूल, नगरसूलआदी भागात अद्यापही कांदा लागवडीसाठी मजुरांची वानवा भासतआहे. मजूर वेळेत उपलब्ध होत नसल्याने अनेक ठिकाणी विकत घेतलेली रोपे खराब होत चालली असून, मजुरीचा दरदेखील वाढला आहे. सध्या कांदा लागवडीचा प्रतिएकर भाव हा तब्बल आठ हजार रु पयांपर्यंत पोहचला असून, ज्या ठिकाणी मजूर उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी शेतकरी जादा पैसे देऊन मजूर आपल्या शेतात बोलवत असल्याचेही दिसून येत आहे.औषध फवारणीचा खर्च वाढलाकांदा दर चांगल्या प्रकारे टिकून असल्याने यंदा मजुरांचीदेखील कांदा लागवडीसाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. कांदा लागवडीसाठीचे क्षेत्र दरवर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक शेतकºयांनी पेरणी केलेला हरभरा पीक नांगरून कांदा लागवड केली आहे.ढगाळ वातावरणामुळे औषध फवारणी करण्याचा खर्चदेखील वाढला आहे. सध्या लागवड केलेल्या कांद्याला भाव मिळतो का नाही, याची कोणत्याही प्रकारची शाश्वती नसून कांदा लागवड जगविण्यासाठी मात्र शेतकरी जिवाचे रान करत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा