शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

नैराश्यातून वर्षभरात २७६ जणांकडून आयुष्याचा शेवट

By विजय मोरे | Updated: January 12, 2019 00:25 IST

नाशिक : आर्थिक प्रश्न, कौटुंबिक तंटे, नोकरी- व्यवसायातील ताणतणाव, शारीरिक व्याधी व क्षणभराचा संताप या प्रमुख कारणांमुळे नैराश्याच्या गर्तेत ...

ठळक मुद्देपुरुषांचे प्रमाण अधिक : गळफास, विषारी औषधांचे सेवन;समुपदेशनाची आवश्यकता

नाशिक : आर्थिक प्रश्न, कौटुंबिक तंटे, नोकरी- व्यवसायातील ताणतणाव, शारीरिक व्याधी व क्षणभराचा संताप या प्रमुख कारणांमुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या शहरातील २७६ नागरिकांनी जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षात आत्महत्येचा मार्ग पत्करून जीवन संपविल्याचे वास्तव समोर आले आहे़ विशेष म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये १८५ पुरुष तर ९२ स्त्रियांचा समावेश आहे़ नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे़शहरातील प्रत्येक नागरिकाच्या भौतिक सुख-सुविधांबाबत अपेक्षा वाढलेल्या आहेत़ तर दुसरीकडे नोकरी, व्यवसाय वा उद्योग करताना बहुतांशी सर्वसामान्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो़ याचा परिणाम कौटुंबिक जीवन, नातेसंबंध व स्वास्थ्यावर होतो़ नोकरी, व्यवसायात अहोरात्र मेहनत घेऊनही अपेक्षापूर्ती न झाल्यास नैराश्येत सापडून आत्महत्येचा मार्ग जवळ करीत आहेत़ गळफास, विषारी औषध, विहिरी, नदीच्या पात्रात उडी, स्वत:ला जाळून घेणे, इमारतीवरून उडी मारून वा रेल्वे या मार्गांचा आत्महत्येसाठी सर्रास वापर केला जात असल्याचे समोर आले आहे़शहरातील १९९ आत्महत्या या गळफास, ५९ विषारी औषध सेवनाने तर १८ जणांनी पाण्यात जीव देऊन आत्महत्या केली आहे़ सिडको परिसराचा अंतर्भाव असलेले अंबड पोलीस ठाणे, नाशिकरोड व पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत सर्वाधिक आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत़ यामध्ये अल्पवयीन मुलांसह वयोवृद्धांचाही समावेश आहे.काही आत्महत्या या केवळक्षणिक संतापातून झालेल्याआहेत़

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी