शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
4
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
5
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
6
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
7
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
8
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
9
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
10
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
11
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
12
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
13
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
14
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
15
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
16
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
17
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
18
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
19
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
20
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलअखेर धरणांमध्ये फक्त २८ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 02:03 IST

पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११३ टक्के पाऊस पडूनही एप्रिल महिनाअखेरीस उन्हाच्या तडाख्यामुळे धरणांच्या साठ्यामध्येही कमालीची घट निर्माण झाली असून, सरासरी २८ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. उष्णतेची लाट निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, जिल्ह्यात ३५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

नाशिक : पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११३ टक्के पाऊस पडूनही एप्रिल महिनाअखेरीस उन्हाच्या तडाख्यामुळे धरणांच्या साठ्यामध्येही कमालीची घट निर्माण झाली असून, सरासरी २८ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. उष्णतेची लाट निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, जिल्ह्यात ३५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.  जिल्ह्यात मार्चअखेरपासून उष्णतेची लाट आली असून, पाऱ्याने सरासरी ४० अंश सेल्सिअस तपमान कायम ठेवल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या व जनावरांसाठी पाण्याच्या मागणीत वाढ झाली. परिणामी सिंचन, बिगर सिंचनासाठी धरणांमधून आवर्तने सोडण्यात आल्याने एप्रिल अखेर धरणांमध्ये २८ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. महिनाभरात जवळपास १६ टक्के धरणातील पाण्याचा वापर करण्यात आला असून, सध्या शिल्लक असलेला पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरवावा लागणार आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात ४४ टक्के पाणी साठा शिल्लक आहे तर खुद्द गंगापूर धरणात ४२ टक्के पाणी असल्याने नाशिककरांना पिण्याच्या पाण्याची चिंता करण्याची तशी गरज नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दारणा धरणात ४८ टक्के साठा असून, मे महिन्यात नगर व औरंगाबाद जिल्ह्यासाठी दोन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. गिरणा खोºयात २० टक्के तर पालखेड धरण समूहात २८ टक्केच पाणी शिल्लक आहे.  सध्या जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, येवला व सिन्नर, देवळा, नांदगाव या सहा तालुक्यांत ३५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, मे महिन्यात पाण्याची मागणी आणखी वाढणार असल्याने टॅँकरची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे गेल्या पावसाळ्यात चांगला पाऊस होऊनही शिवाय प्रशासनाकडून जलयुक्त शिवार योजनेमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याचा दावा केला जात असतानाही यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत ग्रामीण भागात पाण्याची समस्या गंभीर झाली आहे.अपयश लपविण्याचा प्रकारप्रशासन व्यवस्थेने जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाल्याचा व त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटल्याचा दावा केला असला तरी, तो फोल ठरला आहे. जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासूनच काही गावांना पाण्याची टंचाई भासू लागली असताना निव्वळ जलयुक्त शिवार योजनेचा फोलपणा उघडकीस येऊ नये म्हणून टॅँकर सुरू करण्यास नकार दिला जात असल्याची तक्रार केली जात आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी