शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

पांदण रस्ता-नाल्यांवर अतिक्रमण ; प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 22:26 IST

खर्डे : बहुतांश गावांत वाड्या-वस्तीवरील शिवार, पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. तर काही ठिकाणी नाले, वहिवाट रस्ता निस्तेनाबूत झाले आहेत. त्यामुळे वस्तीवरील शेतकऱ्यांना जाण्या-येण्यासाठी मार्गच नसल्याने शेतमाल विक्रीसाठी पाठवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन पांदण रस्ता व नाल्यांवरील अतिक्रमणे काढून मार्ग खुला करावी व अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खर्डे, शेरी, वाखारवाडी, विठेवाडी, भऊर आदी गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देवाखारवाडी येथील नाले व शिवार पांदण रस्त्यांचे अनेक ठिकाणी अस्तित्वच धोक्यात

खर्डे : बहुतांश गावांत वाड्या-वस्तीवरील शिवार, पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. तर काही ठिकाणी नाले, वहिवाट रस्ता निस्तेनाबूत झाले आहेत. त्यामुळे वस्तीवरील शेतकऱ्यांना जाण्या-येण्यासाठी मार्गच नसल्याने शेतमाल विक्रीसाठी पाठवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन पांदण रस्ता व नाल्यांवरील अतिक्रमणे काढून मार्ग खुला करावी व अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खर्डे, शेरी, वाखारवाडी, विठेवाडी, भऊर आदी गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.वाखारवाडी येथील नाले व शिवार पांदण रस्त्यांचे अनेक ठिकाणी अस्तित्वच धोक्यात आले आहे. भिलवाड गावापासून उगम झालेल्या साखड व करला या वर्षानुवर्षांपासून अस्तित्वात असलेल्या नाल्यावर शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून घाला घातला आहे. पूर्वीपासून साधारणत: १० ते १५ मीटर रुंदीच्या नाल्यांचे अस्तित्व संपुष्टात आले असून, शेतजमीन तयार करून मोठ्या प्रमाणात नाल्यात अतिक्रमण झाल्याने नाले अरुंद झाले आहेत.भिलवाड ते सौंदाणे महामार्ग मालेगाव रोड साधारण ८ ते ९ किमी अंतराचा नाला आहे. शेतीच्या उपजीविकेसाठी या नाल्याचा चार ते पाच गावांना फायदा होतो. वाखारी, श्रीरामपूर, गुंजाळनगर, खुंटेवाडी, देवळवाडी या गावांना सिंचनासाठी नाल्याचा फायदा होतो. साखड नाला व करला नाल्यावर उजव्या पाटाला दोन गेट आहेत. पाटाच्या पाण्यामुळे जवळपास पाचशे एकर क्षेत्र ओलिताखाली येत असल्याने फायदा होतो.नाल्याच्या अतिक्रमणामुळे केटिवेअर बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा होत नसल्याने उन्हाळ्यात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होत असतो. साखड नाला व करला नाला अतिक्रमणासंदर्भात उच्च न्यायालयापर्यंत सुनावणी झाली असून, अद्याप कार्यवाही केली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. परिसरात शिवार, पांदण रस्त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने दळणवळणाबरोबरच शेतमाल विक्रीसाठी समस्या निर्माण झाली आहे. याबाबत अनेकवेळा पोलीस ठाण्यात तक्रारीदेखील दाखल झाल्या आहेत. याचे निराकरण होत नसल्याने नाराजी पसरली आहे.ग्रामपंचायत, तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, प्रांत कार्यालयात कागदी घोडे नाचवण्यातच शेतकऱ्यांचा वेळ वाया जात आहे. नाल्यांची व पांदण रस्त्याची शासनाने मोजणी करून अतिक्रमण काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी तालुक्यातील समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.(फोटो ३१ खर्डे)शेरी येथे पांदण रस्त्याअभावी बांधावरून डोक्यावर क्रे‌ट घेऊन जाताना महिला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतFarmerशेतकरी