शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

पांदण रस्ता-नाल्यांवर अतिक्रमण ; प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 22:26 IST

खर्डे : बहुतांश गावांत वाड्या-वस्तीवरील शिवार, पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. तर काही ठिकाणी नाले, वहिवाट रस्ता निस्तेनाबूत झाले आहेत. त्यामुळे वस्तीवरील शेतकऱ्यांना जाण्या-येण्यासाठी मार्गच नसल्याने शेतमाल विक्रीसाठी पाठवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन पांदण रस्ता व नाल्यांवरील अतिक्रमणे काढून मार्ग खुला करावी व अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खर्डे, शेरी, वाखारवाडी, विठेवाडी, भऊर आदी गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देवाखारवाडी येथील नाले व शिवार पांदण रस्त्यांचे अनेक ठिकाणी अस्तित्वच धोक्यात

खर्डे : बहुतांश गावांत वाड्या-वस्तीवरील शिवार, पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. तर काही ठिकाणी नाले, वहिवाट रस्ता निस्तेनाबूत झाले आहेत. त्यामुळे वस्तीवरील शेतकऱ्यांना जाण्या-येण्यासाठी मार्गच नसल्याने शेतमाल विक्रीसाठी पाठवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन पांदण रस्ता व नाल्यांवरील अतिक्रमणे काढून मार्ग खुला करावी व अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खर्डे, शेरी, वाखारवाडी, विठेवाडी, भऊर आदी गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.वाखारवाडी येथील नाले व शिवार पांदण रस्त्यांचे अनेक ठिकाणी अस्तित्वच धोक्यात आले आहे. भिलवाड गावापासून उगम झालेल्या साखड व करला या वर्षानुवर्षांपासून अस्तित्वात असलेल्या नाल्यावर शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून घाला घातला आहे. पूर्वीपासून साधारणत: १० ते १५ मीटर रुंदीच्या नाल्यांचे अस्तित्व संपुष्टात आले असून, शेतजमीन तयार करून मोठ्या प्रमाणात नाल्यात अतिक्रमण झाल्याने नाले अरुंद झाले आहेत.भिलवाड ते सौंदाणे महामार्ग मालेगाव रोड साधारण ८ ते ९ किमी अंतराचा नाला आहे. शेतीच्या उपजीविकेसाठी या नाल्याचा चार ते पाच गावांना फायदा होतो. वाखारी, श्रीरामपूर, गुंजाळनगर, खुंटेवाडी, देवळवाडी या गावांना सिंचनासाठी नाल्याचा फायदा होतो. साखड नाला व करला नाल्यावर उजव्या पाटाला दोन गेट आहेत. पाटाच्या पाण्यामुळे जवळपास पाचशे एकर क्षेत्र ओलिताखाली येत असल्याने फायदा होतो.नाल्याच्या अतिक्रमणामुळे केटिवेअर बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा होत नसल्याने उन्हाळ्यात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होत असतो. साखड नाला व करला नाला अतिक्रमणासंदर्भात उच्च न्यायालयापर्यंत सुनावणी झाली असून, अद्याप कार्यवाही केली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. परिसरात शिवार, पांदण रस्त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने दळणवळणाबरोबरच शेतमाल विक्रीसाठी समस्या निर्माण झाली आहे. याबाबत अनेकवेळा पोलीस ठाण्यात तक्रारीदेखील दाखल झाल्या आहेत. याचे निराकरण होत नसल्याने नाराजी पसरली आहे.ग्रामपंचायत, तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, प्रांत कार्यालयात कागदी घोडे नाचवण्यातच शेतकऱ्यांचा वेळ वाया जात आहे. नाल्यांची व पांदण रस्त्याची शासनाने मोजणी करून अतिक्रमण काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी तालुक्यातील समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.(फोटो ३१ खर्डे)शेरी येथे पांदण रस्त्याअभावी बांधावरून डोक्यावर क्रे‌ट घेऊन जाताना महिला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतFarmerशेतकरी