शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

जलयुक्त शिवार योजनेमुळे युवकांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 22:12 IST

नायगाव : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे नायगाव खोºयातील युवकांना गावातच मासेमारीचा रोजगार उपलब्ध झाला आहे. मार्चपर्यंत बंधारे पाण्याने भरलेले असल्यामुळे शेतीबरोबरच मच्छीमारीचा व्यवसाय तेजीत असल्यामुळे नायगावकरांसाठी आर्थिक शुभवर्तमान मानले जात आहे.

ठळक मुद्देनायगाव खोऱ्यात समाधान : बंधारे तुडुंब भरल्याने गावातच होतेय मासेमारी

दत्ता दिघोळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे नायगाव खोºयातील युवकांना गावातच मासेमारीचा रोजगार उपलब्ध झाला आहे. मार्चपर्यंत बंधारे पाण्याने भरलेले असल्यामुळे शेतीबरोबरच मच्छीमारीचा व्यवसाय तेजीत असल्यामुळे नायगावकरांसाठी आर्थिक शुभवर्तमान मानले जात आहे.गेल्या वर्षभरात नायगाव खोºयातील सर्वच गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून बांधारे, पाझरतलाव, नदी-नाले खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यानंतर कोरडेठाक पडणारे बंधारे आज मार्च महिन्यातही पाण्याने भरलेले आहेत. त्यामुळे परिसरातील पाणी पातळी उंचावली असल्याने शेतीसाठी लागणारे जवळपास सर्वच गावातील बंधाऱ्यांमध्ये शेजारील काही शेतकºयांनी मत्स्यबीज टाकले होते.चार ते पाच महिन्यांपूर्वी टाकलेल्या या माशांचे उत्पादन सध्या विक्रीसाठी तयार झाले आहे. त्यामुळे परिसरातील प्रत्येक गावांतील काही युवकांना मासेमारीचा व काही युवकांना मासे विक्रीचा रोजगार गावातच मिळत आहे.प्रत्येक गावात सध्या माशांचे उत्पादन होत आहे. त्यामुळे खवय्यांना ताजे मासे मिळत असल्याने माशांना चांगली मागणी आहे. त्यामुळे शेतकºयांच्या माशांना व्यापाºयांकडून जागेवर शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत भाव मिळत आहे तर काही शेतकरी स्वत:च नायगाव येथील शनिवारच्या बाजारात हात विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे शेतकºयांना या जोडधंद्यामुळे आर्थिक दिलासा मिळत आहे.माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे व युवामित्रच्या माध्यमातून झाले या कामांमुळे परिसरातील शेती बारमाही झाल्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.शेतीला जोडधंदा म्हणून शेतकºयांनी निवडलेला मच्छी पालनाचा व्यवसाय चांगलाच आर्थिक हातभार लावत आहे. यंदा पावसाचे प्रमाणही चांगले राहिल्यामुळे सर्वच बंधारे पूर्णक्षमतेने भरून वाहिल्याने व पाणी पातळी टिकून राहिल्याने या कालावधीत माशांचे उत्पादनातही चांगले आले आहे. आठवडाभरात एका बंधाºयातून साधारण ६० ते ७० किलो माशांचे उत्पादन निघत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNadi Vahate Movieनदी वाहते