शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तोट्याच्या कारणांबाबत कर्मचारी साशंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 01:03 IST

तोट्यात असलेल्या विभागांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन कमी करण्यात आल्याचा दावा राज्य परिवहन महामंडळाने केला असला तरी महामंडळाचा हा दावा कर्मचाऱ्यांना पचनी पडलेला नाही.

नाशिक : तोट्यात असलेल्या विभागांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन कमी करण्यात आल्याचा दावा राज्य परिवहन महामंडळाने केला असला तरी महामंडळाचा हा दावा कर्मचाऱ्यांना पचनी पडलेला नाही. गेल्या नोव्हेंबरपासून निवडणुका, यात्रा-जत्रा, दिवाळी यामध्ये जादा दराने भाडे आकारूनही महामंडळाला तोटा झालाच कसा? असा सवाल कर्मचाºयांकडून विचारला जात आहे. तोट्याचे निव्बळ कारण असून खासगीकरणतून देयेके अदा केल्यामुळेच महामंडळावर आर्थिक संकट आल्याची चर्चा महामंडळात सुरू आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या इतिहासात प्रथमच कर्मचाºयांना १०० टक्के वेतन अदा न करता काही टक्केवेतन देण्यात आले आहे. याबाबतचे समर्थन करताना महामंडळाने परिपत्रक काढून नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसामुळे प्रवासी संख्येत घट झाल्याने राज्यातील काही एसटी महामंडळाच्या विभागावर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे ज्या विभागात प्रवासी संख्येत घट झाली अशा विभागांत काम करणाºया सर्व कर्मचाºयांचा पगार २० ते ३५ टक्के कपात करण्यात आली आहे. महामंडळाने पुढे केलेले कारण मात्र कर्मचाºयांनी मान्य केलेले नाही. आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जादाच्या गाड्या दिवाळी, निवडणूक काळात सोडण्यात आल्या इतकंच नाहीतर १० टक्के भाडेवाढ सुद्धा एसटीच्या प्रवासात करण्यात आली तरीही महामंडळाकडून कपात केली जात असेल तर यामध्ये उत्पन्नाचे कारण नक्कीच नसल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे.कर्मचाºयांनी तोट्याची कारणे सांगतात अवास्तव खासगीकरण आणि त्यावरील अवाढव्य खर्च असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर लोकमतला सांगितल. खासगी बसेस, खासगी चालक-वाहक, शिवशाही नुकसानीच्या भरपाईचा भुर्दंड, महामंडळाच्या नव्या बसेस नसल्याने प्रवासी दुरावले आहेत. याला महामंडळाचे धोरण कारणीभूत असल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. (क्रमश:)शिवशाहीसारखी बससेवा सुरू करून करोडो रु पये खर्च करण्यात आले. यामध्ये चालविणारे चालक, कर्मचारी वर्ग सुद्धा खासगी असल्याने यामध्ये फक्त तोटाच एसटीला सहन करावा लागला. उलट शिवशाहीमुळे झालेल्या अपघाताची भरपाई सुद्धा एसटी महामंडळकडून करण्यात आल्याचे, चार वर्षांत भाडेतत्त्वावर बस सुरू केल्याखेरीज, महामंडळाकडून एकही नवी लालपरी एसटी बस महमंडळाकडून २०१४ पासून विकत घेतली गेलेली नाही. त्यामुळे एसटी बसकडे प्रवासी आकर्षित व्हावा, अशी कोणतेही पावलं उचलली न गेल्याने आज ही वेळ आल्याच एसटी कर्मचारी वर्गाचं म्हणणं आहे.याला काय म्हणणारमाहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार २०१४ मध्ये आलेल्या अहवालात तोटा ५९४ कोटी इतका होता. २०१९ मध्ये एसटी महामंडळ ४९०० कोटींचा तोटा समोर आला आहे. म्हणजे मागील सरकारमध्ये तोट्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.शिवशाही बसेसच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न कमी आणि खर्च मात्र अधिक अशी सध्याची परिस्थिती आहे.

टॅग्स :state transportएसटीNashikनाशिक