शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

आंबोली फाटा ते वाघेरा रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 19:55 IST

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल सारख्या ग्रामीण भागातून नव्हे तर गुजरात राज्यातील त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक त्र्यंबकेश्वरला येत असतात, तीर्थक्षेत्र तसेच हे तालुक्याचे ठिकाण असल्याने त्र्यंबकेश्वर ते वाघेरा हा रस्ता नागरिकांचा व भाविकांचा वर्दळीचा रस्ता आहे. मात्र या दहा किमी अंतरराच्या रस्त्याची दयनीय दुरवस्था झाल्याने रस्ता खड्डेमय बनला आहे.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : बांधकाम विभागाची मलमपट्टी पावसाळ्यात उखडली

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल सारख्या ग्रामीण भागातून नव्हे तर गुजरात राज्यातील त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक त्र्यंबकेश्वरला येत असतात, तीर्थक्षेत्र तसेच हे तालुक्याचे ठिकाण असल्याने त्र्यंबकेश्वर ते वाघेरा हा रस्ता नागरिकांचा व भाविकांचा वर्दळीचा रस्ता आहे. मात्र या दहा किमी अंतरराच्या रस्त्याची दयनीय दुरवस्था झाल्याने रस्ता खड्डेमय बनला आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली फाटा ते वाघेरा रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने तेथील रस्त्याचालणे देखिल मुस्किल होत आहे. दळणवळणाच्या दृष्टीने हरसूल भागातुन तालुक्याला जोडणारा एकमेव पर्यायी रस्ता आहे. जेमतेम दहा किमी अंतर पार करताना वाहनधारकास तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे.मागील दोन वर्षापूर्वी रस्ता झाला परंतु त्याच वर्षात पावसाळ्यात रस्ता खराब झाला त्यानंतर सहा महिन्यात डागडुजी झाली, परंतु रस्त्याची परिस्थिती जैसे थे असल्याने प्रवाश्यांसह नागरिकांनी संताप व्यक्त केला.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामूळे दोन वर्षा पूर्वी केलेल्या रस्त्याला, रस्ता झाल्यापासून सहा महिन्यांतच खड्डे पडायला सुरु वात झाली. त्यानंतर खड्डे भरण्याचे काम चालूच झाले, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर शंका येत असल्याचे मत नागरीकांनी व्यक्त केले.यावर्षी काही भागात रस्त्याची डागडुजी केली होती. मात्र जोरदार पावसामुळे डागडुजीचे खड्यात रूपांतर झाले. ही बांधकाम विभागाचे मलमपट्टी वाहनधारक व प्रवाशांची जीवघेणी ठरली आहे. बिकट तिच विहवाट म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यातील वेळुंजे ते वाघेरा रस्ता अतिशय खराब झाला आहे.प्रवाश्यांना रस्त्यातून मार्ग काढणे जिकरीचे बनते, काही वेळा दुचाकीस्वरांचे अपघात ही होत असतात, तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची झालेली दुरवस्था थांबवावी अशी मागणी स्थानिकांकडून येत आहे.रस्त्याने दूध व्यवसाहिक मोठया प्रमाणात ये जा करत असतात , पण खड्यामुळे कित्येक दूधवाले ह्या खड्यातुन जात असताना पडत असतात व दुध सांडून वाया जात गेले आहे , त्यामुळे दूध व्यवसाहिकाना मोठा फटका बसत आहे , त्यामुळे त्यांचातही नाराजी आहे,१) हरसूल सारख्या ग्रामीण भागातील नागरिकांची तालुक्याशी दळणवळणाच्या दृष्टीने जोडणारा आंबोली फाटा ते वाघेरा हा महत्वाचा रस्ता आहे.दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या मलमपट्टीचे पाण्यात रूपांतर झाल्याने रस्ता पूर्णत: खडेमय झाला आहे.रस्त्याची तात्काळ खडे भरून घ्यावे.- शरद महाले, स्थानिक ग्रामस्थ गोरठाण.२) रस्ता झाल्यापासून त्याचे कोणतेही आवश्य असे काम करण्यात आले नाही,दरवर्षी प्रमाणे थोडी मलम पट्टी करून तोंडाला पाने पुसली जातात , माघील दोन वर्षांपूर्वी झालेला रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला आहे , सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेची आहे .- समाधान बोडकेपाटील, शिवसेना तालुका समनव्यक,३) या रस्त्यांवर अपघात होतील असे चित्र आहे,ह्या खड्यातून रस्ता काढणे मुश्कील आहे, वेळुंजे ते गोरठाण रस्त्यावर डांबर शोधून सापडणार नाही, अशी परिस्थिती आहे , रस्ता झाल्या पासून सहा मिहन्यात हा रस्ता खराब झाला आहे , तेव्हा पासून बाकी रस्त्याला डागडुजी केली परंतु वेळुंजे ते गोरठाण हा रस्ता तसाच ठेवला म्हणून अशी परिस्थिती आहे.- तानाजी कड, अंबोली ग्रामस्थ.४) या ठिकाणी दुचाकी स्वरांचा कायम अपघात होतात, खड्यातून रस्ता काढत असताना ते गाडी खड्यात घेऊन पडतात, व जखमी होत असतात, याकडे लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून मोठी अघिटत घटना घडू नये, आम्ही दूध घेऊन जात असताना कित्येकदा दूध सांडून नुकसान झाले,- हरिदास भडांगे, दूध व्यवसाहिक गोरठाण.5) या रस्त्यावर दररोज ये जा करत असताना खूप त्रास होतो , गाडी काढत असताना खड्यात आदळत असते , गाडीत प्रवाशी असतात त्यामुळे गाडी खूप सावकाश चालवावी लागते , टायर लवकर खराब होत असतात, रस्ता झाला पाहिजे,- शंकर खोटरे, टॅक्सी चालक.6) गाडी चालवत असताना या खड्यातुन मार्ग काढावा लागतो , पाठीचा त्रास होण्याची चिन्ह दिसतात, गाडी खड्यात आदळल्याने पाठी वर ताण येतो,खूप त्रास होतो, पण दररोज चे काम व रोजीरोटी चा प्रश्न असतो त्यामुळे करावे लागतात, व गाडीचे खूप नुकसान होते,- भीमा उघडे, टॅक्सी चालक.7) पर्यायी गुजरात म्हणून हा रस्ता हा महत्वाचा आहे, या मार्गे गुजरात हद्द अगदीच जवळ असल्याने लोकांची ये-जा असतेच, पण हा रस्ता कायमच चर्चेत आहे, काम होतानाच निकृष्ट दर्जाचे झाले होते, ठेकेदारावर वचक राहिला नाही, ठेकेदार मनमानी करत असतात, हाच रस्ता होतो आण ित्याच वर्षातील पावसाळ्यात खराब होतो, ही जबादारी कोणाची?- कैलास बोडके ग्रामस्थ वेळुंजे.