शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

आंबोली फाटा ते वाघेरा रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 19:55 IST

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल सारख्या ग्रामीण भागातून नव्हे तर गुजरात राज्यातील त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक त्र्यंबकेश्वरला येत असतात, तीर्थक्षेत्र तसेच हे तालुक्याचे ठिकाण असल्याने त्र्यंबकेश्वर ते वाघेरा हा रस्ता नागरिकांचा व भाविकांचा वर्दळीचा रस्ता आहे. मात्र या दहा किमी अंतरराच्या रस्त्याची दयनीय दुरवस्था झाल्याने रस्ता खड्डेमय बनला आहे.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : बांधकाम विभागाची मलमपट्टी पावसाळ्यात उखडली

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल सारख्या ग्रामीण भागातून नव्हे तर गुजरात राज्यातील त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक त्र्यंबकेश्वरला येत असतात, तीर्थक्षेत्र तसेच हे तालुक्याचे ठिकाण असल्याने त्र्यंबकेश्वर ते वाघेरा हा रस्ता नागरिकांचा व भाविकांचा वर्दळीचा रस्ता आहे. मात्र या दहा किमी अंतरराच्या रस्त्याची दयनीय दुरवस्था झाल्याने रस्ता खड्डेमय बनला आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली फाटा ते वाघेरा रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने तेथील रस्त्याचालणे देखिल मुस्किल होत आहे. दळणवळणाच्या दृष्टीने हरसूल भागातुन तालुक्याला जोडणारा एकमेव पर्यायी रस्ता आहे. जेमतेम दहा किमी अंतर पार करताना वाहनधारकास तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे.मागील दोन वर्षापूर्वी रस्ता झाला परंतु त्याच वर्षात पावसाळ्यात रस्ता खराब झाला त्यानंतर सहा महिन्यात डागडुजी झाली, परंतु रस्त्याची परिस्थिती जैसे थे असल्याने प्रवाश्यांसह नागरिकांनी संताप व्यक्त केला.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामूळे दोन वर्षा पूर्वी केलेल्या रस्त्याला, रस्ता झाल्यापासून सहा महिन्यांतच खड्डे पडायला सुरु वात झाली. त्यानंतर खड्डे भरण्याचे काम चालूच झाले, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर शंका येत असल्याचे मत नागरीकांनी व्यक्त केले.यावर्षी काही भागात रस्त्याची डागडुजी केली होती. मात्र जोरदार पावसामुळे डागडुजीचे खड्यात रूपांतर झाले. ही बांधकाम विभागाचे मलमपट्टी वाहनधारक व प्रवाशांची जीवघेणी ठरली आहे. बिकट तिच विहवाट म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यातील वेळुंजे ते वाघेरा रस्ता अतिशय खराब झाला आहे.प्रवाश्यांना रस्त्यातून मार्ग काढणे जिकरीचे बनते, काही वेळा दुचाकीस्वरांचे अपघात ही होत असतात, तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची झालेली दुरवस्था थांबवावी अशी मागणी स्थानिकांकडून येत आहे.रस्त्याने दूध व्यवसाहिक मोठया प्रमाणात ये जा करत असतात , पण खड्यामुळे कित्येक दूधवाले ह्या खड्यातुन जात असताना पडत असतात व दुध सांडून वाया जात गेले आहे , त्यामुळे दूध व्यवसाहिकाना मोठा फटका बसत आहे , त्यामुळे त्यांचातही नाराजी आहे,१) हरसूल सारख्या ग्रामीण भागातील नागरिकांची तालुक्याशी दळणवळणाच्या दृष्टीने जोडणारा आंबोली फाटा ते वाघेरा हा महत्वाचा रस्ता आहे.दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या मलमपट्टीचे पाण्यात रूपांतर झाल्याने रस्ता पूर्णत: खडेमय झाला आहे.रस्त्याची तात्काळ खडे भरून घ्यावे.- शरद महाले, स्थानिक ग्रामस्थ गोरठाण.२) रस्ता झाल्यापासून त्याचे कोणतेही आवश्य असे काम करण्यात आले नाही,दरवर्षी प्रमाणे थोडी मलम पट्टी करून तोंडाला पाने पुसली जातात , माघील दोन वर्षांपूर्वी झालेला रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला आहे , सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेची आहे .- समाधान बोडकेपाटील, शिवसेना तालुका समनव्यक,३) या रस्त्यांवर अपघात होतील असे चित्र आहे,ह्या खड्यातून रस्ता काढणे मुश्कील आहे, वेळुंजे ते गोरठाण रस्त्यावर डांबर शोधून सापडणार नाही, अशी परिस्थिती आहे , रस्ता झाल्या पासून सहा मिहन्यात हा रस्ता खराब झाला आहे , तेव्हा पासून बाकी रस्त्याला डागडुजी केली परंतु वेळुंजे ते गोरठाण हा रस्ता तसाच ठेवला म्हणून अशी परिस्थिती आहे.- तानाजी कड, अंबोली ग्रामस्थ.४) या ठिकाणी दुचाकी स्वरांचा कायम अपघात होतात, खड्यातून रस्ता काढत असताना ते गाडी खड्यात घेऊन पडतात, व जखमी होत असतात, याकडे लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून मोठी अघिटत घटना घडू नये, आम्ही दूध घेऊन जात असताना कित्येकदा दूध सांडून नुकसान झाले,- हरिदास भडांगे, दूध व्यवसाहिक गोरठाण.5) या रस्त्यावर दररोज ये जा करत असताना खूप त्रास होतो , गाडी काढत असताना खड्यात आदळत असते , गाडीत प्रवाशी असतात त्यामुळे गाडी खूप सावकाश चालवावी लागते , टायर लवकर खराब होत असतात, रस्ता झाला पाहिजे,- शंकर खोटरे, टॅक्सी चालक.6) गाडी चालवत असताना या खड्यातुन मार्ग काढावा लागतो , पाठीचा त्रास होण्याची चिन्ह दिसतात, गाडी खड्यात आदळल्याने पाठी वर ताण येतो,खूप त्रास होतो, पण दररोज चे काम व रोजीरोटी चा प्रश्न असतो त्यामुळे करावे लागतात, व गाडीचे खूप नुकसान होते,- भीमा उघडे, टॅक्सी चालक.7) पर्यायी गुजरात म्हणून हा रस्ता हा महत्वाचा आहे, या मार्गे गुजरात हद्द अगदीच जवळ असल्याने लोकांची ये-जा असतेच, पण हा रस्ता कायमच चर्चेत आहे, काम होतानाच निकृष्ट दर्जाचे झाले होते, ठेकेदारावर वचक राहिला नाही, ठेकेदार मनमानी करत असतात, हाच रस्ता होतो आण ित्याच वर्षातील पावसाळ्यात खराब होतो, ही जबादारी कोणाची?- कैलास बोडके ग्रामस्थ वेळुंजे.