शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे संकटकाळी जनतेला मिळणार तात्काळ मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 17:57 IST

पेठ : माहीती तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने नानाविध साधने बनविली मात्र अपत्कालीन परिस्थितीच्या वेळी तात्काळ मदत मिळण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा ही ...

ठळक मुद्दे अपत्कालीन सुरक्षा : जगातील सर्वोत्तम संपर्काचे एकमेव साधनग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्र मांकावर फोन केल्यास एकाच वेळी घटनास्थळाच्या परिसरातील अनेक लोकांना घटनेची माहीती अति तात्काळ

पेठ : माहीती तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने नानाविध साधने बनविली मात्र अपत्कालीन परिस्थितीच्या वेळी तात्काळ मदत मिळण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा ही जगातील सर्वोत्तम संपर्कयंत्रणा विकसित करण्यात आली असून या यंत्रणेची सामान्य जनतेसह शासकिय विभागांना माहीती व्हावी यासाठी पेठ येथे तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.तहसीलदार हरिष भामरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यशाळेत ग्रामसुरक्षा समन्वयक डी. के. गोर्डे यांनी या जलद संपर्कयंत्रणेबाबत माहीती दिली. आपत्कालीन स्थितीत ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्र मांकावर फोन केल्यास एकाच वेळी घटनास्थळाच्या परिसरातील अनेक लोकांना घटनेची माहीती अति तात्काळ कळवली जाईल. यामुळे ज्या ठिकाणी घटना घडली त्यांना मदत करणे सोपे जाणार आहे. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसुरक्षा यंत्रणा विकिसत करण्यात येणार असून चोरी, दरोडा, आग, अपहरण, छेडछाड, वाहन चोरी, आदी आपत्कालीन घटनांसाठी तत्काळ मदत मिळवता येणार आहे.याप्रसंगी तहसीलदार हरिष भामरे, सभापती पुष्पा गवळी, तालुका कृषी अधिकारी शिलानाथ पवार, गटविकास अधिकारी अनिल नागणे, सहाय्यक गटविकास अधिकारी अमति भुसावरे, प्राचार्य आर. बी. टोचे, वनपाल आर.एस. आहेर यांचेसह तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, सुरक्षा रक्षक उपस्थित होते. एस. एल. शिंदे यांनी सुत्रसंचलन तर जी. एस. शेवाळे यांनी आभार मानले.काय आहेत ग्रामसुरक्षा यंत्रणेचे वैशिष्टयेसंपूर्ण गावात स्वयंचिलत यंत्रणा, संपूर्ण भारतात १८००२७०३६०० हा एकच टोल फ्री नंबर, यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात परिसरातील नागरिकांना एकाच कॉलद्वारे सावध करू शकतो, दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता,ठिकाण कळणार असल्याने विनाविलंब मदत मिळू शकते, नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलितरित्या प्रसारीत होतात, एका गावातून चोरी करून चोर दुसऱ्या गावाच्या दिशेने पळून गेल्यास त्या गावालाही संदेशाद्वारे सावध करता येते, सरकारी कार्यालये, पोलीस ठाणे आदींना त्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना सुचना देता येतात.या कारणासाठी मिळू शकेल मदतगंभीर अपघात, बिबट्याचा हल्ला, आग/ जळीत घटना, पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, लहान मुल हरवणे, अपहरण, चोरी, दरोडा, विषबाधा, सर्पदंश, महिलांची छेडछाड, याबरोबर ग्रामपंचायत प्रशासनाला ग्रामसभा, घरपट्टी वसुली, सरकारी योजनांची माहीती, गॅस वाहन येणार असल्याची माहीती, रेशन-रॉकेल वितरण, पोलीओ लसिकरण, गरोदर माता तपासणी, शाळांचे कार्यक्र म, यात्रा सभा, आरोग्य शिबीरे, स्वच्छता अभियान आदी साठी वापर करता येऊ शकेल. पोलीस ठाणेतंर्गत येणाºया गावांना व पोलीस पाटलांना बैठकांचे संदेश, बंदोबस्त आदेश, चोरीच्या घटनेतील फरारी आरोपी आदींची माहीती देण्यासाठी या यंत्रणेचा वापर करून घेण्यात येणार आहे.