शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
3
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
4
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
5
Raksha Bandhan 2025 SIP Gift: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
6
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
7
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
8
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
9
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
10
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
11
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
12
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
13
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
14
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
15
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
16
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
17
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
18
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
19
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
20
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?

ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे संकटकाळी जनतेला मिळणार तात्काळ मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 17:57 IST

पेठ : माहीती तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने नानाविध साधने बनविली मात्र अपत्कालीन परिस्थितीच्या वेळी तात्काळ मदत मिळण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा ही ...

ठळक मुद्दे अपत्कालीन सुरक्षा : जगातील सर्वोत्तम संपर्काचे एकमेव साधनग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्र मांकावर फोन केल्यास एकाच वेळी घटनास्थळाच्या परिसरातील अनेक लोकांना घटनेची माहीती अति तात्काळ

पेठ : माहीती तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने नानाविध साधने बनविली मात्र अपत्कालीन परिस्थितीच्या वेळी तात्काळ मदत मिळण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा ही जगातील सर्वोत्तम संपर्कयंत्रणा विकसित करण्यात आली असून या यंत्रणेची सामान्य जनतेसह शासकिय विभागांना माहीती व्हावी यासाठी पेठ येथे तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.तहसीलदार हरिष भामरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यशाळेत ग्रामसुरक्षा समन्वयक डी. के. गोर्डे यांनी या जलद संपर्कयंत्रणेबाबत माहीती दिली. आपत्कालीन स्थितीत ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्र मांकावर फोन केल्यास एकाच वेळी घटनास्थळाच्या परिसरातील अनेक लोकांना घटनेची माहीती अति तात्काळ कळवली जाईल. यामुळे ज्या ठिकाणी घटना घडली त्यांना मदत करणे सोपे जाणार आहे. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसुरक्षा यंत्रणा विकिसत करण्यात येणार असून चोरी, दरोडा, आग, अपहरण, छेडछाड, वाहन चोरी, आदी आपत्कालीन घटनांसाठी तत्काळ मदत मिळवता येणार आहे.याप्रसंगी तहसीलदार हरिष भामरे, सभापती पुष्पा गवळी, तालुका कृषी अधिकारी शिलानाथ पवार, गटविकास अधिकारी अनिल नागणे, सहाय्यक गटविकास अधिकारी अमति भुसावरे, प्राचार्य आर. बी. टोचे, वनपाल आर.एस. आहेर यांचेसह तालुक्यातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, सुरक्षा रक्षक उपस्थित होते. एस. एल. शिंदे यांनी सुत्रसंचलन तर जी. एस. शेवाळे यांनी आभार मानले.काय आहेत ग्रामसुरक्षा यंत्रणेचे वैशिष्टयेसंपूर्ण गावात स्वयंचिलत यंत्रणा, संपूर्ण भारतात १८००२७०३६०० हा एकच टोल फ्री नंबर, यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात परिसरातील नागरिकांना एकाच कॉलद्वारे सावध करू शकतो, दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता,ठिकाण कळणार असल्याने विनाविलंब मदत मिळू शकते, नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलितरित्या प्रसारीत होतात, एका गावातून चोरी करून चोर दुसऱ्या गावाच्या दिशेने पळून गेल्यास त्या गावालाही संदेशाद्वारे सावध करता येते, सरकारी कार्यालये, पोलीस ठाणे आदींना त्यांच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना सुचना देता येतात.या कारणासाठी मिळू शकेल मदतगंभीर अपघात, बिबट्याचा हल्ला, आग/ जळीत घटना, पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, लहान मुल हरवणे, अपहरण, चोरी, दरोडा, विषबाधा, सर्पदंश, महिलांची छेडछाड, याबरोबर ग्रामपंचायत प्रशासनाला ग्रामसभा, घरपट्टी वसुली, सरकारी योजनांची माहीती, गॅस वाहन येणार असल्याची माहीती, रेशन-रॉकेल वितरण, पोलीओ लसिकरण, गरोदर माता तपासणी, शाळांचे कार्यक्र म, यात्रा सभा, आरोग्य शिबीरे, स्वच्छता अभियान आदी साठी वापर करता येऊ शकेल. पोलीस ठाणेतंर्गत येणाºया गावांना व पोलीस पाटलांना बैठकांचे संदेश, बंदोबस्त आदेश, चोरीच्या घटनेतील फरारी आरोपी आदींची माहीती देण्यासाठी या यंत्रणेचा वापर करून घेण्यात येणार आहे.