शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

अकरा वर्षांनी झाली नांदगावची आमसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:40 IST

तब्बल ११ वर्षांनी नांदगावची आमसभा झाल्याने समस्याग्रस्त नागरिकांच्या संतापाची कोंडी फुटली आणि नागरिकांच्या आरोपांना उत्तरे देताना अधिकारीवर्गाची पुरती भंबेरी उडाली. गडबडलेल्या अधिकारी वर्गाची अनेकदा कानउघाडणी करण्याची वेळ आमदार सुहास कांदे यांचेवर आली. पंचायत समितीच्या नोंदीनुसार ७ फेब्रुवारी २००८ रोजी शेवटची आमसभा घेण्यात आली होती.

ठळक मुद्देतक्रारींचा पाऊस : उत्तरे देताना अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी

नांदगाव : तब्बल ११ वर्षांनी नांदगावची आमसभा झाल्याने समस्याग्रस्त नागरिकांच्या संतापाची कोंडी फुटली आणि नागरिकांच्या आरोपांना उत्तरे देताना अधिकारीवर्गाची पुरती भंबेरी उडाली. गडबडलेल्या अधिकारी वर्गाची अनेकदा कानउघाडणी करण्याची वेळ आमदार सुहास कांदे यांचेवर आली. पंचायत समितीच्या नोंदीनुसार ७ फेब्रुवारी २००८ रोजी शेवटची आमसभा घेण्यात आली होती.लोकप्रतिनिधी आणि प्रशासन तालुक्याच्या रथाची दोन चाके आहेत. जनतेच्या हितासाठी या दोन चाकांनी नेहमी सजग राहिले पाहिजे. जनतेला त्रास झाल्यास गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा आमदार सुहास कांदे यांनी आमसभेत नांदगाव व मालेगाव तालुक्यातील प्रशासनाला दिला. या आमसभेत नांदगाव व मालेगाव तालुक्यातील मात्र नांदगाव विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्यावरील अन्यायास वाचा फोडली.यावेळी विविध शासकीय व निमशासकीय खात्यांचा आढावा आमसभेत घेण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाकडून माणिकपुंज गावासाठी सुमारे २ कोटी रु पयांचा निधी मंजूर असून ; आतापर्यंत फक्त ५३ लाख रुपयेच खर्च झाल्याची बाब साईनाथ रामकर यांनी उपस्थित करत योजनेअंतर्गत मिळालेले एलईडी बल्ब अधिकाºयांनी विकले असल्याचा आरोप केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यशवंत पाटील यांनी एकूण १२ रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे, मात्र सदर ठेकेदार काम सुरू करत नसल्याची बाब स्पष्ट केल्यानंतर आमदार कांदे यांनी सदर ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची सूचना केली. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न अनेकांनी मांडला. कांदाचाळी ऐवजी शेततळ्यांना प्राधान्य देण्याची मागणी शेतकºयांनी यावेळी केली. भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणीच्या कामात दिरंगाई होत असल्याचा मुद्दा ही चांगलाच गाजला. वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराबाबत मुद्दा समोर आला. नांदगाव, मनमाड नगरपालिका प्रशासनाच्या कामकाजाबाबत झालेल्या तक्र ारींना नगराध्यक्ष राजेश कवडे, मनमाडचे मुख्याधिकारी डॉ.दिलीप मेनकर यांनी उत्तरे दिली. यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, नगराध्यक्ष राजेश कवडे, गणेश धात्रक, बाजार समितीचे सभापती तेज कवडे, किशोर लहाने, संजय सांगळे, पंचायत समिती सभापती भाऊसाहेब हिरे, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे,पंचायत समिती सदस्य सुमन निकम, अर्चना वाघ, विद्या पाटील, उपसभापती सुशीला नाईकवाडे, आदी उपस्थित होते.वनविभागावर आरोपतालुका वनविभाग भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचा आरोप खुद्द आमदार कांदे यांनीच केला तर एकीकडे लाखो रोपे वनविभागाने वाटली असल्याचा वनक्षेत्रपाल बोरसे यांचा दावा सामाजिक संस्थांनी खोडून काढला.वनपाल सोनवणे यांना हरणांनी नुकसान केलेल्या प्रकरणात दुर्लक्ष केल्याचा आरोप व वाळूच्याप्रकरणात निलंबित करावे अशी सुचना कांदे यांनीदिली.

टॅग्स :PoliticsराजकारणGovernmentसरकार