शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अकरा वर्षांनी झाली नांदगावची आमसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:40 IST

तब्बल ११ वर्षांनी नांदगावची आमसभा झाल्याने समस्याग्रस्त नागरिकांच्या संतापाची कोंडी फुटली आणि नागरिकांच्या आरोपांना उत्तरे देताना अधिकारीवर्गाची पुरती भंबेरी उडाली. गडबडलेल्या अधिकारी वर्गाची अनेकदा कानउघाडणी करण्याची वेळ आमदार सुहास कांदे यांचेवर आली. पंचायत समितीच्या नोंदीनुसार ७ फेब्रुवारी २००८ रोजी शेवटची आमसभा घेण्यात आली होती.

ठळक मुद्देतक्रारींचा पाऊस : उत्तरे देताना अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी

नांदगाव : तब्बल ११ वर्षांनी नांदगावची आमसभा झाल्याने समस्याग्रस्त नागरिकांच्या संतापाची कोंडी फुटली आणि नागरिकांच्या आरोपांना उत्तरे देताना अधिकारीवर्गाची पुरती भंबेरी उडाली. गडबडलेल्या अधिकारी वर्गाची अनेकदा कानउघाडणी करण्याची वेळ आमदार सुहास कांदे यांचेवर आली. पंचायत समितीच्या नोंदीनुसार ७ फेब्रुवारी २००८ रोजी शेवटची आमसभा घेण्यात आली होती.लोकप्रतिनिधी आणि प्रशासन तालुक्याच्या रथाची दोन चाके आहेत. जनतेच्या हितासाठी या दोन चाकांनी नेहमी सजग राहिले पाहिजे. जनतेला त्रास झाल्यास गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा आमदार सुहास कांदे यांनी आमसभेत नांदगाव व मालेगाव तालुक्यातील प्रशासनाला दिला. या आमसभेत नांदगाव व मालेगाव तालुक्यातील मात्र नांदगाव विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्यावरील अन्यायास वाचा फोडली.यावेळी विविध शासकीय व निमशासकीय खात्यांचा आढावा आमसभेत घेण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाकडून माणिकपुंज गावासाठी सुमारे २ कोटी रु पयांचा निधी मंजूर असून ; आतापर्यंत फक्त ५३ लाख रुपयेच खर्च झाल्याची बाब साईनाथ रामकर यांनी उपस्थित करत योजनेअंतर्गत मिळालेले एलईडी बल्ब अधिकाºयांनी विकले असल्याचा आरोप केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यशवंत पाटील यांनी एकूण १२ रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे, मात्र सदर ठेकेदार काम सुरू करत नसल्याची बाब स्पष्ट केल्यानंतर आमदार कांदे यांनी सदर ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची सूचना केली. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न अनेकांनी मांडला. कांदाचाळी ऐवजी शेततळ्यांना प्राधान्य देण्याची मागणी शेतकºयांनी यावेळी केली. भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणीच्या कामात दिरंगाई होत असल्याचा मुद्दा ही चांगलाच गाजला. वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराबाबत मुद्दा समोर आला. नांदगाव, मनमाड नगरपालिका प्रशासनाच्या कामकाजाबाबत झालेल्या तक्र ारींना नगराध्यक्ष राजेश कवडे, मनमाडचे मुख्याधिकारी डॉ.दिलीप मेनकर यांनी उत्तरे दिली. यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, नगराध्यक्ष राजेश कवडे, गणेश धात्रक, बाजार समितीचे सभापती तेज कवडे, किशोर लहाने, संजय सांगळे, पंचायत समिती सभापती भाऊसाहेब हिरे, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे,पंचायत समिती सदस्य सुमन निकम, अर्चना वाघ, विद्या पाटील, उपसभापती सुशीला नाईकवाडे, आदी उपस्थित होते.वनविभागावर आरोपतालुका वनविभाग भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचा आरोप खुद्द आमदार कांदे यांनीच केला तर एकीकडे लाखो रोपे वनविभागाने वाटली असल्याचा वनक्षेत्रपाल बोरसे यांचा दावा सामाजिक संस्थांनी खोडून काढला.वनपाल सोनवणे यांना हरणांनी नुकसान केलेल्या प्रकरणात दुर्लक्ष केल्याचा आरोप व वाळूच्याप्रकरणात निलंबित करावे अशी सुचना कांदे यांनीदिली.

टॅग्स :PoliticsराजकारणGovernmentसरकार