शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांपासून इंदिरानगरात विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:27 IST

पावसाळा सुरू होताच महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे इंदिरानगर व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, कधी कमी दाबाने तर कधी थेट वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांच्या विजेच्या उपकरणांचेही नुकसान होत आहे. या संदर्भात तक्रारीलाही वाव नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

इंदिरानगर : पावसाळा सुरू होताच महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे इंदिरानगर व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, कधी कमी दाबाने तर कधी थेट वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांच्या विजेच्या उपकरणांचेही नुकसान होत आहे. या संदर्भात तक्रारीलाही वाव नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.पहिल्याच पावसामुळे इंदिरानगर, राजीवनगर, कमोदनगर, सार्थकनगर, कानिफनाथनगर, शास्त्रीनगर, वडाळागाव यांसह परिसरात काही भागांत दहा तास तर काही भागांत सुमारे २४ तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नुकत्याच पडलेल्या पावसामुळे उकाडा वाढलेला असताना त्यात वीज खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले.सोमवारी सायंकाळीदेखील परिसराने अनुभवला. सायंकाळी ६ वाजता पावसाला सुरुवात होताच, तत्काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर रात्री १० वाजेपर्यंत सर्वत्रकाळोख पसरला. काही भागांत कमी दाबाने वीजपुरवठा करण्यात आल्याने नागरिकांच्या वीज उपकरणांचे नुकसानझाले.या संदर्भात तक्रारीसाठी वीज कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही कोणीच उपलब्ध होऊ शकले नाही. विजेच्या या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले असून, वीज कंपनीने सुरळीत वीजपुरवठा करावा अन्यथा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकPower Shutdownभारनियमन