शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

१७५ शेतक-यांना गेल्या आठ वर्षापासून अंदाजे वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 6:30 PM

वीज वितरण कंपनीच्या नियमानुसार प्रत्येक वीज ग्राहकास फोटोमीटर रिडींगनुसारच वीज बिल देण्यात यावे असे ठरलेले असताना दिडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील १७५ शेतक-यांना गेल्या आठ वर्षापासून अंदाजे व खोटी, अवास्तव वीज बिल देण्यात येत असल्याने सदर शेतक-यांच्या वीज बिलात दुरूस्ती करण्यात यावे व त्यांना वीज कंपनीने भरपाई द्यावी

ठळक मुद्देग्राहक संरक्षण समितीकडे वीज कंपनीविरूद्ध तक्रारीवीज कंपनीने १२०० रूपये नुकसान भरपाई द्यावी

नाशिक : जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत वीज वितरण कंपनीच्या विरोधात समिती सदस्यांनी तक्रारीचा पाढा वाचून जंत्रीच सादर केली. दोन वर्षापासून तक्रारी करूनही वीज कंपनी सोडवणूक करीत नसल्याने कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली.या तक्रारींमध्ये प्रामुख्याने वीज वितरण कंपनीच्या नियमानुसार प्रत्येक वीज ग्राहकास फोटोमीटर रिडींगनुसारच वीज बिल देण्यात यावे असे ठरलेले असताना दिडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील १७५ शेतक-यांना गेल्या आठ वर्षापासून अंदाजे व खोटी, अवास्तव वीज बिल देण्यात येत असल्याने सदर शेतक-यांच्या वीज बिलात दुरूस्ती करण्यात यावे व त्यांना वीज कंपनीने भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय सिन्नर तालुक्यातील वीज ग्राहक ठोंबरे यांना विजेचा पुरवठा करणारा वीज पोल पडला त्याबाबत विज कंपनीकडे तक्रार करूनही विजेचा पोल दुरूस्त करण्यात आला नाही. परिणामी वीज पुरवठा खंडीत झाल्याने ठोंबरे यांचे पीक बुडाले,त्यास वीज कंपनीच जबाबदार असल्याची तक्रार करण्यात आली असून, ठोंबरे यांनी तक्रार केल्यापासून प्रतिदिन वीज कंपनीने १२०० रूपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. वीज ग्राहकांचे हक्क व अधिकार तसेच भरपाईचे निश्चितीकरणाबाबत वीज कंपनीने त्यांच्या प्रत्येक वीज बिल भरणा केंद्रावर तसेच ग्रामपंचायत कार्यालयांवर फलक लावावेत. त्याच बरोबर वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी, अधिका-यांनी गणवेष परिधान करावा व त्यावर नेमप्लेट लावण्याचा नियम असून, तसे न केल्यास संबंधितांना दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. परंतु अधिकारी व कर्मचारी त्याचे पालन करीत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. निफाड तालुक्यातील चांदोरी येथील ५२५ शेतकरी वीज ग्राहकांनी वीज पुरवठा सुरूळीत होत नसल्याबद्दल तक्रार केली असुनही अद्यापही वीज कंपनीने त्याची दखल घेतली नसल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत वीज तक्रारींची तात्काळ सोडवणूक करण्याचे आदेश संबंधित अधिकाºयांना देण्यात आले,त्याच बरोबर बैठकीच्या इतिवृत्तात त्याची नोंद घेवून पुढच्या बैठकीत तक्रारींवर वीज कंपनीने काय कार्यवाही केली याचा अहवालही ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या.

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारNashikनाशिक