शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

१७५ शेतक-यांना गेल्या आठ वर्षापासून अंदाजे वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 18:30 IST

वीज वितरण कंपनीच्या नियमानुसार प्रत्येक वीज ग्राहकास फोटोमीटर रिडींगनुसारच वीज बिल देण्यात यावे असे ठरलेले असताना दिडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील १७५ शेतक-यांना गेल्या आठ वर्षापासून अंदाजे व खोटी, अवास्तव वीज बिल देण्यात येत असल्याने सदर शेतक-यांच्या वीज बिलात दुरूस्ती करण्यात यावे व त्यांना वीज कंपनीने भरपाई द्यावी

ठळक मुद्देग्राहक संरक्षण समितीकडे वीज कंपनीविरूद्ध तक्रारीवीज कंपनीने १२०० रूपये नुकसान भरपाई द्यावी

नाशिक : जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत वीज वितरण कंपनीच्या विरोधात समिती सदस्यांनी तक्रारीचा पाढा वाचून जंत्रीच सादर केली. दोन वर्षापासून तक्रारी करूनही वीज कंपनी सोडवणूक करीत नसल्याने कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली.या तक्रारींमध्ये प्रामुख्याने वीज वितरण कंपनीच्या नियमानुसार प्रत्येक वीज ग्राहकास फोटोमीटर रिडींगनुसारच वीज बिल देण्यात यावे असे ठरलेले असताना दिडोरी तालुक्यातील मातेरेवाडी येथील १७५ शेतक-यांना गेल्या आठ वर्षापासून अंदाजे व खोटी, अवास्तव वीज बिल देण्यात येत असल्याने सदर शेतक-यांच्या वीज बिलात दुरूस्ती करण्यात यावे व त्यांना वीज कंपनीने भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय सिन्नर तालुक्यातील वीज ग्राहक ठोंबरे यांना विजेचा पुरवठा करणारा वीज पोल पडला त्याबाबत विज कंपनीकडे तक्रार करूनही विजेचा पोल दुरूस्त करण्यात आला नाही. परिणामी वीज पुरवठा खंडीत झाल्याने ठोंबरे यांचे पीक बुडाले,त्यास वीज कंपनीच जबाबदार असल्याची तक्रार करण्यात आली असून, ठोंबरे यांनी तक्रार केल्यापासून प्रतिदिन वीज कंपनीने १२०० रूपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. वीज ग्राहकांचे हक्क व अधिकार तसेच भरपाईचे निश्चितीकरणाबाबत वीज कंपनीने त्यांच्या प्रत्येक वीज बिल भरणा केंद्रावर तसेच ग्रामपंचायत कार्यालयांवर फलक लावावेत. त्याच बरोबर वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी, अधिका-यांनी गणवेष परिधान करावा व त्यावर नेमप्लेट लावण्याचा नियम असून, तसे न केल्यास संबंधितांना दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. परंतु अधिकारी व कर्मचारी त्याचे पालन करीत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. निफाड तालुक्यातील चांदोरी येथील ५२५ शेतकरी वीज ग्राहकांनी वीज पुरवठा सुरूळीत होत नसल्याबद्दल तक्रार केली असुनही अद्यापही वीज कंपनीने त्याची दखल घेतली नसल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत वीज तक्रारींची तात्काळ सोडवणूक करण्याचे आदेश संबंधित अधिकाºयांना देण्यात आले,त्याच बरोबर बैठकीच्या इतिवृत्तात त्याची नोंद घेवून पुढच्या बैठकीत तक्रारींवर वीज कंपनीने काय कार्यवाही केली याचा अहवालही ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या.

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारNashikनाशिक