शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

चर खोदून पाणीपुरवठ्याचा भगीरथ प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:57 IST

गंगापूर धरणासाठी साठ्याचे काम करणाऱ्या दोन धरणांत पाणी असूनही केवळ वीस वर्षांपासून निम्नपातळीवरील पाणी एका खडकामुळे जलविहिरीत येऊ शकत नाही. महापालिकेच्या या बेपर्वाईवर लोकमतने वृत्त दिल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली असून, धरणात शुक्रवारपासून (दि.२१) चर खोदण्याचे काम सुरू झाले आहे.

नाशिक : गंगापूर धरणासाठी साठ्याचे काम करणाऱ्या दोन धरणांत पाणी असूनही केवळ वीस वर्षांपासून निम्नपातळीवरील पाणी एका खडकामुळे जलविहिरीत येऊ शकत नाही. महापालिकेच्या या बेपर्वाईवर लोकमतने वृत्त दिल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली असून, धरणात शुक्रवारपासून (दि.२१) चर खोदण्याचे काम सुरू झाले आहे. तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याचा हा प्रकार असला तरी आता पाणी पावसाने ओढ दिल्याने आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास शहरात पाणी कपात अटळ असल्याचे स्पष्टीकरण आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहे. दरम्यान, महापौरांसह महापालिकेचे पदाधिकारी शनिवारी (दि.२२) धरणाची पाहणी करणार आहेत.  गंगापूर धरणातून महापालिकेसाठी आरक्षित पाणी मिळत असले तरी त्यानंतर त्यात गौतमी, गोदावरी आणि कश्यपी धरणाचे पाणी सोडते. यंदा हे पाणी अखेरच्या चरणात अर्धवट स्थितीत सोडून जलसंपदा विभागाने अडचण केली आहे. गंगापूर धरणातील साठ्या व्यतिरिक्तकश्यपी या साठवण धरणात सध्या ९० दशलक्षघनफूट, तर गौतमी गोदावरी धरणात ६० दशलक्षघनफूट पाणी आहे. धरणातून हे पाणी सोडले तरी पाच ते सहा किलोमीटर अंतरावरून ते मध्ये येत असून, बाष्पीभवनामुळे हे पाणी कमी होईल. याशिवाय ते आल्यानंतर त्याची पातळी कमी असेल तर याच ठिकाणी असलेल्या खडकामुळे ते पाणी धरणाच्या जलविहिरीत पोहोचणार नाही, अशी भीती आहे. गेल्या वीस वर्षांपूर्वी गंगापूर धरणाच्या शिरोभागाच्या कामाच्या वेळीच हा खडक हटवून धरणातील निन्म पातळीवरील पाणी जलवाहिरीत आणण्याचे काम करणे बंधनकारक होते मात्र अद्याप हे काम झालेले नाही. जलसंपदा विभागानेदेखील पालिकेला वेळोवेळी पत्र व्यवहार केला आहे.आता शहरात पाणीबाणी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषत: पावसाने ओढ दिल्याने पाणी कितपत पुरेल याविषयी शंका आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले चर खोदण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे.तर पाणी कपात अटळगंगापूर धरणात चर खोदण्याचे काम सुरू असले तरी मूळ खडक हटविण्याचे काम न झाल्याने दीडशे एमसीएफटी पाणी मिळणे अडचणीचे झाले आहे, तर दुसरीकडे चेहेडी बंधाºयाच्या जवळ मलयुक्त आणि अळ्या असलेले पाणी असल्याने पाणी उपसा बंद करण्यात आल्याने दारणा धरणात सुमारे दीडशे दशलक्षघनफूट पाणी आरक्षित असूनही त्याचा उपयोग होत नाही. त्यातच पावसाने ओढ दिली असल्याने आणखी पाच-दिवस पाऊस न झाल्यास पाणी कपात अटळ असल्याची माहिती आयुक्त गमे यांनी दिली.दारणातून आवर्तन सोडण्यासाठी गमे यांचे पत्रदारणा धरणातून महापालिकेला ३०० दशलक्षघनफूट पाणी आरक्षण मिळाले आहे. चेहेडी येथे बंधारा बांधून तेथून महापालिका पाणी घेत असली तरी बंधाºयाच्या वरील बाजूस भगूर नगरपालिका आणि कॅण्टोमेंट बोर्डाचे मलयुक्त पाणी येत असून त्यामुळे महापालिकेला शुद्धीकरणात अडचणी येत असल्याने २२ मेपासून येथून पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. सध्या पाण्याची गरज लक्षात घेता दारणा धरणातून पाणी आवर्तन सोडावे, अशी मागणी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे. महापालिकेच्या वतीने चेहेडी बंधाºयाच्या पुढील बाजूस जेथून मलयुक्त पाणी येते त्याच्या पलीकडे जाऊन बंधारा बांधणे किंवा पाइपलाइन टाकून पाणी चेहेडी बंधाºयात आणणे असे दोन प्रस्ताव होते. त्यापैकी नवीन बंधारा बांधण्याबाबत महापालिका विचार करीत आहे, असे गमे यांनी सांगितले.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी