शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

चर खोदून पाणीपुरवठ्याचा भगीरथ प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:57 IST

गंगापूर धरणासाठी साठ्याचे काम करणाऱ्या दोन धरणांत पाणी असूनही केवळ वीस वर्षांपासून निम्नपातळीवरील पाणी एका खडकामुळे जलविहिरीत येऊ शकत नाही. महापालिकेच्या या बेपर्वाईवर लोकमतने वृत्त दिल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली असून, धरणात शुक्रवारपासून (दि.२१) चर खोदण्याचे काम सुरू झाले आहे.

नाशिक : गंगापूर धरणासाठी साठ्याचे काम करणाऱ्या दोन धरणांत पाणी असूनही केवळ वीस वर्षांपासून निम्नपातळीवरील पाणी एका खडकामुळे जलविहिरीत येऊ शकत नाही. महापालिकेच्या या बेपर्वाईवर लोकमतने वृत्त दिल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली असून, धरणात शुक्रवारपासून (दि.२१) चर खोदण्याचे काम सुरू झाले आहे. तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याचा हा प्रकार असला तरी आता पाणी पावसाने ओढ दिल्याने आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास शहरात पाणी कपात अटळ असल्याचे स्पष्टीकरण आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहे. दरम्यान, महापौरांसह महापालिकेचे पदाधिकारी शनिवारी (दि.२२) धरणाची पाहणी करणार आहेत.  गंगापूर धरणातून महापालिकेसाठी आरक्षित पाणी मिळत असले तरी त्यानंतर त्यात गौतमी, गोदावरी आणि कश्यपी धरणाचे पाणी सोडते. यंदा हे पाणी अखेरच्या चरणात अर्धवट स्थितीत सोडून जलसंपदा विभागाने अडचण केली आहे. गंगापूर धरणातील साठ्या व्यतिरिक्तकश्यपी या साठवण धरणात सध्या ९० दशलक्षघनफूट, तर गौतमी गोदावरी धरणात ६० दशलक्षघनफूट पाणी आहे. धरणातून हे पाणी सोडले तरी पाच ते सहा किलोमीटर अंतरावरून ते मध्ये येत असून, बाष्पीभवनामुळे हे पाणी कमी होईल. याशिवाय ते आल्यानंतर त्याची पातळी कमी असेल तर याच ठिकाणी असलेल्या खडकामुळे ते पाणी धरणाच्या जलविहिरीत पोहोचणार नाही, अशी भीती आहे. गेल्या वीस वर्षांपूर्वी गंगापूर धरणाच्या शिरोभागाच्या कामाच्या वेळीच हा खडक हटवून धरणातील निन्म पातळीवरील पाणी जलवाहिरीत आणण्याचे काम करणे बंधनकारक होते मात्र अद्याप हे काम झालेले नाही. जलसंपदा विभागानेदेखील पालिकेला वेळोवेळी पत्र व्यवहार केला आहे.आता शहरात पाणीबाणी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषत: पावसाने ओढ दिल्याने पाणी कितपत पुरेल याविषयी शंका आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले चर खोदण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे.तर पाणी कपात अटळगंगापूर धरणात चर खोदण्याचे काम सुरू असले तरी मूळ खडक हटविण्याचे काम न झाल्याने दीडशे एमसीएफटी पाणी मिळणे अडचणीचे झाले आहे, तर दुसरीकडे चेहेडी बंधाºयाच्या जवळ मलयुक्त आणि अळ्या असलेले पाणी असल्याने पाणी उपसा बंद करण्यात आल्याने दारणा धरणात सुमारे दीडशे दशलक्षघनफूट पाणी आरक्षित असूनही त्याचा उपयोग होत नाही. त्यातच पावसाने ओढ दिली असल्याने आणखी पाच-दिवस पाऊस न झाल्यास पाणी कपात अटळ असल्याची माहिती आयुक्त गमे यांनी दिली.दारणातून आवर्तन सोडण्यासाठी गमे यांचे पत्रदारणा धरणातून महापालिकेला ३०० दशलक्षघनफूट पाणी आरक्षण मिळाले आहे. चेहेडी येथे बंधारा बांधून तेथून महापालिका पाणी घेत असली तरी बंधाºयाच्या वरील बाजूस भगूर नगरपालिका आणि कॅण्टोमेंट बोर्डाचे मलयुक्त पाणी येत असून त्यामुळे महापालिकेला शुद्धीकरणात अडचणी येत असल्याने २२ मेपासून येथून पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. सध्या पाण्याची गरज लक्षात घेता दारणा धरणातून पाणी आवर्तन सोडावे, अशी मागणी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे. महापालिकेच्या वतीने चेहेडी बंधाºयाच्या पुढील बाजूस जेथून मलयुक्त पाणी येते त्याच्या पलीकडे जाऊन बंधारा बांधणे किंवा पाइपलाइन टाकून पाणी चेहेडी बंधाºयात आणणे असे दोन प्रस्ताव होते. त्यापैकी नवीन बंधारा बांधण्याबाबत महापालिका विचार करीत आहे, असे गमे यांनी सांगितले.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी