शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष निर्यातीवर थंडीचा परिणाम अत्यल्पच ७० कंटेनर निर्यात : सहा हजार कंटेनरची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 01:08 IST

जिल्ह्यात दीड लाख एकरवर द्राक्षबागा असून, कडाक्याच्या थंडीचा निर्यातक्षम द्राक्षबागांवर फारसा परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ठळक मुद्देद्राक्षांना फुलोरा व काही ठिकाणी मणींची अवस्था द्राक्षांवर रोगाचा प्रादुर्भाव द्राक्षबागांमध्ये धूर व कीटकनाशकांची फवारणी

नाशिक : जिल्ह्यात दीड लाख एकरवर द्राक्षबागा असून, कडाक्याच्या थंडीचा निर्यातक्षम द्राक्षबागांवर फारसा परिणाम होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आतापर्यंत बागलाण तालुका व परिसरातून रशिया, मलेशिया, हॉँगकॉँग येथे ७० ते ८० कंटेनरची निर्यात झाल्याचे सांगण्यात आले.मागील आठ दिवसांत रशियात १५ कंटनेर द्राक्षांची निर्यात झाल्याचे सांगितले जाते. सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा संकटात सापडल्याचे चित्र होते. मात्र नंतर हवामान चांगलं राहिल्याने निर्यातक्षम द्राक्षबागांना त्याचा फायदाच झाला. आॅक्टोबरनंतर नोव्हेंबरमध्ये हवामान स्वच्छ असल्याने द्राक्षांना फुलोरा व काही ठिकाणी मणींची अवस्था होती. मध्यंतरी अचानक ढगाळ हवामान होऊन पावसाच्या हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी, नाशिक, निफाड व इगतपुरी तालुक्यांत झाल्या होत्या. मात्र हा पाऊस कोणत्या कारणांमुळे झाला, का झाला, पावसाचे नेमके कारण समजू शकले नव्हते. नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढत असल्याुमळे द्राक्षांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून शेतकºयांना द्राक्षबागांमध्ये धूर व कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. द्राक्ष पिकाखालील क्षेत्र ५२ हजार ३८६ हेक्टर असून, त्यात सर्वाधिक निफाड तालुक्यात १९ हजार ९६६ हेक्टर त्यानंतर दिंडोरीत १५ हजार १६७ हेक्टर व नाशिकमध्ये ११ हजार ६७१ हेक्ट तसेच चांदवड तालुक्यात तीन हजार ७५२ हेक्टर क्षेत्र आहे. यात थॉमसन सिडलेस, सोनाका, तास-इ- गणेश, एच-५, क्रिमसन, फनटासी क्लोन-२ या द्राक्ष जातींची लागवड केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत कळवण, सटाणा, चांदवड व देवळा या भागांतील अर्ली द्राक्षांची जवळपास ४० कंटेनरची निर्यात श्रीलंका व रशिया या देशांमध्ये झाली होती. यावर्षी काढणीला आलेल्या अर्ली द्राक्षांची आतापर्यंत १५ कंटेनरमधून ३३ हजार ६३६ मेट्रीक टन द्राक्षांची निर्यात होऊ शकल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एकुण या हंगामात ७० ते ८० द्राक्ष कंटेनरची निर्यात झाली आहे.मध्यंतरीच्या पावसामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले. मात्र वातावरण चांगले असल्याने निर्यातक्षम द्राक्षांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. मागील वर्षी ६५०० कंटेनर द्राक्षांची निर्यात परदेशात झाली. यंदा सहा हजार कंटेनरच्या आसपास द्राक्ष कंटेनरची निर्यात होईल.