शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने जिल्ह्यातील  १२०० शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:35 IST

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा, गारपीट व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ५४ गावांमधील ११८४ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले असून, सुमारे ९४० हेक्टरवरील पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे.

नाशिक : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा, गारपीट व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ५४ गावांमधील ११८४ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले असून, सुमारे ९४० हेक्टरवरील पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे. या संदर्भातील प्राथमिक नुकसानीचा अहवाल कृषी खात्याने महसूल विभागाला सादर केला असून, त्यात कमी-अधिक होऊ शकते.  मालेगाव, बागलाण, देवळा, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, निफाड, सिन्नर तालुक्यांतील ग्रामीण भागात गेल्या आठवड्यात वादळी वारा, गारपीट व अवकाळी पावसाने झोडपून काढले.  विजेचा कडकडाट करीत मुसळधार कोसळलेल्या या पावसाने वीज कोसळून आठ बळी घेण्याबरोबरच पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अचानक आलेल्या पावसाने शेतकºयांची धावपळ उडून, उभ्या पिकाचे नुकसान सोसावे लागले. प्रामुख्याने गहू, कांदा, टोमॅटो, मिरची, भाजीपाला या प्रमुख पिकांबरोबरच द्राक्ष, डाळिंब, लिंबू, आंबा, कलिंगड या फळपिकांनाही फटका बसला. द्राक्षाची बाग वादळी वाºयात कोलमडून पडली तर खळ्यात काढून ठेवलेला उन्हाळ कांदाही पावसामुळे भिजला. टोमॅटोचे सुडे भुईसपाट झाल्या. भाजीपाल्याचेही नुकसान झाले. सलग तीन दिवस अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असताना शासनाकडून मात्र नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात न आल्याने कृषी व महसूल खाते हात बांधून बसले, परिणामी शेतकºयांनी आणखी नुकसान नको म्हणून आपल्या शेतातील आवरासावर करून घेतली. त्यानंतर चार दिवसांनी शासनाला या अवकाळी पावसाचे गांभीर्य लक्षात आल्यावर त्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कृषी, महसूल खात्याने संयुक्तरीत्या पाहणी करून प्राथमिक अहवाल सादर केला असून, त्यात जिल्ह्णातील ५४ गावांमधील शेतीपिकांना अवकाळीचा फटका बसला असून, त्यात सर्वाधिक नुकसान कांद्याचे झाले. ३८२ हेक्टर क्षेत्रावरील कांदा तर त्याखालोखाल ३०५ हेक्टरवरील भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. २५ हेक्टरवरील गहू, ४ हेक्टरवरील टोमॅटो भुईसपाट झाले. डाळिंबाचे १७१ हेक्टर तर द्राक्षाचे २१ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. चिकू, लिंबू, आंबा, कलिंगड, मिरची, भोपळा, काकडी या पिकांचेही कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले. एकूण २१८ हेक्टरवरील फळपिके तर ७२२ हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाले आहे.या नुकसानीत राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पिकाचे ३३ टक्क्यापेक्षा कमी व अधिक नुकसानीची पाहणी करण्यात आली. ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान असल्यासच शेतकºयांना नुकसानीची भरपाई मिळणार असून, त्यापेक्षा कमी असल्यास कोणतीही मदत देय नाही. त्यामुळे ज्यावेळी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे करण्यात येतील व नुकसानीची पाहणी केली जाईल. त्यात खºया अर्थाने नुकसानीचा आकडा निश्चित करता येणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय