शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

अवकाळीने जिल्ह्यातील  १२०० शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:35 IST

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा, गारपीट व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ५४ गावांमधील ११८४ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले असून, सुमारे ९४० हेक्टरवरील पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे.

नाशिक : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा, गारपीट व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ५४ गावांमधील ११८४ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले असून, सुमारे ९४० हेक्टरवरील पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे. या संदर्भातील प्राथमिक नुकसानीचा अहवाल कृषी खात्याने महसूल विभागाला सादर केला असून, त्यात कमी-अधिक होऊ शकते.  मालेगाव, बागलाण, देवळा, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, निफाड, सिन्नर तालुक्यांतील ग्रामीण भागात गेल्या आठवड्यात वादळी वारा, गारपीट व अवकाळी पावसाने झोडपून काढले.  विजेचा कडकडाट करीत मुसळधार कोसळलेल्या या पावसाने वीज कोसळून आठ बळी घेण्याबरोबरच पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अचानक आलेल्या पावसाने शेतकºयांची धावपळ उडून, उभ्या पिकाचे नुकसान सोसावे लागले. प्रामुख्याने गहू, कांदा, टोमॅटो, मिरची, भाजीपाला या प्रमुख पिकांबरोबरच द्राक्ष, डाळिंब, लिंबू, आंबा, कलिंगड या फळपिकांनाही फटका बसला. द्राक्षाची बाग वादळी वाºयात कोलमडून पडली तर खळ्यात काढून ठेवलेला उन्हाळ कांदाही पावसामुळे भिजला. टोमॅटोचे सुडे भुईसपाट झाल्या. भाजीपाल्याचेही नुकसान झाले. सलग तीन दिवस अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असताना शासनाकडून मात्र नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात न आल्याने कृषी व महसूल खाते हात बांधून बसले, परिणामी शेतकºयांनी आणखी नुकसान नको म्हणून आपल्या शेतातील आवरासावर करून घेतली. त्यानंतर चार दिवसांनी शासनाला या अवकाळी पावसाचे गांभीर्य लक्षात आल्यावर त्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कृषी, महसूल खात्याने संयुक्तरीत्या पाहणी करून प्राथमिक अहवाल सादर केला असून, त्यात जिल्ह्णातील ५४ गावांमधील शेतीपिकांना अवकाळीचा फटका बसला असून, त्यात सर्वाधिक नुकसान कांद्याचे झाले. ३८२ हेक्टर क्षेत्रावरील कांदा तर त्याखालोखाल ३०५ हेक्टरवरील भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. २५ हेक्टरवरील गहू, ४ हेक्टरवरील टोमॅटो भुईसपाट झाले. डाळिंबाचे १७१ हेक्टर तर द्राक्षाचे २१ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. चिकू, लिंबू, आंबा, कलिंगड, मिरची, भोपळा, काकडी या पिकांचेही कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले. एकूण २१८ हेक्टरवरील फळपिके तर ७२२ हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाले आहे.या नुकसानीत राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पिकाचे ३३ टक्क्यापेक्षा कमी व अधिक नुकसानीची पाहणी करण्यात आली. ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान असल्यासच शेतकºयांना नुकसानीची भरपाई मिळणार असून, त्यापेक्षा कमी असल्यास कोणतीही मदत देय नाही. त्यामुळे ज्यावेळी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे करण्यात येतील व नुकसानीची पाहणी केली जाईल. त्यात खºया अर्थाने नुकसानीचा आकडा निश्चित करता येणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय