शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पूर्व भागालाही दुष्काळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:29 IST

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील गावांनाही यंदा पहिल्यांदाच बसला असून, दारणा, गोदावरीसारख्या नद्या असूनदेखील एकलहरे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, माडसांगवी, गंगावाडी, सिद्धार्थनगर, एकलहरेगाव या पंचक्रोशीतही दुष्काळाचा दाह मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. भर दुपारी कडक उन्हामुळे ग्रामीण भागात चिटपाखरूदेखील दृष्टीस पडत नाही.

एकलहरे : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील गावांनाही यंदा पहिल्यांदाच बसला असून, दारणा, गोदावरीसारख्या नद्या असूनदेखील एकलहरे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, माडसांगवी, गंगावाडी, सिद्धार्थनगर, एकलहरेगाव या पंचक्रोशीतही दुष्काळाचा दाह मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. भर दुपारी कडक उन्हामुळे ग्रामीण भागात चिटपाखरूदेखील दृष्टीस पडत नाही.वाढत्या उन्हामुळे शेतीकामासाठी शेतकरी वर्ग सकाळी दहाच्या आधी व दुपारी चारनंतर शेती कामे करतात, तर व्यापारी, दुकानदार सायंकाळी आपापले व्यवहार सुरू करतात. शेळ्या, मेंढ्यांचे कळप झाडा झुडपांच्या सावलीच्या आडोशाने पाला पाचोळा खाऊन तेथेच विसावतात. गाई, गुरे पिण्याच्या पाण्याची वाट बघत झाडाखाली विसावतात. नाशिक तालुका पूर्व भागातील अनेक गावे दारणा व गोदावरी नदीच्या आसपास असल्याने नद्यांना आवर्तन सोडले तरच पिकांना पाणी देऊ शकतात.पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे यंदा विहिरींना कमी पाणी आले. ऐन उन्हाळ्यात या विहिरींनीही तळ गाठला आहे. ज्या ठिकाणी विहिरींना पाणी आहे ते पाणीटंचाईग्रस्त गावांची तहान भागवित आहेत. सामनगाव येथे पिण्याच्या पाण्यासाठी एकलहरे वीज केंद्र प्रशासनाकडून दारणेचे पाणी पिण्यासाठी दिलेले आहे. एक दिवस गावासाठी व एक दिवस मळे विभागासाठी पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.तालुक्याच्या पूर्व भागातील कोटमगाव व जाखोरी परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था विजेच्या लपंडावाने दयनीय झाली आहे. दारणा नदीच्या काठावर असलेल्या या गावांना पाण्याचे रोटेशन सोडले नाही तर गावकऱ्यांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळू शकत नाही. दुसरीकडे पाण्याचे रोटेशन सोडले तर विजेअभावी त्या पाण्याचा वापर करता येत नाही. वीज कंपनीने थ्री फेज लाइट बंद केल्याने शेतीसाठी व पिण्यासाठीही पाणी उचलता येत नाही. अशा परिस्थितीत कोटमगावचे सरपंच बाळासाहेब म्हस्के यांनी स्वत:च्या विहिरीचे पाणी विनामोबदला गावाला पिण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. नदीचे पाणी वापरता येत नाही, तर दुसरीकडे अनेक विहिरींनी तळ गाठला असल्याने शेतात उभ्या पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. मका, घास, कोबी, फ्लॉवर आदी पिके कोमेजून गेली आहेत. उन्हाच्या कडाक्याने चाळीत साठवलेला कांदा काही प्रमाणात सडू लागला आहे. एकलहरे येथील सिद्धार्थनगर भागात पिण्याच्या पाणी एकलहरे वीज निर्मिती कंपनी प्रशासनाने उपलब्ध करून दिले आहे. मात्र सुमारे पाच हजार नागरिकांना ते पुरत नाही. एक तास पाण्याचा पुरवठा होतो. काही भागांत पाणी पोहचत नाही. त्यामुळे दुपारी तीन वाजता येणाºया पाण्यासाठी सकाळपासूनच टाकीजवळ हंडे, बादल्या, कॅन ठेवून नंबर लावला जातो. वापरण्यासाठी बोअरवेलचे पाणी पुरविले जाते. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन सरपंच मोहिनी जाधव यांनी केले आहे.स्थानिकांना उपयोग नाहीएकलहरे गाव व परिसरात गोदावरीच्या पाण्याचा वापर केला जातो. गोदावरीचे पाणी शेती व वापरण्यासाठी,तर दारणेचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. येथेही वीजपुरवठ्याची समस्या आहे. त्यामुळे पाणी असूनही नागरिकांना ते वापरता येत नाही.४दुष्काळी परिस्थितीमुळे धरणातील पाण्याचा साठा कमी झाला असल्याने नगर, औरंगाबादसाठी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडले जाते. ते पाणी स्थानिकांना वापरता येत नाही. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी