शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

पूर्व भागालाही दुष्काळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:29 IST

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील गावांनाही यंदा पहिल्यांदाच बसला असून, दारणा, गोदावरीसारख्या नद्या असूनदेखील एकलहरे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, माडसांगवी, गंगावाडी, सिद्धार्थनगर, एकलहरेगाव या पंचक्रोशीतही दुष्काळाचा दाह मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. भर दुपारी कडक उन्हामुळे ग्रामीण भागात चिटपाखरूदेखील दृष्टीस पडत नाही.

एकलहरे : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील गावांनाही यंदा पहिल्यांदाच बसला असून, दारणा, गोदावरीसारख्या नद्या असूनदेखील एकलहरे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, माडसांगवी, गंगावाडी, सिद्धार्थनगर, एकलहरेगाव या पंचक्रोशीतही दुष्काळाचा दाह मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. भर दुपारी कडक उन्हामुळे ग्रामीण भागात चिटपाखरूदेखील दृष्टीस पडत नाही.वाढत्या उन्हामुळे शेतीकामासाठी शेतकरी वर्ग सकाळी दहाच्या आधी व दुपारी चारनंतर शेती कामे करतात, तर व्यापारी, दुकानदार सायंकाळी आपापले व्यवहार सुरू करतात. शेळ्या, मेंढ्यांचे कळप झाडा झुडपांच्या सावलीच्या आडोशाने पाला पाचोळा खाऊन तेथेच विसावतात. गाई, गुरे पिण्याच्या पाण्याची वाट बघत झाडाखाली विसावतात. नाशिक तालुका पूर्व भागातील अनेक गावे दारणा व गोदावरी नदीच्या आसपास असल्याने नद्यांना आवर्तन सोडले तरच पिकांना पाणी देऊ शकतात.पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे यंदा विहिरींना कमी पाणी आले. ऐन उन्हाळ्यात या विहिरींनीही तळ गाठला आहे. ज्या ठिकाणी विहिरींना पाणी आहे ते पाणीटंचाईग्रस्त गावांची तहान भागवित आहेत. सामनगाव येथे पिण्याच्या पाण्यासाठी एकलहरे वीज केंद्र प्रशासनाकडून दारणेचे पाणी पिण्यासाठी दिलेले आहे. एक दिवस गावासाठी व एक दिवस मळे विभागासाठी पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.तालुक्याच्या पूर्व भागातील कोटमगाव व जाखोरी परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था विजेच्या लपंडावाने दयनीय झाली आहे. दारणा नदीच्या काठावर असलेल्या या गावांना पाण्याचे रोटेशन सोडले नाही तर गावकऱ्यांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळू शकत नाही. दुसरीकडे पाण्याचे रोटेशन सोडले तर विजेअभावी त्या पाण्याचा वापर करता येत नाही. वीज कंपनीने थ्री फेज लाइट बंद केल्याने शेतीसाठी व पिण्यासाठीही पाणी उचलता येत नाही. अशा परिस्थितीत कोटमगावचे सरपंच बाळासाहेब म्हस्के यांनी स्वत:च्या विहिरीचे पाणी विनामोबदला गावाला पिण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. नदीचे पाणी वापरता येत नाही, तर दुसरीकडे अनेक विहिरींनी तळ गाठला असल्याने शेतात उभ्या पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. मका, घास, कोबी, फ्लॉवर आदी पिके कोमेजून गेली आहेत. उन्हाच्या कडाक्याने चाळीत साठवलेला कांदा काही प्रमाणात सडू लागला आहे. एकलहरे येथील सिद्धार्थनगर भागात पिण्याच्या पाणी एकलहरे वीज निर्मिती कंपनी प्रशासनाने उपलब्ध करून दिले आहे. मात्र सुमारे पाच हजार नागरिकांना ते पुरत नाही. एक तास पाण्याचा पुरवठा होतो. काही भागांत पाणी पोहचत नाही. त्यामुळे दुपारी तीन वाजता येणाºया पाण्यासाठी सकाळपासूनच टाकीजवळ हंडे, बादल्या, कॅन ठेवून नंबर लावला जातो. वापरण्यासाठी बोअरवेलचे पाणी पुरविले जाते. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन सरपंच मोहिनी जाधव यांनी केले आहे.स्थानिकांना उपयोग नाहीएकलहरे गाव व परिसरात गोदावरीच्या पाण्याचा वापर केला जातो. गोदावरीचे पाणी शेती व वापरण्यासाठी,तर दारणेचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. येथेही वीजपुरवठ्याची समस्या आहे. त्यामुळे पाणी असूनही नागरिकांना ते वापरता येत नाही.४दुष्काळी परिस्थितीमुळे धरणातील पाण्याचा साठा कमी झाला असल्याने नगर, औरंगाबादसाठी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडले जाते. ते पाणी स्थानिकांना वापरता येत नाही. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी