शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

सिन्नरला रब्बी हंगामातील पिकांना मोठी पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 22:54 IST

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात यावर्षी ज्वारी, हरभऱ्याऐवजी शेतकऱ्यांनी मका, गहू, कांदा या पिकांना पसंती दिली असून, यामुळे लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देपूर्व भाग : लागवडीत झाली वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात यावर्षी ज्वारी, हरभऱ्याऐवजी शेतकऱ्यांनी मका, गहू, कांदा या पिकांना पसंती दिली असून, यामुळे लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.अतिपावसाने खरिपाचे पीक पाण्याखाली गेल्याने बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा विहिरींना पाणी मुबलक असल्याने झालेले नुकसान रब्बीच्या उत्पादनातून भरून निघेल अशी अपेक्षा ठेवून गहू, मका, कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे.तालुक्याच्या पूर्व भागातील देवपूर, खोपडी, दातली, निमगाव, वडांगळी, कीर्तांगळी, शिंदेवाडी, उजनी, भरतपूर, मिठसागरे, पुतळेवाडी, पंचाळे, पाथरे, वावी आदी ठिकाणी वरील पिकांना पसंती दिली आहे.पूर्व भागात दहा वर्षांनंतर जाम व देव नदी दुथडी भरून वाहिली असून, नदीपात्रात असलेले बंधारे तुडुंब असल्याने यंदा रब्बी हंगाम जोमात होईल, अशी अपेक्षा शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे. प्रत्येक शेतकºयाच्या शेतातील विहिरीला मुबलक पाणी आहे. शेतकामांना सुरुवात झाल्याने मजूरटंचाई जाणवत आहे. यामुळे ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणीला पसंती दिली जात आहे. परतीच्या पावसाने कांदा रोपे सडल्याने कांदाबियाणांची पेरणी प्रथमच या भागात पहावयास मिळत आहे. जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी मका क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली असली तरी लष्करी अळीचे संकट रब्बीतही कायम आहे. पेरणी खोळंबलीकाही ठिकाणी शेतात साचलेले पावसाचे पाणी तसेच असल्याने रब्बी पेरणी खोळंबली असून, दहा ते बारा दिवसांत वाफसा झाल्यानंतर उर्वरित पेरण्या पूर्ण होतील, असा अंदाज आहे.

टॅग्स :weatherहवामानFarmerशेतकरी