शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नाशिकपासून ४० किलोमीटरच्या परिघात  भूकंपाचे धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:02 IST

कळवण तालुक्यातील दळवट, लिंगामे आदी गावांना काही दिवसांपूर्वी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने भीतीचे सावट कायम असताना, सोमवारी सकाळी नाशिकपासून ४० किलोमीटरच्या परिघात एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता फारशी नसली तरी, नाशिकच्या जवळच हे धक्के जाणवल्याने शहरवासीयांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. रिश्टल स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.२ इतकी असल्याने त्याची नोंद मेरीच्या केंद्रावर झाली आहे. 

नाशिक : कळवण तालुक्यातील दळवट, लिंगामे आदी गावांना काही दिवसांपूर्वी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने भीतीचे सावट कायम असताना, सोमवारी सकाळी नाशिकपासून ४० किलोमीटरच्या परिघात एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता फारशी नसली तरी, नाशिकच्या जवळच हे धक्के जाणवल्याने शहरवासीयांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. रिश्टल स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.२ इतकी असल्याने त्याची नोंद मेरीच्या केंद्रावर झाली आहे.   सकाळी ९ वाजून ४४ मिनिटे ३१ सेकंदाच्या दरम्यान जवळपास १९५ सेकंद इतक्या कालावधीत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नाशिक शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर हे धक्के बसल्याचा प्राथमिक अंदाज असून, साधारणत: पेठ, सुरगाणा, हरसूल या भागात त्याचा केंद्रबिंदू असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  साधारणत: ३.२ रिश्टल स्केलची तीव्रता या धक्क्यांची असल्याने जमिनीला हादरे बसल्याचे तसेच भिंती व दरवाजे, खिडक्यांची तावदाने हलल्याचे सांगण्यात आले. साधारणत: तीन मिनिटांच्या कालावधीत जमीन हादरली. त्यानंतरही काही कालावधीनंतर दोन धक्के बसले आहेत. त्याची तीव्रता मात्र १.३ व १.६ रिश्टल स्केल इतकी आहे. त्यामुळे फारसे काही जाणवले नाही. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुका भूकंपप्रवण म्हणून नोंदविला गेला असून, याठिकाणी अधून मधून भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने तेथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. २०१८ ची भीती २०१८ मध्ये भूगर्भात अनेक हालचाली होऊन स्थित्यंतरे होण्याची शक्यता असल्याने आणि त्यामुळे वर्षभरात अनेकदा भूकंपाचे धक्के बसू शकतात अशी शक्यता नासाच्या शास्त्रज्ञांनी नोव्हेंबर महिन्यात वर्तविली होती. भूकंपाची शक्यता केवळ भूकंपप्रवण क्षेत्रातच होईल असे नव्हे तर पृथ्वीवर त्याचे धक्के जाणवतील असे शास्त्रज्ञांनी म्हटले होते. त्यांच्या या भाकित अनेकांना आठवण झाली. २०१८ उजाडण्यास अद्याप काही दिवसांचा कालावधी असून, सर्वत्र नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असताना २०१८ कडे झुकतानाच भूकंपाची चाहूल लागल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. या भागात नेहमीच बसणाºया भूकंपाच्या धक्क्यामागील कारणे अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नसून, त्यासाठी दिल्ली व हैदराबादच्या भूगर्भ शास्त्रज्ञांनादेखील पाचारण करण्यात आले; परंतु त्याचा उलगडा होऊ शकलेला नाही. आता नाशिक शहरापासून अवघ्या ४० किलोमीटर परिसरापर्यंत धक्के जाणवल्याने नाशिककरांच्या पोटात भीतीचा गोळा उठणे साहजिकच असले तरी, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांचे ठिकाण शोधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकEarthquakeभूकंप