शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

दळवटला भूकंपाचे धक्के ग्रामस्थांत भय : घरांवरील पत्रे हादरले, भांडी पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 11:45 PM

कळवण : दळवट परिसरातील भांडणे, कोसुर्डे, भाकुर्डे, जामले, दरेगाव, आमदर व वडाळा, जिरवाडे भागात शनिवारी रात्री व रविवारी (दि. ३) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरातील आदिवासी बांधवांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यंत्रणा नसल्याने भूकंप नेमका किती रिश्टर स्केलचा बसला याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. 

ठळक मुद्देआदिवासी बांधवांनी भीतीपोटी रात्र जागून काढलीदळवटला भूकंपाचे धक्के ग्रामस्थांत भय

कळवण : दळवट परिसरातील भांडणे, कोसुर्डे, भाकुर्डे, जामले, दरेगाव, आमदर व वडाळा, जिरवाडे भागात शनिवारी रात्री व रविवारी (दि. ३) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरातील आदिवासी बांधवांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यंत्रणा नसल्याने भूकंप नेमका किती रिश्टर स्केलचा बसला याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. भूकंपाच्या या धक्यामुळे अनेक आदिवासी बांधवांच्या घरातील भांडे पडली, घरांवरील पत्रे हादरली. दळवट हे भूकंपाचे केंद्रबिंदू असून याठिकाणी भूकंप मापक यंत्र अथवा धोक्याची सूचना देणारा सायरन नसल्याचे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. याबाबत मेरी कार्यालयाशी संपर्क साधला असता सकाळी ११ वाजेपर्यंत भूकंप मापक यंत्रावर कोणत्याची प्रकारची नोंद नसल्याचे कार्यालयातील चारु लता चौधरी यांनी सांगितले. तहसीलदार कैलास चावडे यांनी सौम्य धक्के बसल्याचे मान्य करत कुठेही मालमत्तेची अथवा जीवीत हानी झाली नसल्याचे सांगितले. तर महसूल आणि पोलीस यंत्रणेने दळवट परिसरात भेटी देऊन आदीवासी बांधवांशी चर्चा करु न त्यांना दिलासा दिला.दळवटचे सरपंच रमेश पवार, लक्क्षण पवार , यशवंत पवार यांनी भूकंपाच्या ह्या धक्क्यामुळे आदिवासी बांधव भयभयीत झाले असल्याचे सांगितले. दळवट परिसर १९९५ पासून भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने या भागाकडे शासनाने लक्ष केंद्रित करून विविध सुविधा पुरवाव्यात अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ै जयश्री पवार यांनी केली आहे.यंत्रणा कार्यान्वित कराच्दळवट परिसरात नेहमी असे धक्के बसत असतात. भूकंपमापन यंत्रच नसल्याने मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. शासनाने दळवट व परिसरातील भूकंपप्रवण क्षेत्रात भूकंप मापन यंत्र बसवावे. त्यामुळे भूकंप धक्का किती रिश्टरचा होता व त्याची तीव्रता तसेच पुर्वसुचना लक्षात येईल, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी केली आहे.आता तरी लक्ष द्याच्सप्टेंबर २०१३ मध्ये बोरदैवत, देवळीवणी, चिंचपाडा, खिराड, अंबिका, ओझर आदी परिसरात सलग ४ ते ५ दिवस भूकंपाचे धक्के बसले होते. या भागात भ्रमणध्वनीची सेवा सुरळीत मिळत नाही. त्यामुळे येथून कुठेही संपर्क होत नाही. अशा परिस्थितीत अघटित घडले तर आम्ही काय करायचे, असा सवाल या भागातील आदिवासी बांधवांनी केला आहे.