शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

दळवटला भूकंपाचे धक्के ग्रामस्थांत भय : घरांवरील पत्रे हादरले, भांडी पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:52 IST

कळवण : दळवट परिसरातील भांडणे, कोसुर्डे, भाकुर्डे, जामले, दरेगाव, आमदर व वडाळा, जिरवाडे भागात शनिवारी रात्री व रविवारी (दि. ३) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरातील आदिवासी बांधवांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यंत्रणा नसल्याने भूकंप नेमका किती रिश्टर स्केलचा बसला याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. 

ठळक मुद्देआदिवासी बांधवांनी भीतीपोटी रात्र जागून काढलीदळवटला भूकंपाचे धक्के ग्रामस्थांत भय

कळवण : दळवट परिसरातील भांडणे, कोसुर्डे, भाकुर्डे, जामले, दरेगाव, आमदर व वडाळा, जिरवाडे भागात शनिवारी रात्री व रविवारी (दि. ३) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरातील आदिवासी बांधवांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यंत्रणा नसल्याने भूकंप नेमका किती रिश्टर स्केलचा बसला याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. भूकंपाच्या या धक्यामुळे अनेक आदिवासी बांधवांच्या घरातील भांडे पडली, घरांवरील पत्रे हादरली. दळवट हे भूकंपाचे केंद्रबिंदू असून याठिकाणी भूकंप मापक यंत्र अथवा धोक्याची सूचना देणारा सायरन नसल्याचे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. याबाबत मेरी कार्यालयाशी संपर्क साधला असता सकाळी ११ वाजेपर्यंत भूकंप मापक यंत्रावर कोणत्याची प्रकारची नोंद नसल्याचे कार्यालयातील चारु लता चौधरी यांनी सांगितले. तहसीलदार कैलास चावडे यांनी सौम्य धक्के बसल्याचे मान्य करत कुठेही मालमत्तेची अथवा जीवीत हानी झाली नसल्याचे सांगितले. तर महसूल आणि पोलीस यंत्रणेने दळवट परिसरात भेटी देऊन आदीवासी बांधवांशी चर्चा करु न त्यांना दिलासा दिला.दळवटचे सरपंच रमेश पवार, लक्क्षण पवार , यशवंत पवार यांनी भूकंपाच्या ह्या धक्क्यामुळे आदिवासी बांधव भयभयीत झाले असल्याचे सांगितले. दळवट परिसर १९९५ पासून भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने या भागाकडे शासनाने लक्ष केंद्रित करून विविध सुविधा पुरवाव्यात अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ै जयश्री पवार यांनी केली आहे.यंत्रणा कार्यान्वित कराच्दळवट परिसरात नेहमी असे धक्के बसत असतात. भूकंपमापन यंत्रच नसल्याने मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. शासनाने दळवट व परिसरातील भूकंपप्रवण क्षेत्रात भूकंप मापन यंत्र बसवावे. त्यामुळे भूकंप धक्का किती रिश्टरचा होता व त्याची तीव्रता तसेच पुर्वसुचना लक्षात येईल, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी केली आहे.आता तरी लक्ष द्याच्सप्टेंबर २०१३ मध्ये बोरदैवत, देवळीवणी, चिंचपाडा, खिराड, अंबिका, ओझर आदी परिसरात सलग ४ ते ५ दिवस भूकंपाचे धक्के बसले होते. या भागात भ्रमणध्वनीची सेवा सुरळीत मिळत नाही. त्यामुळे येथून कुठेही संपर्क होत नाही. अशा परिस्थितीत अघटित घडले तर आम्ही काय करायचे, असा सवाल या भागातील आदिवासी बांधवांनी केला आहे.