शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

दळवटला भूकंपाचे धक्के ग्रामस्थांत भय : घरांवरील पत्रे हादरले, भांडी पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:52 IST

कळवण : दळवट परिसरातील भांडणे, कोसुर्डे, भाकुर्डे, जामले, दरेगाव, आमदर व वडाळा, जिरवाडे भागात शनिवारी रात्री व रविवारी (दि. ३) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरातील आदिवासी बांधवांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यंत्रणा नसल्याने भूकंप नेमका किती रिश्टर स्केलचा बसला याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. 

ठळक मुद्देआदिवासी बांधवांनी भीतीपोटी रात्र जागून काढलीदळवटला भूकंपाचे धक्के ग्रामस्थांत भय

कळवण : दळवट परिसरातील भांडणे, कोसुर्डे, भाकुर्डे, जामले, दरेगाव, आमदर व वडाळा, जिरवाडे भागात शनिवारी रात्री व रविवारी (दि. ३) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरातील आदिवासी बांधवांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यंत्रणा नसल्याने भूकंप नेमका किती रिश्टर स्केलचा बसला याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. भूकंपाच्या या धक्यामुळे अनेक आदिवासी बांधवांच्या घरातील भांडे पडली, घरांवरील पत्रे हादरली. दळवट हे भूकंपाचे केंद्रबिंदू असून याठिकाणी भूकंप मापक यंत्र अथवा धोक्याची सूचना देणारा सायरन नसल्याचे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. याबाबत मेरी कार्यालयाशी संपर्क साधला असता सकाळी ११ वाजेपर्यंत भूकंप मापक यंत्रावर कोणत्याची प्रकारची नोंद नसल्याचे कार्यालयातील चारु लता चौधरी यांनी सांगितले. तहसीलदार कैलास चावडे यांनी सौम्य धक्के बसल्याचे मान्य करत कुठेही मालमत्तेची अथवा जीवीत हानी झाली नसल्याचे सांगितले. तर महसूल आणि पोलीस यंत्रणेने दळवट परिसरात भेटी देऊन आदीवासी बांधवांशी चर्चा करु न त्यांना दिलासा दिला.दळवटचे सरपंच रमेश पवार, लक्क्षण पवार , यशवंत पवार यांनी भूकंपाच्या ह्या धक्क्यामुळे आदिवासी बांधव भयभयीत झाले असल्याचे सांगितले. दळवट परिसर १९९५ पासून भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने या भागाकडे शासनाने लक्ष केंद्रित करून विविध सुविधा पुरवाव्यात अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ै जयश्री पवार यांनी केली आहे.यंत्रणा कार्यान्वित कराच्दळवट परिसरात नेहमी असे धक्के बसत असतात. भूकंपमापन यंत्रच नसल्याने मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. शासनाने दळवट व परिसरातील भूकंपप्रवण क्षेत्रात भूकंप मापन यंत्र बसवावे. त्यामुळे भूकंप धक्का किती रिश्टरचा होता व त्याची तीव्रता तसेच पुर्वसुचना लक्षात येईल, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी केली आहे.आता तरी लक्ष द्याच्सप्टेंबर २०१३ मध्ये बोरदैवत, देवळीवणी, चिंचपाडा, खिराड, अंबिका, ओझर आदी परिसरात सलग ४ ते ५ दिवस भूकंपाचे धक्के बसले होते. या भागात भ्रमणध्वनीची सेवा सुरळीत मिळत नाही. त्यामुळे येथून कुठेही संपर्क होत नाही. अशा परिस्थितीत अघटित घडले तर आम्ही काय करायचे, असा सवाल या भागातील आदिवासी बांधवांनी केला आहे.