शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

वनविभागाचा मातीबंधारा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 17:23 IST

वणी : दिंडोरी तालुक्यातील बाबापुर येथील वनविभागाच्या जागेत बांधलेला मातीबंधारा फुटल्याने भातशेती, कांदा, टमाटा या पिकांचे नुकसान झाले असुन शेत जमीनीतील दोन विहीरींना याचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देबाबापुरच्या जंगल : पिकांसह दोन विहीरीचे नुकसान

वणी : दिंडोरी तालुक्यातील बाबापुर येथील वनविभागाच्या जागेत बांधलेला मातीबंधारा फुटल्याने भातशेती, कांदा, टमाटा या पिकांचे नुकसान झाले असुन शेत जमीनीतील दोन विहीरींना याचा फटका बसला आहे.याबाबत माहीती अशी की बाबापुर ते मार्कंडेय पर्वत रस्त्यादरम्यान वनविभागाच्या जंगलात सुमारे २५ फुट खोली,७० फुट लांबी ५ फुटाचा भराव असलेला मातीबंधारा गट नंबर ५९ व कुंपण नंबर ५६६ मधे वनविभागाने सुमारे चार महीन्यापुर्वी बांधला आहे, अशी माहिती बाबापुर येथील वनसमीतीचे अध्यक्ष व सरपंच गुलाब गावित यांनी दिली. पशु, पक्षी, वन्यजीव व जंगल परिसरात वास्तव्यास असलेल्या प्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे या हेतुने पाणी आडवा पाणी जिरवा या उपक्र मास अनुसरु न सदरचा मातीबंधारा बांधण्यात आला होता.शनिवारी रात्री हा मातीबंधारा फुटला सुमारे दहा फुट अंतराइतके भगदाड पडले. मातीबंधाऱ्यातील पाणी प्रवाहीत होत असल्याचा आवाज आला नाही. सकाळी ही बाब लक्षात आली. तेव्हा माती बंधाºयातील पाणी एका विहीरीत गेल्याने विहीर पुर्णत: भरली अंबादास देवराम राऊत यांचे मालकीची गट नंबर १०७ येथे ही विहीर आह.े येथे शेतजमीन राऊत यांची असुन त्यातील टमाटा ०.४० आर, कांद्याचे रोप ०.४० आर, कोथींबीर ०.२० आर अशा पिकांचे नुकसान झाले, तर गुलाब लक्ष्मण बोरसे यांच्या विहीरीची क्षती झाली. पोपट पांडु साबळे यांची ०.३० आर भातशेतीचे नुकसान झाले. पोपट यशवंत राऊत ०.४० आर भातशेतीचे नुकसान झाले. महसुल विभागाचे तलाठी एल. जी. पवार यांनी या नुकसानीचा पंचनामा केला आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली आहे. तसेच महसूल विभागाने पंचनाम्याचे सोपास्कार पुर्ण केले तरीही वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधूनह अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. (२० वणी १,२)

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी