शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

दुतोंड्या मारूती बुडाला; गोदावरीने ओलांडली धोक्याची पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 15:49 IST

दुपारी दोन वाजेपर्यंत १७ हजार ७४८ क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे रामसेतूवरून पूराचे पाणी गेले असून दुतोंड्या मारूतीची मुर्ती पाण्यात बुडाली आहे. गोदावरीच्या काठालगत अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्दे१७ हजार क्युसेकपेक्षा अधिक पाणी गोदापात्रात प्रवाहितगंगापूर धरणाचा जलसाठा ८५ टक्क्यावर पोहचला

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून अद्यापपर्यंत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणलोटक्षेत्रातून पाण्याची जोरदार आवक धरणात होऊ लागल्याने सकाळी नऊ वाजेपासून विसर्ग करण्यात येत आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत १७ हजार ७४८ क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे रामसेतूवरून पूराचे पाणी गेले असून दुतोंड्या मारूतीची मुर्ती पाण्यात बुडाली आहे. गोदावरीच्या काठालगत अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूराचे पाणी येथील कपालेश्वर मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत आले आहे. त्यामुळे सरदार चौकापासून पुढे गोदाकाठालगतचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. गोदाकाठावरील जवळपास सर्वच मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.गंगापूर धरणातून सातत्याने विसर्गात वाढ करण्यात येत असून सध्या १७ हजार क्युसेकपेक्षा अधिक पाणी गोदापात्रात प्रवाहित झाले आहे. नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मध्यरात्रीपासून पुढील दोन दिवस पश्चिम, मध्य महाराष्टÑासह कोकण व नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. घाटक्षेत्राच्या परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढला आहे. त्यामुळे गंगापूर धरणात त्र्यंबक, अंबोली या पाणलोटक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. परिणामी गंगापूर धरणाचा जलसाठा ८५ टक्क्यावर पोहचला. सकाळी नऊ वाजेपासून विसर्गात वाढ करण्यात आली आहे. अकरा वाजेपासून गोदावरीच्या जलस्तर उंचविण्यास सुरूवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत दुतोंड्याच्या डोक्याला पूराचे पाणी लागले. यामुळे बालाजी कोठपर्यंत पुराचे पाणी आले होते. गोदावरी नदीवरील घारपूरे घाट पूल, अहल्यादेवी होळकर पूल, संत गाडगे महाराज पूलावर नागरिकांनी पूर बघण्यासाठी गर्दी केली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.शहरातदेखील मध्यरात्रीपासून संततधार सुरू असल्यामुळे अहल्यादेवी होळकर पूलाखालून पुढे रामकुंडात १३ हजार ३३० क्युसेक इतके पाणी प्रवाहित आहे. मागील २४ तासांत शहरात ३३ मि.मी इतका पाऊस नोंदविला गेला. गोदावरीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सायखेडा, चांदोरी या भागातदेखील गोदावरीची पातळी वाढली असून सायखेड्याच्या धोकादायक पुलाला पूराचे पाणी लागले आहे. तसेच गोदाकाठावरील दुतोंड्या मारूतीची मुर्ती मानेपर्यंत बुडाली आहे. नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू पुलाला पाणी लागले असून विसर्गात वाढ झाल्यास या पुलावरूनही पूराचे पाणी वाहण्याची दाट शक्यता आहे. पूर बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या पूलांवर गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दुतोंड्या मारुती कमरेपर्यंत बुडाला, तर गंगा-गोदावरी मंदिरासह वस्त्रांतरगृहातही पाणी शिरले. गोदाघाटावरील लहान पूल, मंदिरे पाण्याखाली गेली. देवमामलेदार मंदिर, नीळकंठेश्वर मंदिरासह नारोशंकर मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. सांडव्यावरील देवी मंदिर पाण्याखाली गेले आहे. यामुळे नदीकाठालगत असलेल्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली असून सांडव्यावरील देवी मंदिर, कपालेश्वर मंदिर, सरदार चौक, पिंपळ चौक, बालाजी कोठ, सराफ बाजार या भागातील विक्रेत्यांनी दुकानांमधील विक्रीचे विविध साहित्य सुरक्षित स्थलांतरीत करण्यास सुरूवात केल्याचे चित्र पहावयास मिळाले. तसेच नागरिकांनी गोदाकाठालगत असलेली वाहने काढून घेतले आहे. गंगापूर धरणातून होणाऱ्या विसर्गाची पूर्वसूचना मिळाल्याने गोदाकाठावरील रहिवाशांसह विक्रेतेही सतर्क झाले आहेत. गोदाकाठाच्या परिसरात जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे दहा जवानांचे रेस्क्यू पथक गस्तीवर आहेत. पूराच्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांकडून दंडूका दाखविला जात आहे. रेस्क्यू पथकाकडून वारंवार नदीकाठालगत सावधानतेच्या विविध सुचना ध्वनिक्षेपकांंद्वारे दिल्या जात आहेत. तसेच अग्निशमन दलाचेपथकही गस्तीवर आहे.संततधार पाऊस आणि पूर बघण्यासाठी बाहेर पडलेले नाशिककर यामुळे शहरातील रविवार कारंजा, अशोक स्तंभ, मालेगावस्टॅन्ड, पंचवटी, सराफ बाजार, दहीपूल, शालीमार या भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहतूक पोलीस जणू शहरातून अचानक गायब झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पूलांवर बिकट परिस्थिती पहावयास मिळत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरीfloodपूरgangapur damगंगापूर धरणHigh Alertहाय अलर्ट