शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

काय सांगता? १३ लाख विद्यार्थ्यांना पावला कोरोना; परीक्षा न देताच झाले पास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 15:51 IST

नाशिक : कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व ...

नाशिक : कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांसह पहिली ते नववी व अकरावीच्याही शैक्षणिक वर्ष २०२१ परीक्षा रद्द केल्या. त्यामुळे या सर्वच परीक्षा न देता पास होण्याचा निकाल हातात पडल्याने या विद्यार्थ्यांना कोरोनाच पावल्याची भावना व्यक्त शैक्षणिक वर्तुळात व्यक्त होत आहे. यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना परीक्षा अनिवार्य नसल्या तरी शालेय स्तरावर मूल्यांकन चाचणीही होऊ न शकल्याने जिल्ह्यातील सुमारे १३ लाख विद्यार्थी कोणत्याही परीक्षेविना पास झाल्याने शैक्षणिक क्षेत्रातील ही घटना लक्षवेधी ठरली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चे विद्यार्थी

वर्ग - विद्यार्थी

पहिली - ११७०४५

दुसरी -१२१३४२

तिसरी -१२०६१८

चौथी -१२३९३९

पाचवी - १२२७४३

सहावी -१२०६४५

सातवी -११८३३२

आठवी -११५९१०

नववी -१११४२१

दहावी -९८९४९

अकरावी - ६८१६० बारावी -६८९१८

जिल्ह्यातील एकूण शाळा -५६२६

जिल्ह्यातील एकूण शिक्षक - ४१२१७

दहावीचा निकाल असा

कोरोना संकटामुळे राज्य शासनाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अनुकरण करीत राज्य शिक्षण मंडळामार्फत घेतलेल्या जाणारी शालान्त परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने गुणदान करून दहावीचा निकाल दि. १६ जुलैला जाहीर केला. यात नाशिक जिल्ह्यातून दहावीत प्रवेशित ९८ हजार ९४९ परीक्षेला प्रविष्ट ९२ हजार २३६ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ९२ हजार २१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ४९ हजार ४२७ मुले (९९.९६ टक्के) व ४२ हजार ४८३ (९९.९७) मुलींचा समावेश असल्याने नेहमीप्रमाणे अंतर्गत मूल्यांकन पद्धतीतही उत्तीर्णतेच्या प्रमाणात मुलींनीच बाजी मारली.

बारावीचा निकाल असा

नाशिक जिल्ह्यात बारावीत ६८ हजार ९१८ विद्यार्थी प्रवेशित होते. त्यांपैकी ६८ ५१६ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यांतील ६८ हजार २२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले; तर नाशिक विभागातून या वर्षी ९९.५६ मुलांसह ९९.६७ मुली उत्तीर्ण झाल्या असून, उत्तीर्ण मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण ०.११ टक्क्यांनी अधिक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळाexamपरीक्षाStudentविद्यार्थी