शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

शिंदे गटाच्या पक्षविस्तारामुळे शिवसेनेपुढील अडचणींत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2022 00:44 IST

शिवसेनेतील बंड गुप्त आणि सुप्तपणे घडले, त्याच कार्यपद्धतीनुसार नाशिक जिल्ह्यात पक्षाचा विस्तार सुरू आहे. मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे हे बंडात सुरुवातीपासून शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यानंतर खासदार हेमंत गोडसे गेले. तालुकानिहाय रणनीती व चाचपणी सुप्तपणे सुरू असल्याचे ताज्या घडामोडींवरून दिसून येत आहे. इगतपुरीचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्यापाठोपाठ माजी आमदार पांडुरंग गांगडदेखील शिंदे गटात दाखल झाले. गेल्या आठवड्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून शिंदे गटाने पक्षविस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सेनेपासून दूर गेलेल्या भाऊलाल तांबडे यांना दिंडोरी जिल्हाप्रमुखपदी तर पं.स.चे सभापतीपद भूषविलेल्या अनिल ढिकले यांच्याकडे नाशिकच्या जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदी लक्ष्मीबाई ताठे यांची नियुक्ती केली, तर संपर्कप्रमुख म्हणून ठाण्याचे संजय बच्छाव यांना सूत्रे सोपविली आहेत. माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्याकडे नाशिक महानगरप्रमुखपदाची धुरा सोपवली आहे. युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश म्हस्के यांची निवड केली.

ठळक मुद्देनेत्यांपाठोपाठ जुन्या निष्ठावंतांना गळाला लावण्यात यश; सेनेत कुरघोडी व संशयाचे वातावरण गडदतिदमेंच्या बंडाने शिवसेनेत पळापळथकबाकीदारांमध्ये राजकीय नेते आघाडीवरओबीसी मतांवर सर्वच पक्षांचे लक्ष केंद्रितगौरीच्या मृत्यूनंतर वेठबिगारीचा प्रश्न ऐरणीवर

मिलिंद कुलकर्णीशिवसेनेतील बंड गुप्त आणि सुप्तपणे घडले, त्याच कार्यपद्धतीनुसार नाशिक जिल्ह्यात पक्षाचा विस्तार सुरू आहे. मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे हे बंडात सुरुवातीपासून शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यानंतर खासदार हेमंत गोडसे गेले. तालुकानिहाय रणनीती व चाचपणी सुप्तपणे सुरू असल्याचे ताज्या घडामोडींवरून दिसून येत आहे. इगतपुरीचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्यापाठोपाठ माजी आमदार पांडुरंग गांगडदेखील शिंदे गटात दाखल झाले. गेल्या आठवड्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून शिंदे गटाने पक्षविस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सेनेपासून दूर गेलेल्या भाऊलाल तांबडे यांना दिंडोरी जिल्हाप्रमुखपदी तर पं.स.चे सभापतीपद भूषविलेल्या अनिल ढिकले यांच्याकडे नाशिकच्या जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदी लक्ष्मीबाई ताठे यांची नियुक्ती केली, तर संपर्कप्रमुख म्हणून ठाण्याचे संजय बच्छाव यांना सूत्रे सोपविली आहेत. माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्याकडे नाशिक महानगरप्रमुखपदाची धुरा सोपवली आहे. युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश म्हस्के यांची निवड केली.तिदमेंच्या बंडाने शिवसेनेत पळापळखासदार, आमदार, माजी आमदार शिंदे गटात गेले तरी नाशिक महानगरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. १५ हजार शपथपत्र ह्यमातोश्रीह्णकडे सोपविण्यात आले. त्यामुळे नाशिक एकदम ह्यओकेह्ण आहे, अशा भ्रमात वरिष्ठ पदाधिकारी राहिले आणि शिंदे गटाने ह्यकरेक्ट कार्यक्रमह्ण केला. म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष आणि उपनेते बबनराव घोलप यांचे शिष्य माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांना थेट महानगरप्रमुख म्हणून नियुक्त केले. तिदमे यांच्या बंडानंतर शिवसेनेत खळबळ उडाली. तिदमे यांच्यापाठोपाठ १५-१७ माजी नगरसेवक जाणार असल्याच्या चर्चेने वातावरण तापले. ह्यमातोश्रीह्णवरून निरोप आला आणि सगळे मतभेद, रागलोभ विसरून उपनेते, पदाधिकारी एकत्र आले. ह्यपदाधिकारी नगरसेवकांच्या दारीह्ण असा उपक्रम हाती घेण्यात आला. डॅमेज कंट्रोलचा फायदा किती होतो, हे आता बघायला हवे.थकबाकीदारांमध्ये राजकीय नेते आघाडीवरसहकार क्षेत्राने महाराष्ट्राचा एकेकाळी कायापालट केला. सामान्य शेतकऱ्याला मोठा हात दिला. अनेक नेते या क्षेत्राने दिले. आदर्शवत अशा संस्था उभ्या राहिल्या. राज्य, देश एवढेच नाही तर आशिया खंडात नावलौकिक मिळविलेल्या सहकारी संस्थांचा सगळ्यांना अभिमान होता; पण विषवल्ली शिरल्या. पराकोटीचा स्वार्थ बघीतला गेला. आणि सहकार क्षेत्र भ्रष्टाचाराने बरबटले. शेतकऱ्यांना हात देणाऱ्या या क्षेत्राने शेतकऱ्याच्या पोटावर पाय देण्याचे काम पुढे जाऊन केले. नाशिक जिल्हा बँकेने यंदा कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच पीक कर्ज दिले. वार्षिक सभेत सभासद आक्रमक झाले, तेव्हा प्रशासकांना थकबाकीदार असलेल्या १०० लोकांची नावे जाहीर करावी लागली. बँकेचे माजी चेअरमन राहिलेल्या गणपतराव पाटील, देवीदास पिंगळे, माणिकराव कोकाटे यांचे कुटुंबीय या यादीत आहेत. जि.प.च्या माजी अध्यक्षा विद्याताई पाटील, बागलाणचे भाजप आमदार दिलीप बोरसे यांचेही कुटुंबीय आहे. सहकार का बुडतोय, याचे उत्तर या यादीत आहे.ओबीसी मतांवर सर्वच पक्षांचे लक्ष केंद्रितमहाराष्ट्रात निवडणुकांचा हंगाम सुरू झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाजार समिती, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा आणि विधानसभा अशा क्रमाने निवडणुका होतील. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय संवेदनशील आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष हा विषय खुबीने हाताळतोय. नाशिक हे ओबीसी चळवळीचे केंद्र बनले आहे. समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांच्यामुळे मोठी ताकद याठिकाणी तयार झाली आहे. स्वाभाविकपणे प्रत्येक राजकीय पक्ष नाशिकवर लक्ष केंद्रित करीत आहे. भाजपने प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी चेहरा दिला आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून केली. तैलिक सभेच्या कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित राहिले. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी आघाडीचे उत्तर महाराष्ट्र मंथन शिबिरासाठी नाशिकला भेट दिली. या शिबिराला राज्यातील ओबीसी नेते उपस्थित होते. पूर्वी भाजपने ह्यमाधवह्ण प्रयोग यशस्वीपणे राबविला होता. त्याच वाटेने इतर पक्ष आता जात आहेत.गौरीच्या मृत्यूनंतर वेठबिगारीचा प्रश्न ऐरणीवरस्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणाऱ्या देशात पाचशे रुपयांसाठी, एका मेंढीसाठी पोटचा गोळा विकायची वेळ येते, हे लांच्छनास्पद आहे. इगतपुरीजवळील उभाडे वस्तीत राहणाऱ्या कातकरी समाजातील गौरीला सहा वर्षांंपूर्वी मेंढपाळांना विकण्यात आले. गेल्या पंधरवड्यात जखमी अवस्थेत तिला घराबाहेर टाकून देण्यात आले. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात तीन दिवस उपचाराची शर्थ करूनही गौरीचे प्राण वाचले नाहीत. श्रमजीवी संघटनेने हा प्रश्न हाती घेऊन प्रशासनापुढे मांडला, तेव्हा कोठे प्रशासन जागे झाले. २२ वेठबिगार मुलांची सुटका झाली; पण त्यासाठी गौरीला प्राणत्याग करावा लागला. आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मनसेप्रमुख राज ठाकरे, श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित यांनी हा प्रश्न लावून धरला. पोलीस दलाने संबंधितांवर गुन्हे दाखल केले. हा विषय तापल्याने राजकीय व प्रशासकीय पातळीवर दखल घेतली गेली. हा विषय स्मृतिआड जाऊ देता कामा नये. कातकरी समाजाला रोजगार, निवास आणि त्यांच्या मुलांची शिक्षणाची व्यवस्था याचा कायमस्वरूपी मार्ग निघेपर्यंत पाठपुरावा करायला हवा. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका