शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

राजापूरला चारा टंचाईने पशुपालक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 16:45 IST

शासनाचे दुर्लक्ष : चाराछावणीला अद्याप मुहूर्त नाही

ठळक मुद्देपशूपालकाकडे काही प्रमाणात बाहेरगावाहून आणलेला चारा संपून गेल्याने शेतकरी धास्तावले आहेत

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर हे गाव दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले असतानाही याठिकाणी शासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना राबविल्या गेल्या नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून जनावरांसाठी चारा संपुष्टात आल्याने चारा टंचाईमुळे पशुपालक हैराण झाले आहेत.राजापूर व परिसरात जनावरांचा चारा, पिण्यासाठी पाणी यांची टंचाई अधिक तीव्र होत चालली आहे. शासनाने अद्याप जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केलेल्या नाहीत. पशूपालकाकडे काही प्रमाणात बाहेरगावाहून आणलेला चारा संपून गेल्याने शेतकरी धास्तावले आहेत. मृग नक्षत्र लागून पाच ते सहा दिवस होऊनही पावसाचे आगमन होत नसल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे. येवला तालुक्यातील पूर्वकडील भागात मागील वर्षी खरीप पुर्णपणे वाया गेला असल्याने येथील चारा टंचाई निर्माण झाली आहे. मध्यंतरी चारा विकत आणून कसेबसे दिवस काढले. पण आता चारा विकत घेण्यासाठी पशूपालकांकडे पैसेही नाहीत. शेतकरी वर्ग पुरता डबघाईस आलेला आहे . राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने येथे दरवर्षी दुष्काळाची धग जाणवते. जनावरांना चारा नसल्यामुळे जनावरांनी खाऊन फेकलेली डाखळं सुध्दा आता जनावरं खात आहेत. प्रामुख्याने तालुूक्यातील पूर्व भागात सध्या चारा टंचाई ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे . परिसरातील विहीरींनीही तळ गाठला आहे. राजापूर येथील वाड्यावस्तीवर पिण्याच्या पाण्याची भयावह स्थिती आहे. याठिकाणी टॅकरच्या खेपा वाढून मिळाव्यात आणि जनावरांसाठी चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी पशुपालक शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ