शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

देवळा बसस्थानकातील स्वच्छतागृहाची दुरवस्था

By admin | Updated: July 15, 2017 01:01 IST

देवळा : बसस्थानकावरील शौचालये नादुरु स्त झाल्याने त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या उपस्थितीत देवळा नगरपंचायत नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : बसस्थानकावरील शौचालये नादुरु स्त झाल्याने त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या उपस्थितीत देवळा नगरपंचायत नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने नाशिक येथे राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रण अधिकारी यामिनी जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. देवळा शहर हे चौफुलीवर वसलेले तालुक्याचे गाव आहे. येथून राज्य व आंतरराज्य बसेसची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. देवळा बसस्थानकावर दिवसभरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ये - जा करतात. शौचालय नादुरुस्त असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. महीलावर्गाची मोठी कुचंबणा होत आहे. तसेच प्रवाशांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था परिवहन विभागाने केलेली नाही. शौचालयांची त्वरित दुरुस्ती करून नवीन शोषखड्डा तयार करावा, नदीपात्रात जाणारे सांडपाणी त्यात टाकावे व परिसराची स्वच्छता नियमतिपणे करावी. तसेच प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय परिवहन विभागाने करावी, अशी मागणी नगराध्यक्ष वृषाली अहेर, उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत अहेर, नगरसेवक अतुल पवार, बाळासाहेब अहेर आदी नगरसेवकांनी केली आहे. स्वच्छ व सुंदर देवळा ही संकल्पना साकार करण्यासाठी देवळा नगरपंचायतीने शहरात पेव्हर ब्लॉक, काँक्रीटीकरण आदी शहर सुशोभिकरणाची काही कामे पूर्ण केली आहेत. बसस्थानकाजवळ नदीकाठावर रस्ता संरक्षण भिंत बांधकाम सुरू आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. बसस्थानकावरील अस्वच्छता नदीपात्राच्या परिसराच्या सौंदर्यास तसेच आरोग्यासाठी बाधक ठरत आहे.अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची भीतीदेवळा बसस्थानकावरील स्वच्छतागृह व शौचालयांची अवस्था दयनीय झाली असून, सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. यामुळे प्रवाशांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. शौचालयांचे बांधकाम जीर्ण झाले असून, शोषखड्डा पूर्णपणे भरला आहे. शोषखड्ड्यातील सांडपाणी कोलती नदीपात्रात येऊ लागल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. रविवारी भरणारा आठवडे बाजार या नदीपात्रात भरतो.  नदीपात्रालगतच देवळा शहराचे ग्रामदैवत दुर्गामातेचे मंदिर तसेच स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे. यामुळे येथे नेहमी भाविकांची वर्दळ असते. मंदिरात येणाऱ्या भाविकांना दुर्गंधी सहन करावी लागते. आठवडे बाजारात या सांडपाण्याशेजारीच खाद्य व फळविक्रेते आपली दुकाने लावतात. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.