शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

देवळा बसस्थानकातील स्वच्छतागृहाची दुरवस्था

By admin | Updated: July 15, 2017 01:01 IST

देवळा : बसस्थानकावरील शौचालये नादुरु स्त झाल्याने त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या उपस्थितीत देवळा नगरपंचायत नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : बसस्थानकावरील शौचालये नादुरु स्त झाल्याने त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या उपस्थितीत देवळा नगरपंचायत नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने नाशिक येथे राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रण अधिकारी यामिनी जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. देवळा शहर हे चौफुलीवर वसलेले तालुक्याचे गाव आहे. येथून राज्य व आंतरराज्य बसेसची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. देवळा बसस्थानकावर दिवसभरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ये - जा करतात. शौचालय नादुरुस्त असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. महीलावर्गाची मोठी कुचंबणा होत आहे. तसेच प्रवाशांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था परिवहन विभागाने केलेली नाही. शौचालयांची त्वरित दुरुस्ती करून नवीन शोषखड्डा तयार करावा, नदीपात्रात जाणारे सांडपाणी त्यात टाकावे व परिसराची स्वच्छता नियमतिपणे करावी. तसेच प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय परिवहन विभागाने करावी, अशी मागणी नगराध्यक्ष वृषाली अहेर, उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत अहेर, नगरसेवक अतुल पवार, बाळासाहेब अहेर आदी नगरसेवकांनी केली आहे. स्वच्छ व सुंदर देवळा ही संकल्पना साकार करण्यासाठी देवळा नगरपंचायतीने शहरात पेव्हर ब्लॉक, काँक्रीटीकरण आदी शहर सुशोभिकरणाची काही कामे पूर्ण केली आहेत. बसस्थानकाजवळ नदीकाठावर रस्ता संरक्षण भिंत बांधकाम सुरू आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. बसस्थानकावरील अस्वच्छता नदीपात्राच्या परिसराच्या सौंदर्यास तसेच आरोग्यासाठी बाधक ठरत आहे.अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची भीतीदेवळा बसस्थानकावरील स्वच्छतागृह व शौचालयांची अवस्था दयनीय झाली असून, सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. यामुळे प्रवाशांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. शौचालयांचे बांधकाम जीर्ण झाले असून, शोषखड्डा पूर्णपणे भरला आहे. शोषखड्ड्यातील सांडपाणी कोलती नदीपात्रात येऊ लागल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. रविवारी भरणारा आठवडे बाजार या नदीपात्रात भरतो.  नदीपात्रालगतच देवळा शहराचे ग्रामदैवत दुर्गामातेचे मंदिर तसेच स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे. यामुळे येथे नेहमी भाविकांची वर्दळ असते. मंदिरात येणाऱ्या भाविकांना दुर्गंधी सहन करावी लागते. आठवडे बाजारात या सांडपाण्याशेजारीच खाद्य व फळविक्रेते आपली दुकाने लावतात. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.