शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
2
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
3
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
4
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
5
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
6
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
7
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
8
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
9
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
10
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
11
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
12
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
13
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
14
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
15
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
16
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
17
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
18
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
19
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!

ओखी वादळाचा नाशिकच्या द्राक्ष बागांनाही फटका, रिमझीम पाऊस, ढगाळ वातावणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 15:57 IST

ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक शहरासह परिसरात रिमङिाम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. या बेमोसमी पावसामामुळे द्राक्ष मान्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.

ठळक मुद्दे द्राक्षबागांना पावसापासून वातावरणापासून धोका द्राक्ष मान्यांना तडे जाण्याची शक्यता प्रतिबंधात्मक औषधांची फवारणीही शक्य नसल्याने चिंतेत भर

नाशिक : महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याला तडाखा देणाऱ्या ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक शहरासह परिसरात रिमङिाम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. या बेमोसमी पावसामामुळे द्राक्ष मान्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.घड काढणीसाठी तयार असलेल्या द्राक्षबागांना या पावसापासून आणि ढगाळ वातावरणापासून सर्वाधिक धोका आहे. या द्राक्षांमध्ये साखरभरणीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असल्याने प्रतिबंधात्मक औषधांची फवारणीही शक्य नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.तर फुलोऱ्यात असलेल्या बागांना वाचविण्याचासीठ प्रतिबंधात्मक फवारण्यांसह डावण्यापासून वाचविण्यासाठीही फवारणी करावी लागणार असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. परंतु, कर्ज काढून लागवड व देखभाल केल्यानंतर आता शेवटच्या टप्प्यात बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार असून त्यासाठी खर्चातही मोठय़ा प्रमाणात भर पडणार असल्याने शहर परिसरातील द्राक्ष बागायतदार शेतकरी चिताग्रस्त झाला आहे. द्राक्षाचे पीक मात्र वर्षातून एकदाच घेतले जाते शिवाय पीक उभे करण्यासाठी एकरी किमान चार लाख रु पये खर्च येतो तेव्हा बाग उभी राहते शिवाय चालू फळ धारणोपासून एकरी अडीच ते तीन लाख खर्च येतो त्यामुळे लाखो रुपये खर्च करून पीक विक्रीसाठी बाजारात येते. सध्या अनेक शेतकऱ्यांचे द्राक्ष पीक अंतिम टप्प्यात असून छाटणीनंतर तीन महिन्याचा कालावधी उलटून गेल्यामुळे बागेची मशागत व देखभालीची सर्व कामे आटोपली आहे. पीक तयार होण्याच्या अवस्थेत असून महागाडी खते, औषधे फवारणी करून झाली आहे. मजुरांचीही सर्व कामे आटोपली आहे आता केवळ पीक परिपक्व होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी बाकी असतांना नैसिर्गक आपत्तीचे संकट उभे ठाकल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचा जीव टांगणीला लागला असून लाखो रु पये खर्च करून द्राक्ष पिकाचा तोंडी आलेला घास हिरावला जातोय की काय, अशी भीती शेतकऱ्यामध्ये निर्माण झाली आहे.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळFarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस