शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ओखी वादळाचा नाशिकच्या द्राक्ष बागांनाही फटका, रिमझीम पाऊस, ढगाळ वातावणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 15:57 IST

ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक शहरासह परिसरात रिमङिाम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. या बेमोसमी पावसामामुळे द्राक्ष मान्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.

ठळक मुद्दे द्राक्षबागांना पावसापासून वातावरणापासून धोका द्राक्ष मान्यांना तडे जाण्याची शक्यता प्रतिबंधात्मक औषधांची फवारणीही शक्य नसल्याने चिंतेत भर

नाशिक : महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याला तडाखा देणाऱ्या ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक शहरासह परिसरात रिमङिाम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. या बेमोसमी पावसामामुळे द्राक्ष मान्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.घड काढणीसाठी तयार असलेल्या द्राक्षबागांना या पावसापासून आणि ढगाळ वातावरणापासून सर्वाधिक धोका आहे. या द्राक्षांमध्ये साखरभरणीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असल्याने प्रतिबंधात्मक औषधांची फवारणीही शक्य नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.तर फुलोऱ्यात असलेल्या बागांना वाचविण्याचासीठ प्रतिबंधात्मक फवारण्यांसह डावण्यापासून वाचविण्यासाठीही फवारणी करावी लागणार असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. परंतु, कर्ज काढून लागवड व देखभाल केल्यानंतर आता शेवटच्या टप्प्यात बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार असून त्यासाठी खर्चातही मोठय़ा प्रमाणात भर पडणार असल्याने शहर परिसरातील द्राक्ष बागायतदार शेतकरी चिताग्रस्त झाला आहे. द्राक्षाचे पीक मात्र वर्षातून एकदाच घेतले जाते शिवाय पीक उभे करण्यासाठी एकरी किमान चार लाख रु पये खर्च येतो तेव्हा बाग उभी राहते शिवाय चालू फळ धारणोपासून एकरी अडीच ते तीन लाख खर्च येतो त्यामुळे लाखो रुपये खर्च करून पीक विक्रीसाठी बाजारात येते. सध्या अनेक शेतकऱ्यांचे द्राक्ष पीक अंतिम टप्प्यात असून छाटणीनंतर तीन महिन्याचा कालावधी उलटून गेल्यामुळे बागेची मशागत व देखभालीची सर्व कामे आटोपली आहे. पीक तयार होण्याच्या अवस्थेत असून महागाडी खते, औषधे फवारणी करून झाली आहे. मजुरांचीही सर्व कामे आटोपली आहे आता केवळ पीक परिपक्व होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी बाकी असतांना नैसिर्गक आपत्तीचे संकट उभे ठाकल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचा जीव टांगणीला लागला असून लाखो रु पये खर्च करून द्राक्ष पिकाचा तोंडी आलेला घास हिरावला जातोय की काय, अशी भीती शेतकऱ्यामध्ये निर्माण झाली आहे.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळFarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस